शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रास्तारोकोतून हाथरसच्या घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. शिवाय केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : पाऊण तास रोखला नागपूर-अमरावती महामार्ग, आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेला प्रकार निंदनिय असून पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना वाटेत अडविण्यात आले. या दोन्ही घटनांचा निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने रविवारी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. शिवाय केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तर काही वेळानंतर आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात सचिन वैद्य, विजय सोनटक्के, अंगद गिरिधर, अक्षय राठोड, विशाल बोके, रज्जाक अली, सुबोध गोंडसे, सुरज मुंदरे यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.तासभरानंतर सुरळीत झाली वाहतूकआंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन टायर जाळल्याने नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून जळत्या टायर विझवून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवाय महामार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तासानंतर सुरळीत केली.केंद्राच्या कृषी विधेयकास दर्शविला विरोधराष्ट्रीय महामार्गावरील टि-पॉर्इंटवर रस्तारोको आंदोलन करणाºया आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी विषयक विधेयकाचाही विरोध केला. शिवाय हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याने ते तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी रेटली.आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून ६८ प्रमाणे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवाय काही वेळानंतर त्यांनी सुटका करण्यात आली आहे.- रवी राठोड, ठाणेदार, पोलीस स्टेशन तळेगाव (श्या.पंत.).हाथरस येथे घडलेला प्रकार, तेथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेत्यांना वाटेत अडविण्यात आले तसेच केंद्र सरकारचे कृषी विधेयक या प्रमुख मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. केंद्र व उत्तरप्रदेशातील योगी सरकार दडपशाहीचा अवलंब करीत असून त्याचा निषेध आम्ही केला.- सचिन वैद्य, जिल्हा समन्वयक, युवा काँग्रेस.

टॅग्स :Strikeसंप