शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

वादळीवाऱ्यासह पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शनिवारी रात्री उशीरा वर्धा शहरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वर्धा शहरासह काही भागातील ...

ठळक मुद्देघरांवरील टीनपत्रे उडाली : उभ्या पिकांना फटका, विद्युत पुरवठाही झाला होता खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी रात्री उशीरा वर्धा शहरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वर्धा शहरासह काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर काही ठिकाणी घरांवरील टीनपत्रे उडाली. शिवाय उभ्या पिकांनाही या वादळीवाऱ्यांचा चांगलाच फटका बसला.वायगाव (नि.) परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला. वादळीवाऱ्यामुळे काही काळाकरिता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर भागातील शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना वादळीवाऱ्याचा चांगलाच फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.पवनार येथे वादळीवाऱ्यासह पावसामुळे सुमारे २०० वर्ष पूर्वीचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. येथील हजरत सय्यद अहमद कबीर दर्गाह परिसरात हे झाड होते. घटनेच्यावेळी परिसरात कुणी नसल्याचे पुढील अनर्थ टळला. याभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे बच्चेकंपनीसह वृद्धांना नाहक त्रास सहन करीत रात्र काळोखात काढावी लागली.घोराड परिसरात शनिवारी रात्री झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे काहींच्या घरांवरील टीनपत्रे व कवेलू उडाली. परिणामी, नुकसानग्रस्तांचा संसार उघड्यावर आला आहे. तर काही काळाकरिता या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. खुशाल महाकाळकर, प्रभाकर पोहाणे आदींचे वादळीवाऱ्यामुळे चांगलेच नुकसान झाले आहे. या भागात केळी, डाळिंब पपई आदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. मात्र, शनिवारी आलेल्या वादळीवाºयासह पावसामुळे केळी, डाळिंब व पपईच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे वादळवाºयासह झालेल्या पावसामुळे मारोती रामाजी धस यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. सदर घटनेपूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आणि उकाड्याच्या त्रासामुळे घरातील सर्व सदस्य घराबाहेर पडले होते. परिणामी, पुढील अनर्थ टळला. मारोती धस यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून घराच्या भिंतीही बºयापैकी खसल्याने त्यांचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शनिवारच्या वादळवाऱ्यामुळे तालुक्यात वाघोली वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार श्रीराम मुंधडा यांनी सांगितले.