शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

धरणांची सुरक्षा वाऱ्यावर...

By admin | Updated: July 11, 2017 00:55 IST

महाकाळी येथील धरणात गत आठवड्यात चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. असाच प्रकार रविवारी नागपूर येथे घडला.

जिल्हाधिकाऱ्याच्या सूचनेला बगल : कोणीही या, जलतरणाचा आनंद घ्या, अशीच स्थिती अभिनय खोपडे, विजय माहुरे, अरविंद काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धरणात गत आठवड्यात चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. असाच प्रकार रविवारी नागपूर येथे घडला. यात दहा जणांचा बळी गेला. याच पार्श्वभूमिवर ‘लोकमत’ने सोमवारी काही मोठ्या धरणाच्या सुरक्षेबाबत स्टींग आॅपरेशन केले असता यात कोणत्याही धरणावर सुरक्षा नसल्याचे समोर आले आहे. सुरक्षेच्या नावावर केवळ ‘येथे पोहण्यास सक्त मनाई आहे’ असे फलक असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात एकूण १४ जलाशयेवर्धा जिल्ह्यात एकूण १४ जलाशयांची नोंद आहे. यात बोर, महाकाळी, पोथरा यासह काही मध्यम व लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा आढाचा घेतला असता येथे कोणीही या आणी मस्त जलक्रीडा करा, असा प्रकार येथे सुरू असल्याचे दिसून आले आहे. जलाशयांची पातळी वाढल्यास सुरक्षेचा धोका येत्या दिवसात पाऊस आल्यावर या जलाशयात पाण्याची पातळी वाढणार आहे. यामुळे ते आणखीच धोक्याचे होणार आहेत. यामुळे या जलाशयाजवळ सुरक्षा रक्षकांची नेमणूक होणे गरजेचे झाले आहे. या संदर्भात जलाशय असलेल्या भागातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत; मात्र त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. पातळी कमी असल्याने गाळात फसण्याची शक्यता सध्या जिल्ह्यातील जलाशयात असलेली पातळी कमी आहे. यामुळे पाण्यात उतरलेला व्यक्ती गाळात फसण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे धरणात पोहण्याकरिता गेलेल्यांना वरून उडी मारताना अटकाव करण्याची गरज आहे. यामुळे या दिवसात येथे सुरक्षा रक्षकांची नितांत आवश्यकता असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाटबंधारे विभाकडून दुर्लक्षमहाकाळी येथील घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत धरणांवर सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात चर्चा झाली. एचढेच नाही या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या; परंतु त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. बोर व धाम जलशयात पोहणाऱ्यांची संख्या वाढलीसेलू तालुक्याच्या बोर धरणात आणि आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम धरणात सध्या पोहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्ह्यात पडलेल्या अत्यल्प पावसामुळे धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात असला तरी या धरणाच्या भींतीच्या खाली उतरून पोहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. शेकडोच्या संख्येने नागरिक धरणातील साठवलेल्या पाणीसाठ्याजवळ पोहचत असल्याचे दिसून आले. अनेक जण येथे पोहत असताना मोबाईलच्या सहाय्याने चित्रीकरण व सेल्फीही घेतात. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. धरणाच्या भिंतीजवळ पोहणाऱ्यांनी कपडे वाळण्यासाठी ठेवले असल्याचे दिसून आले. धरण परिसरात पाटबंधारे विभागामार्फत कोणताही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिक धरणाच्या पाण्यात सहजपणे प्रवेश करून पोहण्याचे काम करीत आहे. या नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो ही बाब माहीत असूनही याकडे त्यांचे दुर्लक्षच आहे. धरणाच्या मुख्य भिंतीवर पाटबंधारे विभागाने जलशयात पोहू नये, असा फलक लावला असला तरी त्याकडे नागरिकांचे व पर्यटकांचे दुर्लक्ष आहे. जलाशयात पोहण्यास सक्त मनाई असा फलक येथे उभा आहे. मात्र संपूर्ण धरण परिसराची सुरक्षा वाऱ्यावर आहे. शिवाय धाम प्रकल्पातून धरणाच्या भिंतीकडे जात असलेला रस्ता बंद करण्याची गरज आहे. याच मार्गावर अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे.चौकीदार चौकीतून बेपत्तायेथील बोर धरणांवर चौकीदार नियुक्त करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र हा चौकीदार कुठे होता, त्याचा शोध घेवूनही तो सापडला नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महाकाळी येथील घटना घडल्यानंतरच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पाची व्यवस्था बघणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावण्यिात आले होते. त्यांना या घटना टाळण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. तसेच धरणांवर सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. याकडे विभाग प्रमुखांचे दुर्लक्ष झाले असल्यास त्यांना पुन्हा तशा सूचना देण्यात येतील.- मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी महाकाळी धरण परिसरात दामिनी पथक दिवसातून दोन वेळा गस्त घालते. तर खरांगणा पोलिसांकडूनही रोजच या भागात पेट्रोलींग करण्यात येत आहे. यात काही आक्षेपार्र्ह प्रकार दिसल्यास त्यांना फटकारण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे असे असले तरी या भागात पाटबंधारे विभागाकडून सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. - विजय चौधरी, ठाणेदार, पोलीस ठाणे, खरांगणा (मोरांगणा)