शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’

By admin | Updated: May 29, 2017 01:10 IST

शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’ झाली.

खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित : झाडे कोसळल्याने वाहतूकही प्रभावित लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची ‘एन्ट्री’ झाली. पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. शहरात सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. तब्बल अर्धा ते एक तास पावसाची रिपरिप सुरू होती. तळेगाव (श्य.पं.) परिसरात सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान वादळासह पाऊस आला. यामुळे रस्त्यावरील व गावातील झाडे कोसळली. जुन्या वस्तीतील काही घरांवरील टिना उडाल्या. यात जीवित हानी झाली नाही. काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे भुईमुंग पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. आष्टी शहरात वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वीज तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला आहे. कारंजा तालुक्यात सेलगाव (लवणे) परिसरात खैरी (टॉवर) येथील शेखर पठाडे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. यात त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. छप्पर उडाल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महसूल विभागाला माहिती देण्यात आली; पण सायंकाळपर्यंत पंचनामा झाला नव्हता. समुद्रपूर तालुक्यात नारायणपूर परिसरात शनिवारी दुपारी वादळी वारा व पावसाने अनेकांच्या घरांवरील छप्पर उडाले. पाठर येथील १० ते १५ घरावरील टिनपत्रे उडाल्यात. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आंजी (मोठी) व सेवाग्राम वादळी वारा आणि पावसाचे आगमन झाले. पवनार येथे पाऊस नसला तरी वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाले. यामुळे नुकसान झाले. कुठे विद्युत खांब कोसळल्यामुळे तर कुठे वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना त्रास झाला. हिंगणघाट शहरासह तालुक्यात वादळ रविवारी सायंकाळी हिंगणघाट शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्याचे तांडव सुरू होते. सुमारे पाऊण तास वादळी वाऱ्याने थैमान घातल्यानंतर शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. यात कुठे नुकसान झाले नसून पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. समुद्रपूर तालुक्यात रविवारीही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. शिवाय देवळी शहरासह तालुक्यातील पुलगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यात कुठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पावसामुळे उकाडा मात्र कमी झाल्याचे जाणवत होते.