शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वादळीवाºयासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:11 IST

इटखेडा, इसापूर, कोरंभी, वडेगाव/स्टे., कन्हाळगाव, घाटी पळसगाव, खामखुर्रा, हेटी, येगाव, जाणवा, कोरंभीटोला, मांडोखाल, मांडोखालटोला, अरुणनगर, गौरनगर या गावात ....

ठळक मुद्देपिकाचे नुकसान : धान जमीनदोस्त, लोंब्या पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : इटखेडा, इसापूर, कोरंभी, वडेगाव/स्टे., कन्हाळगाव, घाटी पळसगाव, खामखुर्रा, हेटी, येगाव, जाणवा, कोरंभीटोला, मांडोखाल, मांडोखालटोला, अरुणनगर, गौरनगर या गावात १३ व १४ आॅक्टोबरला आलेल्या वादळीवारा व पावसाने शेतातील धानपिक पूर्णत: जमीनदोस्त झाले असून बळीराजाच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा हवालदिल झाला आहे. मात्र अजूनपर्यंत कुणीही समाजसेवक, राजकारणी किंवा स्वत:ला शेतकºयांचे कैवारी समजणारे अजूनही झोपले आहेत काय? असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे.तालुक्यात कुणी हलके तर कुणी भारी धान पीक लावले आहे. धान पीक लावणीपासूनच विविध किडी व रोगांसाठी महागडे किटकनाशक फवारणी करुन धान वाचविण्याच्या प्रयत्न शेतकरी करीत आहे. बळीराजाने प्रति एकर २५ हजार रुपये खर्च केले आहेत. मात्र १३ व १४ आॅक्टोबर रोजी आलेल्या वादळी वाºयासह पावसाने शेतातील पीक पूर्णत: पडले असून धानाच्या रोपट्यांवरुन पाणी वाहत आहे. त्यात इटियाडोह धरणाच्या कालव्याचे पाणी सुरू असून कसलेही नियोजन नाही. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे इटियाडोह धरणातून विनाकारण पाण्याचा अपव्यय होत आहे. परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुमाळी सुरू असून शेतकरी मात्र भरडला जात आहे. तरी वरील गावांची पाहणी करुन झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.