शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

४,८८६ तूर उत्पादक आॅनलाईन नोंदीच्या रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:38 IST

शासकीय तूर खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले. यात तूर खरेदी बंद करण्याच्या काळात अचचानक आॅनलाईन नोंदी करण्याच्या पद्धतीत बिघाड आल्याने जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८८६ तूर उत्पादकांची नोंद झाली नाही.

ठळक मुद्देअनेकांची तूर घरीच पडून : कागदपत्र सादर केलेल्यांकडून नोंदणीची मागणी

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा - शासकीय तूर खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले. यात तूर खरेदी बंद करण्याच्या काळात अचचानक आॅनलाईन नोंदी करण्याच्या पद्धतीत बिघाड आल्याने जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८८६ तूर उत्पादकांची नोंद झाली नाही. परिणामी त्यांच्या तुरीला शासकीय दर मिळण्याची आशा मावळली आहे.गोदामाची समस्या आल्याने शासनाच्यावतीने तूर खरेदी बंद करण्यात आली. यानंतर बºयाच शेतकऱ्यांची तूर घरीच पडून होती. यामुळे बरीच ओरड झाली. यामुळे शासनाच्यावतीने बंद करण्यात आलेली तूर खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. या खरेदीला १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यातही ज्या शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंद झाली आहे त्यांचीच तूर खरेदी करण्यात येणार आहे. असलेल्या मुदतीचा कालावधी अत्यल्प असल्याने या काळात तूर खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे.१८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद झाली. खरेदी अचनाक बंद झाल्याने शेतकºयांत चांगलाच असंतोष पसरला. याच काळात आॅनलाईन नोंदणीही बंद झाली. परिणामी नोंदणी केंद्रावर पेरीपत्रक आणि इतर कागदपत्र देवूनही अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या नाही. यामुळे त्यांच्या तुरीला शासकीय दर मिळण्याची आशा मावळल्या. जिल्ह्यात असलेल्या सात खरेदी केंद्रावर अनेक शेतकºयांनी कागदपत्र देवून ठेवले आहे. त्यांची अडचण होणार असल्याचे दिसून आले आहे.या नोंदीकरिता पुलगाव शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ते निवळण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले. या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदी करून तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले. तशी मुदतवाढ करण्याची मागणी मार्केटंीग अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यवर काय मार्ग निघतो याकडे तूर उत्पादक शेतकºयाच्या नजरा लागल्या आहेत.तुरीच्या समस्येने चणा खरेदी प्रभावितसध्या तूर खरेदीची समस्या डोके वर काढून आहे. नोंदीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची नोंद करण्याची मागणी जोर धरत आहे. तर नोंद झालेल्या अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे बाकी आहे. मुदत संपण्याकरिता नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात खरच एवढ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या सर्व प्रकारामुळे चण्याची खरेदीही प्रभावित होत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या तीन केंद्रावरून आतापर्यंत १७४ शेतकऱ्यांकडून २,८८५ क्विंटल चणा खरेदी झाली आहे. तर आतापर्यंत ९७५ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. त्यांचा चणा खरेदी करणे अद्याप बाकी आहे. वर्धा, पुलगाव, देवळी आणि समुद्रपूर या केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची आहे.नोंदणी झालेल्या ३,३२६ शेतकऱ्यांची तूर घरीचतूर खरेदीची मुदतवाढ झाल्याने जिल्ह्यातील सातही केंद्रांवर पुन्हा खरेदी सुरू झाली. या केंद्रांवर जिल्ह्यात तब्बल ९ हजार ६३३ शेतकऱ्यांची नोंद केली आहे. त्यापैकी ६ हजार ३०७ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ७२ हजार ३९०.८५ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. नोंद झालेल्या तब्बल ३ हजार ३२६ शेतकऱ्यांची तूर अद्याप घरीच पडून असून तिची खरेदी होणे बाकी आहे. यात आता पुन्हा नोंदी होणे शिल्लक आहे. यामुळे तूर खरेदीत अनागोंदी झाल्यास प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटून पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.