शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पावसाची दडी, शेतमजूरही चिंतेत

By admin | Updated: July 8, 2015 02:21 IST

पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतपिके धोक्यात आलीच आहे. तसेच मजुरांवरही कुऱ्हाड कोसळली आहे. मजुरी नसल्यामुळे खायचे काय असा प्रश्न मजुरांना पडला आहे.

कामासाठी भटकंती : सर्वांनाच पावसाची प्रतीक्षाआकोली : पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतपिके धोक्यात आलीच आहे. तसेच मजुरांवरही कुऱ्हाड कोसळली आहे. मजुरी नसल्यामुळे खायचे काय असा प्रश्न मजुरांना पडला आहे. तसेच मुलांच्या शाळा सुरू झाल्याने त्यांचा खर्च कस करावा हा प्रश्नही त्यांंना सतावत आहे. मृग नक्षत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बळीराजासह शेतमजुरांच्या आशा पल्लवीत झाल्या. रोवणी व पेरणीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. दिले. सर्वत्र शेतशिवारांमध्ये कामांची लगबग सुरू असल्याने सर्वत्र शेतांमध्ये काम करणारे मजूर दिसत होते. पण पेरण्या आटोपताच पावसाने दडी मारली. आज बरसेल, उद्या येईल ही आस लावून शेतकरी व शेतमजूर आकाशाकडे डोळे लावून बसले आहे. पण पधरवड्यापासून ढगातून टिपूसभर थेंब ही जमिनीवर पडला नाही. चार-पाच दिवसांपासून ढग नुसतेच वाकुल्या दाखवित आहे. पाऊस नसल्यामुळे रिकामपण म्हणून शेतकऱ्यांनी पिकाला आलटुन-पालटुन डवरणी केली. त्यामुळे शेतात तण वाढले नाही. निंदण व खुरपणाची कामे थांबली. पाऊसच नाही तर रासायनिक खत तरी कसे देणार. त्यामुळे मजूरवर्गाला कामच नाही. मजुरी नसल्यामुळे हातात पैसा नाही. अन्न-धान्य घरात असले तरी तिखट, मीठ, तेल, भाजी कसे विकत घेणार हा मोठाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बळीराजा तर मोठ्याच कात्रीत सापडला आहे. पाऊस येत नाही. विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेली, विजेचा खेळखंळोबा सुरू आहे. तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रोपटी किती दिवस तग धरुन राहणार हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांसाठी ‘बुरे दिन’ आल्याचे बोलल्या जात असून मजुरांना पावसाची प्रतीक्षा आहे.(वार्ताहर)