शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

जिल्ह्यात १६.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:48 IST

खरीप हंगामातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर यंदा बोडअळीचे संकट आले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे.

ठळक मुद्देसीसीआयला १२०० क्विंटल कापूस : फेडरेशनचे नऊ केंद्र मुहूर्ताविनाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर यंदा बोडअळीचे संकट आले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल १६.७२ लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्याच घशात गेला असून सीसीआयला केवळ १२०० क्विंटल कापूस खरेदी करता आला आहे.पावसाच्या कमी-अधिक प्रमाणाचा सोयाबीनवर विपरित परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवर भर दिला. जिल्ह्यात कपाशीची सर्वाधिक लागवड करण्यात आली. पेरा वाढल्याने तथा बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यंदा कपाशीचे पीक भरघोस येईल, अशी अपेक्षा होती; पण बीटी बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केला. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचा कापूस एक-दोन वेच्यातच संपला. काही शेतकऱ्यांना शेतात नांगर चालवावा लागला. अनेक भागांतील शेती आजही पांढरी दिसून येते; पण अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे कापूस चिकट आला आहे. तो वेचण्यास जड असल्याने मजूरही मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. आता तर मजुरांची मजुरी वाढल्याने कापूस वेचावा की नको, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल असून शेती मात्र पांढरी झाल्याचे दिसून येत आहे.या स्थितीतही बाजारपेठेत कापसाची आवक मात्र बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्यात आजपर्यंत १६ लाख ७३ हजार ४७५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यातील केवळ ११९७ क्विंटल कापूस सीसीआयद्वारे खरेदी करण्यात आला आहे. उर्वरित १६ लाख ७२ हजार २७६ क्विंटल कापूस बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. यंदा शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; पण अद्यापही भाववाढ न झाल्याने तथा आर्थिक हतबलता लक्षात घेत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असल्याची स्थिती आहे.सीसीआयच्या चार केंद्रांवर खरेदी शून्यवर्धा जिल्ह्यात सीसीआयकडून सेलू, सिंदी (रेल्वे), हिंगणघाट, देवळी, कांढळी आणि वायगाव येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; पण यातील केवळ दोनच केंद्रांवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणला. उर्वरित चार केंद्रांमध्ये खरेदीचा मुहूर्तही साधता आलेला नाही. सेलू केंद्रावर १ हजार ६७ क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे केवळ १३५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयकडून ठरलेला ५०५० एवढाच भाव मिळत असल्याने आणि व्यापारी रोखीने चुकारे तथा अधिक भाव देत असल्याने शेतकऱ्यांचा कलही व्यापाºयांना कापूस विकण्याकडेच असल्याचे दिसून येते.५३ व्यापाऱ्यांनी खरेदी केला कापूसकृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ५३ खरेदीदार संस्था, व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला आहे. यात आर्वी, आष्टी, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर बाजार समिती अंतर्गत येणाºया व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.