शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

४,८८६ तूर उत्पादक आॅनलाईन नोंदीच्या रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:38 IST

शासकीय तूर खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले. यात तूर खरेदी बंद करण्याच्या काळात अचचानक आॅनलाईन नोंदी करण्याच्या पद्धतीत बिघाड आल्याने जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८८६ तूर उत्पादकांची नोंद झाली नाही.

ठळक मुद्देअनेकांची तूर घरीच पडून : कागदपत्र सादर केलेल्यांकडून नोंदणीची मागणी

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा - शासकीय तूर खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले. यात तूर खरेदी बंद करण्याच्या काळात अचचानक आॅनलाईन नोंदी करण्याच्या पद्धतीत बिघाड आल्याने जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८८६ तूर उत्पादकांची नोंद झाली नाही. परिणामी त्यांच्या तुरीला शासकीय दर मिळण्याची आशा मावळली आहे.गोदामाची समस्या आल्याने शासनाच्यावतीने तूर खरेदी बंद करण्यात आली. यानंतर बºयाच शेतकऱ्यांची तूर घरीच पडून होती. यामुळे बरीच ओरड झाली. यामुळे शासनाच्यावतीने बंद करण्यात आलेली तूर खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. या खरेदीला १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यातही ज्या शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंद झाली आहे त्यांचीच तूर खरेदी करण्यात येणार आहे. असलेल्या मुदतीचा कालावधी अत्यल्प असल्याने या काळात तूर खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे.१८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद झाली. खरेदी अचनाक बंद झाल्याने शेतकºयांत चांगलाच असंतोष पसरला. याच काळात आॅनलाईन नोंदणीही बंद झाली. परिणामी नोंदणी केंद्रावर पेरीपत्रक आणि इतर कागदपत्र देवूनही अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या नाही. यामुळे त्यांच्या तुरीला शासकीय दर मिळण्याची आशा मावळल्या. जिल्ह्यात असलेल्या सात खरेदी केंद्रावर अनेक शेतकºयांनी कागदपत्र देवून ठेवले आहे. त्यांची अडचण होणार असल्याचे दिसून आले आहे.या नोंदीकरिता पुलगाव शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ते निवळण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले. या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदी करून तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले. तशी मुदतवाढ करण्याची मागणी मार्केटंीग अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यवर काय मार्ग निघतो याकडे तूर उत्पादक शेतकºयाच्या नजरा लागल्या आहेत.तुरीच्या समस्येने चणा खरेदी प्रभावितसध्या तूर खरेदीची समस्या डोके वर काढून आहे. नोंदीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची नोंद करण्याची मागणी जोर धरत आहे. तर नोंद झालेल्या अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे बाकी आहे. मुदत संपण्याकरिता नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात खरच एवढ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या सर्व प्रकारामुळे चण्याची खरेदीही प्रभावित होत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या तीन केंद्रावरून आतापर्यंत १७४ शेतकऱ्यांकडून २,८८५ क्विंटल चणा खरेदी झाली आहे. तर आतापर्यंत ९७५ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. त्यांचा चणा खरेदी करणे अद्याप बाकी आहे. वर्धा, पुलगाव, देवळी आणि समुद्रपूर या केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची आहे.नोंदणी झालेल्या ३,३२६ शेतकऱ्यांची तूर घरीचतूर खरेदीची मुदतवाढ झाल्याने जिल्ह्यातील सातही केंद्रांवर पुन्हा खरेदी सुरू झाली. या केंद्रांवर जिल्ह्यात तब्बल ९ हजार ६३३ शेतकऱ्यांची नोंद केली आहे. त्यापैकी ६ हजार ३०७ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ७२ हजार ३९०.८५ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. नोंद झालेल्या तब्बल ३ हजार ३२६ शेतकऱ्यांची तूर अद्याप घरीच पडून असून तिची खरेदी होणे बाकी आहे. यात आता पुन्हा नोंदी होणे शिल्लक आहे. यामुळे तूर खरेदीत अनागोंदी झाल्यास प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटून पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.