शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विरूळच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 18, 2017 00:33 IST

नागरिकांना पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळावे या हेतुने १५ वर्षांपूर्वी येथे जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली.

लाखोंंचा खर्च व्यर्थ : ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/विरूळ (आकाजी) : नागरिकांना पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळावे या हेतुने १५ वर्षांपूर्वी येथे जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली. याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च केले. मात्र येथील जलशुद्धीकरण केंद्र गत दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभार याला कारणीभूत ठरल्याचे दिसते. विरुळ या एकाच गावासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. पाच वर्ष सदर केंद्र सुरळीत चालले. यानंतर जलशुद्धीकरण केंद्र बंद स्थितीत आहे. १५ वर्षांपूर्वी दिवंगत खासदार प्रभा राव यांच्या प्रयत्नातून येथे जलशुद्धीकरण केंद्र निर्मितीचा प्रस्ताव मान्य झाला. याकरिता लागणारा लाखो रुपयाचा निधी त्यांनी मिळवुन दिला होता. त्यावेळी जलशुद्धीकरण केंद्र आणि वर्धा नदीवरुन गावाला पाणीपुरवठा अशा दोन महत्वकांक्षी योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील ग्रामस्थांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्याची हमी मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. यानंतर या दोन्ही योजना काही वर्ष सुरळीत चालल्या. प्रशासनाकडे असलेला नियोजनाचा अभाव या योजना बंद पडण्यास कारणीभूत ठरला. लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र दहा वर्षांपासून भंगार अवस्थेत पडुन आहे. तसेच या केंद्राला वर्धा नदीवरुन होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. विरुळ वासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. ग्रामपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर खोदली असली तरी ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना अशुध्द पाणी पिण्यात आल्याने जलजन्य आजार उद्भवतात. गावात जलशुद्धीकरण केंद्र असताना नागरिकांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करुन येथील जलशुद्धीकरण सुरू करण्याची मागणी आहे. या केंद्राची देखभाल दुरुस्ती नसल्याने येथील साहित्य चोरुन नेले आहे. जलशुध्दीकरण केंद्राची इमारत दहा वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने खंडर झाले आहे. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्र दहा वर्षांपासून बंद विजेचे लाखो रुपयाचे देयक थकीत असल्याने तसेच तांत्रिक बाबीमुळे येथील जलशुध्दीकरण केंद्र दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. येथील ग्रामपंचायतने पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बांधली असून येथून ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ येथील ग्रामस्थांना सोसावी लागते. ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी लाखो रुपये खर्च करुन बांधलेले जलशुध्दीकरण केंद्र बंद असल्याने ग्रामस्थांना अशुध्द पाणी प्यावे लागते.