शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

एक लाख हेक्टरवर रबीची पेरणी

By admin | Updated: October 28, 2014 23:00 IST

खरिपात पावसाच्या दडीने हतबल झालेला शेतकरी रबीतून झालेले नुकसान भरून काढणार असे भाकीत करून कृषी विभागाच्यावतीने रबी हंगामाचा आराखडा तयार करण्यात आला. यात सुमारे

कृषी विभागाचे नियोजन : गत हंगामात ७५ हजार ४४१ हेक्टरवर झाला होता पेरावर्धा : खरिपात पावसाच्या दडीने हतबल झालेला शेतकरी रबीतून झालेले नुकसान भरून काढणार असे भाकीत करून कृषी विभागाच्यावतीने रबी हंगामाचा आराखडा तयार करण्यात आला. यात सुमारे १ लाख ८ हजार ५०० हेक्टरवर पेरा होईल असे भाकीत नियोजनातून वर्तविण्यात आले आहे. कृषी विभागाचा आराखडा तयार झाला असला तरी शेतकऱ्यांची पेरणी करण्याची तयारी झाली नसल्याचे जिल्ह्यात वास्तव आहे.साधारणत: दिवाळी झाली की रबीच्या पेरणीला प्रारंभ होतो; मात्र सध्या जिल्ह्यात तसे चित्र नाही. शेतात खरीपाचे पीक अद्याप कायम आहे. त्याची सवंगणी झाली नाही. या पिकाची कापणी करून शेतात मशागत करून रबीची पेरणी करण्यात येते. सध्या तसे चित्र नाही. रबी हंगामाकरिता कृषी विभागाचा आराखडा तयार झाला असला तरी शेतकऱ्याचे नियोजन मात्र अद्याप तयार झाले नाही. यंदाच्या हंगामात गत वर्षीच्या तुलनेत पेरा वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गत हंगामात ७५ हजार ४४१ हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. गत आठवड्यात आलेल्या पावसामुळे हरभऱ्याचा पेरा वाढणार असल्याचा उल्लेख आराखड्यात करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात ६९ हजार ५०० हेक्टरवर हरभरा पेरण्यात येईल असा अंदाज कृषी विभागाच्या आराखड्यात तयार करण्यात आला आहे. गत वर्षी जिल्ह्यात ४० हजार ३३ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता. केवळ हरभराच नाही तर गहू , रबी ज्वारी व इतर पिकांच्या पेरण्यातही वाढ होणार असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यात नमूद आहे. यंदा ३३ हजार हेक्टरवर गव्हाचा पेरा होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. तर गत हंगामात २४ हजार ७५२ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला होता. २ हजार ५०० हेक्टरवर रबी ज्वारी होणार असून गत वर्षी ११ हजार ७८ हेक्टरवर पेरा झाला होता. इतर पिके १ हजार हेक्टरवर पेरण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)