शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

खरीपासोबतच रबीचीही चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:21 IST

शासन बदलल्याने आशाही वाढल्या. शासनाकडून आश्वासनांची खैरात वाटणे सुरूच आहे. असे असले तरी शेतकरी कुणाची प्रतीक्षा न करता आपल्याच कामात व्यस्त आहेत.

ठळक मुद्देकर्जमाफी व नवीन कर्जाची प्रतीक्षाच : अत्यल्प पावसामुळे पिके धोक्यात

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : शासन बदलल्याने आशाही वाढल्या. शासनाकडून आश्वासनांची खैरात वाटणे सुरूच आहे. असे असले तरी शेतकरी कुणाची प्रतीक्षा न करता आपल्याच कामात व्यस्त आहेत. आज ना उद्या आर्थिक स्थिती सुधारेल, या अपेक्षेत कष्ट उपसणाºया शेतकºयांना आता खरीप हंगामासोबतच रबीचीही चिंता सतावत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी अनेक संघटना पूढे आल्या. सत्ता गेल्यावर शेतकºयांची आठवण येणाºया राजकीय पक्षांचे यात्रा व मोर्चे पाहिले. सत्तेत नसताना शेतकºयांच्या प्रश्नावर भावनिक आंदोलन करून ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेत आले; पण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, हे कुणाच्या लक्षातच आले नाही. खरीप हा शेतकºयांच्या वर्षभराच्या खर्चाचा भार उचलणारा हंगाम असतो. या हंगामात शेतातील पिके हिरवीगार दिसतील एवढाच पाऊस आला. यानंतर उन्हही तापू लागल्याने शेतातील पिकांना पाहिजे त्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. परिणामी, खरीपाचे आर्थिक गणित कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन व कपाशी या दोन्ही पिकांवर अत्यल्प पावसामुळे अनेक रोगांनी तथा अळ्यांनी आक्रमण केले आहे. यामुळे ही दोन्ही पिके कितपत हाती येतात, हा प्रश्नच आहे. परिणामी, खरीप हंगाम धोक्याचा तर ठरणार नाही ना, ही चिंता शेतकºयांना त्रस्त करीत आहे.सेलू तालुक्यातील शेतकºयांना रबी हंगामात आर्थिक सुबत्ता देणाºया यशवंत धरणात पावसाच्या कमतरतेमुळे जलसंचयच झाला नाही. यामुळे यावर्षी रबी हंगामात पाटाचे पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून हे वर्षही शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटीत करणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. समाधानकारक पाऊस येणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. यामुळे शेतकºयांनी जोमाने कपाशी, सोयाबीन, तुरीची पेरली केली; पण दरवर्षीप्रमाणे पावसाने हुलकावणी दिली. यंदा तर सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. यामुळे हिरवी दिसत असली तर अनेक रोग, अळ्यांमुळे पिकांवर मरगळ आल्याचे दिसून येत आहे. आता रबी हंगामालाही पाणी मिळणे कठीण असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाल्याचेच दिसते.