शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:48 IST

खरीप हंगामातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर यंदा बोडअळीचे संकट आले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे.

ठळक मुद्देसीसीआयला १२०० क्विंटल कापूस : फेडरेशनचे नऊ केंद्र मुहूर्ताविनाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर यंदा बोडअळीचे संकट आले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल १६.७२ लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्याच घशात गेला असून सीसीआयला केवळ १२०० क्विंटल कापूस खरेदी करता आला आहे.पावसाच्या कमी-अधिक प्रमाणाचा सोयाबीनवर विपरित परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवर भर दिला. जिल्ह्यात कपाशीची सर्वाधिक लागवड करण्यात आली. पेरा वाढल्याने तथा बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यंदा कपाशीचे पीक भरघोस येईल, अशी अपेक्षा होती; पण बीटी बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केला. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचा कापूस एक-दोन वेच्यातच संपला. काही शेतकऱ्यांना शेतात नांगर चालवावा लागला. अनेक भागांतील शेती आजही पांढरी दिसून येते; पण अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे कापूस चिकट आला आहे. तो वेचण्यास जड असल्याने मजूरही मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. आता तर मजुरांची मजुरी वाढल्याने कापूस वेचावा की नको, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल असून शेती मात्र पांढरी झाल्याचे दिसून येत आहे.या स्थितीतही बाजारपेठेत कापसाची आवक मात्र बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्यात आजपर्यंत १६ लाख ७३ हजार ४७५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यातील केवळ ११९७ क्विंटल कापूस सीसीआयद्वारे खरेदी करण्यात आला आहे. उर्वरित १६ लाख ७२ हजार २७६ क्विंटल कापूस बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. यंदा शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; पण अद्यापही भाववाढ न झाल्याने तथा आर्थिक हतबलता लक्षात घेत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असल्याची स्थिती आहे.सीसीआयच्या चार केंद्रांवर खरेदी शून्यवर्धा जिल्ह्यात सीसीआयकडून सेलू, सिंदी (रेल्वे), हिंगणघाट, देवळी, कांढळी आणि वायगाव येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; पण यातील केवळ दोनच केंद्रांवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणला. उर्वरित चार केंद्रांमध्ये खरेदीचा मुहूर्तही साधता आलेला नाही. सेलू केंद्रावर १ हजार ६७ क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे केवळ १३५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयकडून ठरलेला ५०५० एवढाच भाव मिळत असल्याने आणि व्यापारी रोखीने चुकारे तथा अधिक भाव देत असल्याने शेतकऱ्यांचा कलही व्यापाºयांना कापूस विकण्याकडेच असल्याचे दिसून येते.५३ व्यापाऱ्यांनी खरेदी केला कापूसकृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ५३ खरेदीदार संस्था, व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला आहे. यात आर्वी, आष्टी, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर बाजार समिती अंतर्गत येणाºया व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.