शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

सार्वजनिक स्थळ आणि शासकीय कार्यालयातील पिचकाऱ्या कायमच

By admin | Updated: January 11, 2017 00:59 IST

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने अपराध आहे. याकरिता दंडात्मक कार्यवाहीचे प्रावधान असले

कायदा बासनात : कारवाईकरिता तक्रारच नसल्याची सबब वर्धा : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने अपराध आहे. याकरिता दंडात्मक कार्यवाहीचे प्रावधान असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो कागदावरच असल्याचे दिसून आले आहे. हा कायदा कडक करून त्यात दंडाची रक्कम वाढविली तरी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषत: शासकीय कार्यालयात उडणाऱ्या पिचकाऱ्यांवर याचा कुठलाही परिणाम झाला नसून त्या कायमच असल्याचे दिसत आहे. हा कायदा असताना हिंगणघाट येथील राज्य परिवहन विभागाच्या बसस्थानकावर एसटी बसची वेळ दाखविणारा फलक नागरिकांकसह परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी उडविलेल्या खर्ऱ्याच्या पिचकाऱ्यांत हरविला होता. येथील पर्यावरण संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोहिमेद्वारे स्वच्छ केला. मात्र बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी येत थुंकणाऱ्यांवर कुठलीही कार्यवाही बसस्थानक परिसरात झाल्याचे ऐकिवात नाही. येथेच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात अशी कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी सुशिक्षित असताना त्यांना इथे थुंकू नये असे फलक लावण्याची वेळ येते यापेक्षा दुसरे दुर्भाग्य कोणते, असे बोलले जाते. जेथे फलक लावण्यात येते तिथेच थूंकण्यात येते. शासकीय कार्यालयात गेले असता कार्यालयातील एक ना एक कोपरा लाल रंगाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला दिसल्याशिवाय राहत नाही. शासकीय कार्यालयातच या कायद्याचे उलंघण होत आहे. एवढेच नाही तर या कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे अधिकार ज्यांना आहे त्यांच्याकडूनही त्याचे उलंघण होत असल्याचे समोर आले आहे. केवळ सार्वजनिक ठिकाणी थुंकणेच नाही तर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरण कायद्याचाही अंमल जिल्ह्यात नसल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात पोलिसांकडे कुठलीही तक्रार झाली नसल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे कायदे करूनही त्यावर अंमल होत नसल्याचे दिसून आले आहे. या कायद्यांसंदर्भात नव्याने जनजागृती अभियाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी) हिंगणघाट येथील बसस्थानकावर पर्यावरण संरक्षण संस्थेने केला वेळापत्रकाचा फलक स्वच्छ हिंगणघाट - शहरात येणारा नवखा माणूस पहिले बसस्थानकावरच येतो. यामुळे आपल्या शहराची एक चांगली ओळख निर्माण होण्याकरिता निदान बसस्थानक तरी स्वच्छ असावे, या उद्देशाने पर्यावरण संरक्षण संस्थेच्यावतीने प्रत्येक रविवारी अशी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे येथे येणाऱ्या नागरिकांत आता स्वच्छतेबाबत जागृती निर्माण झाल्याचे दिसत आहे. कचरा हा केवळ कचरा कुंडीत टाकण्यात येतो. ही मोहीम काही प्रमाणात सार्थकी ठरत असल्याचे संस्थेचे अभिजित डाखोरे यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गतच बसस्थानकावरील अस्वच्छ दिसणारा वेळापत्रकाचा फलक स्वच्छ करण्यात आला. मोहिमेला आशिष भोयर, अभिजित डाखोरे, ज्ञानेश चौधरी, रमेश झाडे, प्रदीप गिरडे, छत्रपती भोयर, सचीन थूल व योगेश तपासे आणि सहकाऱ्यांनी हातभार लावला.(तालुका प्रतिनिधी)