शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

जलयुक्तमुळे रबी क्षेत्रात १३ हजार हेक्टरने वाढ

By admin | Updated: January 26, 2017 01:56 IST

कोरडवाहू क्षेत्र कमी करून सिंचनाची क्षमता वाढविता यावी म्हणून राज्य शासनाकडून विशेष प्रकल्प म्हणून जलयुक्त

१३ हजार हेक्टरची वाढ : हरभरा पिकाच्या क्षेत्रातही वाढ प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धा कोरडवाहू क्षेत्र कमी करून सिंचनाची क्षमता वाढविता यावी म्हणून राज्य शासनाकडून विशेष प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या अभियानामुळे पाणी उपलब्ध झाले असून तब्बल १३ हजार हेक्टर रबी क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी ५५ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा, गहु पिकांची पेरणी झाली होती. यंदा ती ६८ हजार २५० हेक्टरमध्ये झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकानंतर शेतकरी रबी हंगामात हरभरा, गहु यासह अन्य पिकांची लागवड करीत असतात. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने यापूर्वी निर्धारित क्षेत्रातच रबी हंगामाची पेरणी होत होती. हे क्षेत्र कमी करून सिंचन सुविधा वाढविण्याकरिता राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. नाला खोलीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारे आदी अनेक कामे हाती घेण्यात आलीत. याचा फायदाही शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली असून बहुतांश शेतकरी रबी हंगामातील पिकांची पेरणी करू शकले आहेत. मागील वर्षी तुरीला सर्वाधिक भाव मिळाले होते. यामुळे यावर्षी तुरीचा पेरा वाढला होता. तूर हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्या शेतात रबी हंगामातील पिके घेता येत नाहीत. असे असले तरी जिल्ह्यातील रबी पिकांच्या क्षेत्रात तब्बल १३ हजार हेक्टरने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी ५८ हजार हेक्टर क्षेत्रात रबी हंगामातील पिकांची लागवड करण्यात आली होती. ती यंदा ६८ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. यात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी वाढल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या अन्य पिकांच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचेच दिसून येत आहे. २४ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित पाणी ४जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. प्रकल्प पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानची कामे करण्यात आल्याने जलसाठा वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खरीप हंगामात पिके जगविण्याकरिता या पाण्याचा फायदा झाला. जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्राला यंदा संरक्षित पाण्याचा वापर करता आला आहे. शिवाय याच पाण्यातून शेतकऱ्यांना रबी हंगामाकरिता जमिनी तयार करून ठेवता आल्यात. अप्रत्यक्षरित्याही शेतकऱ्यांना लाभ ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा शेतकऱ्यांना अप्रत्यक्षरित्याही फायदा झाला आहे. नाला सरळीकरण, खोलीकरण, बांध बंदिस्तीच्या कामांमुळे जलसाठा वाढला. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतातील, अनेक गावांतील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कुपनलिकांची स्थितीही सुधारल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. परिणामी, रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यंदा तब्बल १३ हजार हेक्टर क्षेत्र वाढून ६८ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यात हरभरा पिकाचे प्रमाण अधिक आहे. ही कामे शेतकऱ्यांना लाभदायकच ठरत आहेत. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.