शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वादळीवाऱ्यासह पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शनिवारी रात्री उशीरा वर्धा शहरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वर्धा शहरासह काही भागातील ...

ठळक मुद्देघरांवरील टीनपत्रे उडाली : उभ्या पिकांना फटका, विद्युत पुरवठाही झाला होता खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी रात्री उशीरा वर्धा शहरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वर्धा शहरासह काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर काही ठिकाणी घरांवरील टीनपत्रे उडाली. शिवाय उभ्या पिकांनाही या वादळीवाऱ्यांचा चांगलाच फटका बसला.वायगाव (नि.) परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला. वादळीवाऱ्यामुळे काही काळाकरिता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर भागातील शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना वादळीवाऱ्याचा चांगलाच फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.पवनार येथे वादळीवाऱ्यासह पावसामुळे सुमारे २०० वर्ष पूर्वीचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. येथील हजरत सय्यद अहमद कबीर दर्गाह परिसरात हे झाड होते. घटनेच्यावेळी परिसरात कुणी नसल्याचे पुढील अनर्थ टळला. याभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे बच्चेकंपनीसह वृद्धांना नाहक त्रास सहन करीत रात्र काळोखात काढावी लागली.घोराड परिसरात शनिवारी रात्री झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे काहींच्या घरांवरील टीनपत्रे व कवेलू उडाली. परिणामी, नुकसानग्रस्तांचा संसार उघड्यावर आला आहे. तर काही काळाकरिता या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. खुशाल महाकाळकर, प्रभाकर पोहाणे आदींचे वादळीवाऱ्यामुळे चांगलेच नुकसान झाले आहे. या भागात केळी, डाळिंब पपई आदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. मात्र, शनिवारी आलेल्या वादळीवाºयासह पावसामुळे केळी, डाळिंब व पपईच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे वादळवाºयासह झालेल्या पावसामुळे मारोती रामाजी धस यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. सदर घटनेपूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आणि उकाड्याच्या त्रासामुळे घरातील सर्व सदस्य घराबाहेर पडले होते. परिणामी, पुढील अनर्थ टळला. मारोती धस यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून घराच्या भिंतीही बºयापैकी खसल्याने त्यांचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शनिवारच्या वादळवाऱ्यामुळे तालुक्यात वाघोली वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार श्रीराम मुंधडा यांनी सांगितले.