शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

रबी क्षेत्रात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:37 IST

यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा अंदाज : पाण्याचे नियोजन करून गहू, चन्याची लागवड करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तूलनेत रबी पीक लागवडीच्या क्षेत्रात घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. शिवाय गहू व चना पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून तसेच त्याचे योग्य नियोजन करूनच सदर पिकांची लागवड करावी, असा सल्ला सध्या त्यांच्याकडून दिल्या जात आहे.वर्धा जिल्ह्यात सुमारे ६२ हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड केली जाते. जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे समाधानकारक पाऊस झाल्यावर हे क्षेत्र ९५ हजार हेक्टर होईल असे बोलले जात होते. परंतु, यंदा पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक जलाशये तळ दाखवत आहेत. शिवाय शेतातील विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे जानकारांचे म्हणणे आहे. ज्यांच्याकडे रबी पिकांना दोन पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशाच शेतकºयांनी चना पिकाची लागवड करावी. असे न केल्यास चना उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लाऊ शकते. तर ज्याच्याकडे पिकाला सहा वेळा पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशाच शेतकºयांनी यंदा गहू पिकाची लागवड करावी, असेही कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रबी हंगामाच्या तयारीत असणाºया शेतकºयांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात यंदा शेती करावी.चन्याचे वाण कमी पाण्यात तग धरणारेज्यांच्याकडे दोन पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशा शेतकऱ्यांनी चना पिकाची लागवड करताना जॅकी ९२१८ या वाणाची निवड करणावी. चन्याचे हे वाण कमी पाण्यात तग धरणारे असल्याने उत्पन्न समाधानकारक होण्याची शक्यता असते. तर ज्यांच्याकडे पिकाला चार पाणी देण्याची व्यवस्था आहे त्या शेतकºयांनी विशाल व विजय या चन्याच्या वाणाची लागवडीसाठी निवड करावी, असे सांगण्यात आले.मुबलक पाणी नसेल तर गव्हाची लागवड धोक्याचीज्या शेतकऱ्यांकडे पिकाला सहा वेळा पाणी देता येईल अशाच शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात गहू पिकाची लागवड करावी. ज्यांच्याकडे मुबलक पाण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची लागवड करण्याचे टाळले पाहिजे. अन्यथा त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.२० दिवसांच्या अंतराने पिकाला द्यावे पाणीजमिनीत ओलावा असेल तर पेरणीनंतर २० दिवसांनी पिकाला पाणी द्यावे. जॅकी वानाच्या चन्याची लागवडीसाठी निवड केल्यास पिकाला २० दिवसांनी पहिल्यांदा तर ६० दिवसांनी दुसऱ्यांना पाणी द्यावे. तर चन्याच्या विशाल व विजय वानाची निवड शेतकऱ्यांनी केली असल्यास त्यांनी पिकाला २०,६० व ८० दिवसानंतर पाणी द्यावे.तर गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जमिनीत ओलावा नसल्यास पेरणीला पहिल्यांदा पाणी द्यावे. त्यानंतर २०-२० दिवसाच्या अंतराने सहा टप्प्यात गव्हाला सिंचन करावे. पाण्याचे योग्य नियोजन करून रबी पीक घेतल्यास शेतकºयांना संभाव्य धोका टाळता येत असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाऊस कमी पडला आहे. शिवाय जिल्ह्यातील जलायशांच्या पाणी पातळीतही पाहिजे तशी वाढ पावसाळ्यात झाली नाही. त्यामुळे रबी पीक घेण्याचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून चना व गहू पिकाची लागवड करावी.- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.