शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

छोट्याशा यंत्राने वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण

By admin | Updated: July 21, 2014 00:18 IST

अनेक वर्षांपासून झाडगाव (गो.) परिसरात रोही आणि रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. या परिसरातील शेतशिवार जंगलाला लागून असल्याने पिकांचे या वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान नित्याचे झाले होते.

वर्धा : अनेक वर्षांपासून झाडगाव (गो.) परिसरात रोही आणि रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. या परिसरातील शेतशिवार जंगलाला लागून असल्याने पिकांचे या वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान नित्याचे झाले होते. यासाठी शेतीला कंपाऊंड लावून विद्युत प्रवाह द्यावा तर जनावरांना मृत्यू ओढावतो आणि शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे यातून मध्यम मार्ग काढताना कंपाऊंड करंट या उपकरणाचा शोध लागला. आज परिसरातील अनेक शेतकरी या तंत्राचा उपयोग करीत असल्याचे या प्रकल्पाचे निर्माते रत्नाकर अवचट सांगतात. झाडगाव (नि.) येथील प्रयोगशील शेतकरी रत्नाकरा अवचट यांचे चन्याचे उभे पीक दोन अडीच वर्षांपूर्वी रोह्याने फस्त केले. यात त्यांचे बरेच नुकसान झाले. आधीपासूनच तांत्रिक वस्तू बनविण्यात त्यांना रस होता. तसेच ग्रामविकास तंत्रनिकेतनच्या अवजार सहाय्य केंद्रातही ते काम करीत असल्याने तो अनुभवही पाठीशी होता. तसेच शेतात विद्यूत प्रवाह खेळता करावा तर जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांनी हलका करंट देणारे व बॅटरीवर चालणारे एक उपकरण विकसित केले. याला त्यांनी कंपाऊंड करंट हे नाव दिले. यात त्यांनी १२ व्होल्टच्या बॅटरीचा उपयोग केला. तसेच कंडेन्सर, इलेक्ट्रॉनिक किट अशा वस्तू वापरून त्यांनी हे यंत्र तयार केले. यासाठी त्यांना जवळपास दोन हजार रुपये खर्च आला. सर्वप्रथम त्यांना आपल्या अडीच एकर शेतातील कंपाऊंडवर याचा प्रयोग करून पाहिला. ते यशस्वी झाले. रोही सारख्या प्राण्यांचा कंपाऊंड तारांना स्पर्श होताच हलकासा विजेचा धक्का लागतो. ज्यामुळे कुठलीही इजा होत नाही, पण रोही दूर पळतात. तसेच एकदा लक्षात आल्यावर पुन्हा प्राणी इकडे फिरकत नसल्याचे अवचट यांनी सांगितले. त्यांचा हा यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडून हे उपकरण आपल्या शेतातील कंपाऊंडवर बसवून घेतले आहे. असुरक्षितता भय आणि अनुकूलता नसेल तर वन्यप्राणी आपला पथमार्ग व जागा बदलतात. या मानसिकतेचा व तत्वाचा उपयोग करून आणि या पासून कोणालाही धोका होणार नाही यांची काळजी घेत आवश्यक ते बदल यात केले आहेत. यामुळे प्राण्यांच्या जीविताला कुठलाही धोका न होता त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण होते.(शहर प्रतिनिधी)