शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

१४ हजार हेक्टरने वाढणार रब्बीचा पेरा

By admin | Updated: November 9, 2016 00:55 IST

खरीप हंगामातील उत्पन्न निघणे सुरू असून शेतकऱ्यांची रबीचा पेरा करण्याची लगबग सुरू झाली आहे.

गहू व चणा क्षेत्र वाढण्याचा अंदाज : कृषी विभागाने केले ७५ हजार हेक्टरमध्ये नियोजन वर्धा : खरीप हंगामातील उत्पन्न निघणे सुरू असून शेतकऱ्यांची रबीचा पेरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ७४ हजार ९०० हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ६० हजार ८३० हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. यात यंदाच्या हंगामात सुमारे १४ हजार हेक्टरने वाढ होण्याचे संकेत कृषी विभागाकडून मिळाले आहे. जिल्ह्यात चना व गव्हाचा पेरा वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यावरून दिसत आहे. यंदाच्या हंगामात गव्हाचा पेरा २५ हजार हेक्टरवर तर चन्याचा पेरा ४२ हजार हेक्टरवर होणार असल्याचे आराखड्यात सांगण्यात येत आहे. गत हंगामात गव्हाचा पेरा २१ हजार ९५० तर चन्याचा पेरा ३७ हजार ९१ हेक्टरवर झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. यंदा जिल्ह्यातील जलाशयात पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिंचन करण्यास अडचण जाणार नसल्याने गहू व हरभऱ्याचा पेरा वाढण्याचे संकेत कृषी विभागाने केलेल्या नियोजनातून दिले आहेत.रबी हंगामाकरिता शेतजमिनी तयार करण्याच्या कामात बळीराजा व्यस्त झाला असून रबीच्या बियाण्यांकरिता त्याची धावपळ सुरू झाली आहे. मात्र खरीप हंगामात सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नसल्याने त्याच्या गाठीला शिल्लक नसल्याने रबीचा पेरा कसा करावा या विवंचनेत तो असल्याचे दिसून येत आहे. यातही महाबीजकडून होणारा बियाण्यांचा पुरवठा अत्यल्प असल्याने बियाण्यांकरिता भटकंती करण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. ऐन हंगामात बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांची होत असलेली ही लूट थांबवावी अशी मागणी करण्यात येत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी) इतर क्षेत्रातही वाढीचे संकेत रबी हंगामात गहू व चना या मुख्य पिकांसह ज्वारीचा पेराही करण्यात येतो. गत हंगामात जिल्ह्यात १ हजार १४९ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला होता. तो यंदा अडीच हजार हेक्टरवर होणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त करडई, तिळ, मोहरी, जवस, आदी पिकांचीही लागवड करण्यात येणार आहे. त्याचे क्षेत्रही वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनावरून दिसत आहे. महाबीजकडून मिळणार निम्मे बियाणे शेतकऱ्यांना कमी दरात व विश्वासाचे बियाणे म्हणून शासनाच्या महाबीजच्या बियाण्यांकडे पाहिले जाते. मात्र या कंपनीकडून जिल्ह्यात आवश्यक असलेल्या बियाण्यांचा पुरवठा करण्यात असमर्थता दर्शविण्यात येते. जिल्ह्यात गव्हाच्या २१ हजार ४५० क्विंटल बियाण्यांची गरज असताना महाबीजकडून केवळ ६ हजार ७०० क्विंटल बियाणे पुरविण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे. हरभऱ्याची १५ हजार ६४० क्विंटल बियाण्यांची गरज असताना महाबीजकडून ४ हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुुळे शेतकऱ्यांना बियाण्यांकरिता खासगी दुकानात चकरा मारण्याची वेळ येणार असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाल्याचे दिसत आहे.