शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

विरूळच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 18, 2017 00:33 IST

नागरिकांना पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळावे या हेतुने १५ वर्षांपूर्वी येथे जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली.

लाखोंंचा खर्च व्यर्थ : ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/विरूळ (आकाजी) : नागरिकांना पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळावे या हेतुने १५ वर्षांपूर्वी येथे जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली. याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च केले. मात्र येथील जलशुद्धीकरण केंद्र गत दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभार याला कारणीभूत ठरल्याचे दिसते. विरुळ या एकाच गावासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. पाच वर्ष सदर केंद्र सुरळीत चालले. यानंतर जलशुद्धीकरण केंद्र बंद स्थितीत आहे. १५ वर्षांपूर्वी दिवंगत खासदार प्रभा राव यांच्या प्रयत्नातून येथे जलशुद्धीकरण केंद्र निर्मितीचा प्रस्ताव मान्य झाला. याकरिता लागणारा लाखो रुपयाचा निधी त्यांनी मिळवुन दिला होता. त्यावेळी जलशुद्धीकरण केंद्र आणि वर्धा नदीवरुन गावाला पाणीपुरवठा अशा दोन महत्वकांक्षी योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील ग्रामस्थांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्याची हमी मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. यानंतर या दोन्ही योजना काही वर्ष सुरळीत चालल्या. प्रशासनाकडे असलेला नियोजनाचा अभाव या योजना बंद पडण्यास कारणीभूत ठरला. लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र दहा वर्षांपासून भंगार अवस्थेत पडुन आहे. तसेच या केंद्राला वर्धा नदीवरुन होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. विरुळ वासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. ग्रामपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर खोदली असली तरी ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना अशुध्द पाणी पिण्यात आल्याने जलजन्य आजार उद्भवतात. गावात जलशुद्धीकरण केंद्र असताना नागरिकांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करुन येथील जलशुद्धीकरण सुरू करण्याची मागणी आहे. या केंद्राची देखभाल दुरुस्ती नसल्याने येथील साहित्य चोरुन नेले आहे. जलशुध्दीकरण केंद्राची इमारत दहा वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने खंडर झाले आहे. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्र दहा वर्षांपासून बंद विजेचे लाखो रुपयाचे देयक थकीत असल्याने तसेच तांत्रिक बाबीमुळे येथील जलशुध्दीकरण केंद्र दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. येथील ग्रामपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बांधली असून येथून ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ येथील ग्रामस्थांना सोसावी लागते. ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी लाखो रुपये खर्च करुन बांधलेले जलशुध्दीकरण केंद्र बंद असल्याने ग्रामस्थांना अशुध्द पाणी प्यावे लागते.