शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

जलयुक्तमुळे रबी क्षेत्रात १३ हजार हेक्टरने वाढ

By admin | Updated: January 26, 2017 01:56 IST

कोरडवाहू क्षेत्र कमी करून सिंचनाची क्षमता वाढविता यावी म्हणून राज्य शासनाकडून विशेष प्रकल्प म्हणून जलयुक्त

१३ हजार हेक्टरची वाढ : हरभरा पिकाच्या क्षेत्रातही वाढ प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धा कोरडवाहू क्षेत्र कमी करून सिंचनाची क्षमता वाढविता यावी म्हणून राज्य शासनाकडून विशेष प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या अभियानामुळे पाणी उपलब्ध झाले असून तब्बल १३ हजार हेक्टर रबी क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी ५५ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा, गहु पिकांची पेरणी झाली होती. यंदा ती ६८ हजार २५० हेक्टरमध्ये झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकानंतर शेतकरी रबी हंगामात हरभरा, गहु यासह अन्य पिकांची लागवड करीत असतात. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने यापूर्वी निर्धारित क्षेत्रातच रबी हंगामाची पेरणी होत होती. हे क्षेत्र कमी करून सिंचन सुविधा वाढविण्याकरिता राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. नाला खोलीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारे आदी अनेक कामे हाती घेण्यात आलीत. याचा फायदाही शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली असून बहुतांश शेतकरी रबी हंगामातील पिकांची पेरणी करू शकले आहेत. मागील वर्षी तुरीला सर्वाधिक भाव मिळाले होते. यामुळे यावर्षी तुरीचा पेरा वाढला होता. तूर हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्या शेतात रबी हंगामातील पिके घेता येत नाहीत. असे असले तरी जिल्ह्यातील रबी पिकांच्या क्षेत्रात तब्बल १३ हजार हेक्टरने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी ५८ हजार हेक्टर क्षेत्रात रबी हंगामातील पिकांची लागवड करण्यात आली होती. ती यंदा ६८ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. यात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी वाढल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या अन्य पिकांच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचेच दिसून येत आहे. २४ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित पाणी ४जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. प्रकल्प पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानची कामे करण्यात आल्याने जलसाठा वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खरीप हंगामात पिके जगविण्याकरिता या पाण्याचा फायदा झाला. जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्राला यंदा संरक्षित पाण्याचा वापर करता आला आहे. शिवाय याच पाण्यातून शेतकऱ्यांना रबी हंगामाकरिता जमिनी तयार करून ठेवता आल्यात. अप्रत्यक्षरित्याही शेतकऱ्यांना लाभ ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा शेतकऱ्यांना अप्रत्यक्षरित्याही फायदा झाला आहे. नाला सरळीकरण, खोलीकरण, बांध बंदिस्तीच्या कामांमुळे जलसाठा वाढला. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतातील, अनेक गावांतील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कुपनलिकांची स्थितीही सुधारल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. परिणामी, रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यंदा तब्बल १३ हजार हेक्टर क्षेत्र वाढून ६८ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यात हरभरा पिकाचे प्रमाण अधिक आहे. ही कामे शेतकऱ्यांना लाभदायकच ठरत आहेत. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.