शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘रुंद वरंबा सरी’ पद्धतीने होणार कडधान्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

शेतकरी बहूता विविध पिकांची उताराला आडवी पेरणी करता. या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा सरी पद्धत कशी उपयुक्त आहे याची माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया शेतकरी क्लस्टर (गट) ला नि:शुल्क बियाणे कृषी विभागाकडून दिले जाते. इतकेच नव्हे तर सदर योजना वर्धा जिल्ह्यात किती हेक्टवर राबविण्यात यावी यासाठीचे उद्दिष्टही कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाने कसली कंबर : गावागावात शेतकरी गटांना दिली जातेय माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अल्प खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय सुरक्षा कडधान्य अभियान अंतर्गत रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने जिल्ह्यातील काही भागात यंदा कडधान्याची लागवड होणार आहे. शासनाच्या या योजनेच्या जास्तीत जास्त शेतकरी गटांनी लाभ घ्यावा, यासाठी सध्या कृषी विभागाने कंबर कसली असून सध्या गावागावात जाऊन कृषी विभागाचे अधिकारी या योजनेचे फायदे शेतकऱ्यांना समजवित आहेत.शेतकरी बहूता विविध पिकांची उताराला आडवी पेरणी करता. या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा सरी पद्धत कशी उपयुक्त आहे याची माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया शेतकरी क्लस्टर (गट) ला नि:शुल्क बियाणे कृषी विभागाकडून दिले जाते. इतकेच नव्हे तर सदर योजना वर्धा जिल्ह्यात किती हेक्टवर राबविण्यात यावी यासाठीचे उद्दिष्टही कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासह जास्तीत जास्त शेतकरी गटांना या योजनेचा फायदा देण्यासाठी सध्या कृषी विभागाकडून प्रयत्न होत आहेत.वर्धा जिल्ह्याला सलग तूर गट प्रात्येक्षिक १०० हेक्टर, सोयाबीन अधिक तूर असे आंतर पीक ६०० हेक्टर तर खरीप ज्वारी नंतर चणा पीक पद्धतीवर आधारीत यासाठी ८० हेक्टरचे उद्दिष्ट यंदा मिळाले आहे. त्यासाठी अनुक्रमे १२.५० क्विंटल तूर, ३० क्विंटल तूर व ४५० क्विंटल सोयाबीन तसेच ५ क्विंटल तुरीचे बियाणे जिल्हा कृषी विभागाला प्राप्त झाले असून ते तालुकास्तरावर पोहोचविण्यात आले आहे.वायफड येथे पार पडले प्रात्यक्षिकवर्धा तालुक्यातील वायफड येथे भावी युवा शेतकरी गटाला कृषी विभागामार्फत बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय तुषार घायवट यांच्या शेतात सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने कशी लागवड करायची याचे प्रात्यक्षिक शेतकºयांना करून दाखविण्यात आले. सदर प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी पी. ए. घायतिडक, एस. एस. धुमणे आदींची उपस्थिती होती.किडीचा प्रादुर्भाव झाल्यास अनुदानरुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड केलेल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकºयाला एकरी २४५ रुपये अनुदान किटकनाशक खरेदी करण्यासाठी दिले जाते. तर निंबोळी अर्क तयार करण्यासाठी एकरी १०० रुपये अनुदान दिले जाते.असे आहे प्रोत्साहनपर अनुदानरुंद वरंबा सरी पद्धतीने पीक लागवड केलेल्या शेतकºयाला एकरी २०० ते ५०० रुपये अनुदान मिळते. आंतर पीक घेणाºयाला २०० तर सलग तूर पीक घेणाºयाला एकरी ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जात आहे.

टॅग्स :agricultureशेती