शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

रात्रीपेक्षा दिवसा वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, या आशेवर रबीची पेरणीपूर्व मशागत करून नव्या जोमाने कामाला लागला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जीवावर उदार होऊन करावे लागतेच ओलित

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : वीज महावितरण कंपनीच्या वतीने आठवड्यातून तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले आहे. रात्री जीवावर उदार होऊनच ओलित करावे लागत आहे. दिवसाच वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर मोडलेला शेतकरी उसनवारी आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत रबीच्या हंगामाकडे वळला आहे. खरिपाची तूट रबीमध्ये भरून निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, या आशेवर रबीची पेरणीपूर्व मशागत करून नव्या जोमाने कामाला लागला आहे. मात्र आठवड्यातून तीन दिवस दिवस वीजपुरवठा आणि आठवड्यातून चार दिवस रात्री वीजपुरवठा केला जात असून दिवसभर शेतात राबायचे आणि रात्री पुन्हा शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जायचे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकऱ्यांचा कुणीच कैवारी नाही, अशी भावना तो व्यक्त करीत आहे.नव्याने आलेल्या सरकारकडून परिसरातील शेतकऱ्यांना आता तरी दिवसा वीजपुरवठा मिळेल, ही आस लागली असून निदान रात्रीला तरी शांतपणे झोप घेऊ, या आशेवर बळीराजा बसला आहे.रबी हंगामातील पिकांची लागवड सुरू असून दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री १० नंतर पुन्हा शेतात जाऊन पिकांना पाणी द्यायचे. यामुळे शेतकरी यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत असून महावितरण कंपनीने दिवसभर वीजपुरवठा करावा; जेणेकरून शेतकºयांची हेळसांड होणार नाही- अशोक सुपारे, माजी पं. स. सदस्य, अल्लीपूर.शेतकºयाला संपूर्न जगाचा पोशिंदा म्हटले जाते, पण या पोशिंद्याचीच शासन, प्रशासन हेडसांड करते. एवढ्या थंडीत पिकांना पाणी द्यायला जावे लागते. एकटे शेतात रात्री काम करणे जीवावर बेतू शकते याकडे लोकप्रतिनिनी लक्ष द्यावे.- पांडुरंग ढगे, शेतकरी अल्लीपुर.

टॅग्स :electricityवीज