शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

हेक्टरी ५० हजारांची नुकसाई भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:38 IST

अवकाळी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना शेतमालाची नुकसान भरपाई व पडझड झालेल्या घरांच्या मालकांना त्वरीत आर्थिक मदत करण्यात यावी.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवकाळी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतमालाची नुकसान भरपाई व पडझड झालेल्या घरांच्या मालकांना त्वरीत आर्थिक मदत करण्यात यावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.गत तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय काही ठिकाणी झोपड्यांवरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचे कुटुंबच उघड्यावर आले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाला झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सर्वेक्षणाचे काम सुरू असून सर्वेक्षणाची कामे झटपट पूर्ण करीत नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पवनार परिसरातील गणेश पाटील, झिबल हजारे, अरूण बोकडे, शंकर हिवरे, मंगेश हिवरे, योगराज वानखेडे यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असताना अद्याप शासकीय यंत्रणेमार्फत पाहणी झाली नाही. नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रूपये शासकीय मदत देण्यात यावी. शिवाय ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना २५ हजार रूपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश सराफ, तालुका प्रमुख गणेश इखार, शहर प्रमुख विशाल वैरागडे, युवा सेनेचे तालुका प्रमुख मयुर जोशी, माजी उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, दिलीप भुजाडे, विशाल व्यास, कुणाल मोरे, संगीता खोडे, बाळा साठोणे, राजू साठोणे, दिलीप धामणकर, गजानन ढबाले, रोहित खोडे आदींची उपस्थिती होती.मदत देऊन दिलासा द्या - शे.स्वा.क्रां. कृती समितीवर्धा- बोंडअळीच्या संकटाने कापसाचे पीक पूर्णत: गेले असताना अवकाळी पाऊस व गारपिटाने तूर, चणा, गहू, मका व फळभाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची गंभीर दखल घेवून शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे. निवेदन देताना समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर किनकर, शरद कांबळे, अनिल भलमे, मोहन लांडगे, अनूप उघडे, मुकूंद गावंडे, रामभाऊ झिंगे, महादेव वाघमारे आदींची उपस्थिती होती. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी ३० हजार रूपये शासकीय मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.नुकसानग्रस्त शेताची पाहणी करा - शेतकरी संघटनेची मागणीचिकणी (जामणी) - गारपीट व अवकाळी पावसामुळे देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही अनेक नुकसानग्रस्त भागांची कृषी वा महसूल विभागाने पाहणी केली नाही. झालेल्या नुकसानीची पाहणी करून सरकारने नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. शेताची पाहणी करते वेळी अधिकाºयांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन पाहणी करावी. यामुळे झालेल्या नुकसानाची खरी माहिती मिळेल. शिवाय नुकसानग्रस्त एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्यध्यक्ष सतीश दाणी यांनी केली आहे.