शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पावसाने पिके बहरली वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू

By admin | Updated: September 18, 2014 00:02 IST

सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने पंधरवड्यापासून हजेरी लावली. त्यामुळे मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यातच चार दिवसापासून पावसाच्या उघाडीमुळे परिसरातील शिवारांमध्ये सर्वच पिकांच्या

पिंपळखुटा : सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने पंधरवड्यापासून हजेरी लावली. त्यामुळे मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यातच चार दिवसापासून पावसाच्या उघाडीमुळे परिसरातील शिवारांमध्ये सर्वच पिकांच्या परिस्थितीत चांगली सुधारणा झाली आहे. परंतु यातच रोगांची लागण आणि वन्यप्राण्यांचा हैदोस पसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. सततच्या पावसामुळे पिकांबरोबरच शेतात तणही वाढले आहे. सोयाबीन, ज्वारी व कपासीच्या पिकांवर रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे फवारणी, निंदण व डवरणीच्या कामाला वेग आला आहे. सर्वांची एकाच वेळी कामाची धावपळ झाल्याने मजुरांची चणचण भासत आहे. परिणामी मजुरांचे दर वाढले आहे. त्यामुळे शेतकरी तणनाशकाच्या फवारणीला पसंती देत आहे. उशिरा व दुबार, तिबार पेरणी होवूनही सध्यातरी पिके समाधानकारक आहे. संततधार पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मात्र डवरलेली पिके पाहताच पिंपळखुटा व परिसरातील शिवारांमधील वन्य प्राण्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता चिंतातुर झाला आहे. रोही व डुकरांनी शेतात शिरून उभ्या पिकांचे नुकसान करण्याचा सपाटा सुरू केला आहे. शेतकरी रात्रभर शेतात पिकांचे रक्षण करावे लागत आहे. तसेच कपाशीवर मर रोगांचे आक्रमक सुरू झाले असून पिके वाळत आहे. त्यामुळे शासनाने यावर मार्ग काढावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)