शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळीवाऱ्यासह पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शनिवारी रात्री उशीरा वर्धा शहरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वर्धा शहरासह काही भागातील ...

ठळक मुद्देघरांवरील टीनपत्रे उडाली : उभ्या पिकांना फटका, विद्युत पुरवठाही झाला होता खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी रात्री उशीरा वर्धा शहरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वर्धा शहरासह काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर काही ठिकाणी घरांवरील टीनपत्रे उडाली. शिवाय उभ्या पिकांनाही या वादळीवाऱ्यांचा चांगलाच फटका बसला.वायगाव (नि.) परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला. वादळीवाऱ्यामुळे काही काळाकरिता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर भागातील शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना वादळीवाऱ्याचा चांगलाच फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.पवनार येथे वादळीवाऱ्यासह पावसामुळे सुमारे २०० वर्ष पूर्वीचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. येथील हजरत सय्यद अहमद कबीर दर्गाह परिसरात हे झाड होते. घटनेच्यावेळी परिसरात कुणी नसल्याचे पुढील अनर्थ टळला. याभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे बच्चेकंपनीसह वृद्धांना नाहक त्रास सहन करीत रात्र काळोखात काढावी लागली.घोराड परिसरात शनिवारी रात्री झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे काहींच्या घरांवरील टीनपत्रे व कवेलू उडाली. परिणामी, नुकसानग्रस्तांचा संसार उघड्यावर आला आहे. तर काही काळाकरिता या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. खुशाल महाकाळकर, प्रभाकर पोहाणे आदींचे वादळीवाऱ्यामुळे चांगलेच नुकसान झाले आहे. या भागात केळी, डाळिंब पपई आदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. मात्र, शनिवारी आलेल्या वादळीवाºयासह पावसामुळे केळी, डाळिंब व पपईच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे वादळवाºयासह झालेल्या पावसामुळे मारोती रामाजी धस यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. सदर घटनेपूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आणि उकाड्याच्या त्रासामुळे घरातील सर्व सदस्य घराबाहेर पडले होते. परिणामी, पुढील अनर्थ टळला. मारोती धस यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून घराच्या भिंतीही बºयापैकी खसल्याने त्यांचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शनिवारच्या वादळवाऱ्यामुळे तालुक्यात वाघोली वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार श्रीराम मुंधडा यांनी सांगितले.