शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

रास्तारोकोतून हाथरसच्या घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. शिवाय केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : पाऊण तास रोखला नागपूर-अमरावती महामार्ग, आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेला प्रकार निंदनिय असून पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना वाटेत अडविण्यात आले. या दोन्ही घटनांचा निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने रविवारी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. शिवाय केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तर काही वेळानंतर आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात सचिन वैद्य, विजय सोनटक्के, अंगद गिरिधर, अक्षय राठोड, विशाल बोके, रज्जाक अली, सुबोध गोंडसे, सुरज मुंदरे यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.तासभरानंतर सुरळीत झाली वाहतूकआंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन टायर जाळल्याने नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून जळत्या टायर विझवून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवाय महामार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तासानंतर सुरळीत केली.केंद्राच्या कृषी विधेयकास दर्शविला विरोधराष्ट्रीय महामार्गावरील टि-पॉर्इंटवर रस्तारोको आंदोलन करणाºया आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी विषयक विधेयकाचाही विरोध केला. शिवाय हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याने ते तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी रेटली.आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून ६८ प्रमाणे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवाय काही वेळानंतर त्यांनी सुटका करण्यात आली आहे.- रवी राठोड, ठाणेदार, पोलीस स्टेशन तळेगाव (श्या.पंत.).हाथरस येथे घडलेला प्रकार, तेथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेत्यांना वाटेत अडविण्यात आले तसेच केंद्र सरकारचे कृषी विधेयक या प्रमुख मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. केंद्र व उत्तरप्रदेशातील योगी सरकार दडपशाहीचा अवलंब करीत असून त्याचा निषेध आम्ही केला.- सचिन वैद्य, जिल्हा समन्वयक, युवा काँग्रेस.

टॅग्स :Strikeसंप