शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पावसाचा टक्का घटला, प्रकल्प तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:35 IST

समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण आता तो फोल ठरत आहे.

ठळक मुद्दे२७.७९ टक्के घट : उद्योगासह खरीप, रबी हंगामाला पाणी देणे होणार कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण आता तो फोल ठरत आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. परिणामी, सरासरी पावसाचा टक्का घटला आहे. मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत ७५.३९ टक्के सरासरी पाऊस झाला होता; पण यंदा केवळ ४७.६० टक्के पावसाची नोंद झाली. मागील वर्षीपेक्षा तब्बल २७.७९ टक्के पाऊस कमी झाला आहे. सध्या कडक उन्ह तापत असल्याने जलाशयांची स्थिती ढासळणार असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी पावसाचे बºयापैकी आगमन झाले. आॅगस्ट महिन्यापर्यंत जलाशयांनी ५० ते ६० टक्के पातळी गाठली होती. पिकांचीही स्थिती सोयाबीन वगळता बºयापैकी होती; पण यंदा सध्या पिकांची स्थिती चांगली असली तरी पाऊस मात्र बेपत्ता आहे. यावर्षी मान्सून चांगला राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. प्रारंभी तशी वातावरण निर्मितीही झाली; पण पावसाचा खंड कायम राहिला आहे. खरीप हंगामात उशीरा का होईना; पण बºयापैकी पाऊस झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. यानंतर काही दिवस पावसाचे सातत्य तथा ढगाळी वातावरण कायम होते; पण आता मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ताच झाला आहे. उन्हाळ्यागत उन्ह तापू लागले आहे. उघाड मिळाल्याने शेतातील डवरणी, निंदणाची कामे उरकली जात आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास काही भागातील पिकांची वाढ खुंटणार असल्याचे सांगितले जात आहे.मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण ५,४४३.२० मिमी तर सरासरी ६९४.१५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ३,५०५.७५ मिमी तर सरासरी ४३८.२२ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. मागील वर्षी २ आॅगस्टपर्यंत ७५.३९ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी केवळ ४७.६० मिमी पाऊस झाला असून गतवर्षीपेक्षा तो २७.७९ टक्के कमी झाला आहे. यामुळे हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरल्याचेच दिसून येत आहे. बुधवारी कारंजा वगळता जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद नाही. कारंजा तालुक्यात ४.६० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित सातही तालुक्यांत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. उलट उन्ह तापत असून दमट वातावरण असल्याने पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यातील जलाशयांमध्ये जलसंचय होत नसल्याने पिण्याचे, औद्योगिक तथा पिकांना पाणी पुरविणे कठीण होणार आहे. बोर आणि धाम प्रकल्पामध्ये जलसाठा होणे अत्यंत गरजेचे असते; पण यंदा धाम प्रकल्पामध्ये केवळ १९.५६ टक्के तर बोर धरणात २५.२० टक्के जलसाठा आहे. धाम प्रकल्पाचे १५ दलघमी पाणी पिण्यासाठी तथा नोंदणीकृत उद्योगांकरिता आरक्षित आहे. शिवाय काही पाणी खरीप व रबी हंगामात पिकांना दिले जाते; पण आणखी काही दिवस पाऊस न आल्यास यात कपात करावी लागणार आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पांत किमान ५० ते ६० टक्के जलसाठा अपेक्षित असतो; पण यंदा पाऊसच न आल्याने पाण्याची पातळी वाढलेली नाही. परिणामी, उन्हाळ्यात पाणी कपात अटळ असून टंचाईची शक्यताही नाकारता येत नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकºयांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसते.ओल असल्याने पिकांची स्थिती समाधानकारकअधिक प्रमाणात पाऊस आला नसला तरी जिल्ह्यातील शेतजमिनीमध्ये अद्याप ओल आहे. उघाड मिळाल्याने शेतकरी डवरणी, निंदणाची कामे करीत आहे. यामुळे पिकांची वाढ होत आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. यामुळे सध्या पिकांची स्थिती समाधानकारक आहे. असे असले तरी आणखी काही दिवस पाऊस न आल्यास विपरित परिणाम होऊ शकतो.स्वत: जिल्ह्यातील पिकांची पाहणी केली. सध्या पिके समाधानकारक आहे. डवरणी, निंदणाच्या कामामुळे पिकांना हरित द्रव्ये मिळत आहे. जमिनीतही ओल असल्याने पिके सुस्थितीत आहेत. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास सोयाबीन, कपाशी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.