शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:46 IST

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन : नुकसान पाहून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.वादळ मेघ गर्जनेसह शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून सरकारतर्फे आर्थिक मदत मिळण्यात यावी अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसवेक सौरभ राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केली आहे. हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकºयांच्या शेतातील उभी पिके नष्ट झाली आहे. त्यात भाजीपाला गहू, हरभरा, कांदा, संत्रा, आंबा, मोसंबी इत्यादी पिकाचा समावेश आहे. तसेच वादळामुळे घराचे छप्पर उडून नुकसान झाले आहे.वीज पडल्यामुळे अनेक जनावरे मृत पावली तरी सर्व पिकांचे व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी. सध्या ताहीर झालेली मदत अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना नुकसानीच्या आधारावर आर्थिक मदतीचा हात घ्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना रा.यु.काँ. पक्षाचे अध्यक्ष गौरव घडे, उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, भारत मेश्राम, सुनील ठाकरे, हरिष काळे, शुभम थुटे, अमित कोपरकर, अमोल त्रीपाठी, रिषभ धनरेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोफत वीज व बियाणे द्यातेलंगाणा सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत औषध व २४ तास मोफत वीज देण्यात यावी तसेच महाराष्ट्र सरकारने रोजगार हमीच्या कामात निंदन खुरपण, डवरणं, वखरण, नांगरने, ट्रॅक्टरने नांगरनी इत्यादी घटकांचा समावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात घ्यावा, तसेच शेतकऱ्यांसाठी आरक्षणही जाहीर करण्यात यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.