शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गावाची समृद्धी ग्रामविकासाचा कळस तर ‘पाणी' म्हणजे पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:25 IST

ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देसुमित वानखेडे : वॉटरकप स्पर्धा २०१९ च्या नियोजनावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.याप्रसंगी पंचायत समिती आर्वीचे उपसभापती प्रा. धर्र्मेंद्र राऊत, विभागीय कृषी अधिकारी सांगाळे , उपविभागीय अधिकारी संदेश ससाणे , गटविकास अधिकारी मडावी, तहसिलदार विजय पवार यांच्या सह पाणी फाऊंडेशनचे समन्वयक व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव उपस्थितीत होते.पाणी फाऊंडेशनच्यावतीने पंचायत समिती आर्वी येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घघाटन सुमित वानखेडे यांनी केले. प्रदर्शनीत दुष्काळाची विदारकता ते दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जलसंधारणाच्या कामाची माहिती दिली जात आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनीचा लाभ घेत आपला परीसर जल समृद्ध करावा असे आवाहन भुषन कडू यांनी केले आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुमित वानखेडे म्हणाले की, गावाची समृद्धी ही पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असून पाणी फाऊंडेशन गावे जल समृद्ध करण्यासाठी एक निमित्त आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तांत्रिक बाबीवर काम केल्यास गावांची पाणी समस्या दुर होऊन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. गेल्या दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झालेल्या गावात परिणाम दिसत आहेत. गावे जल समृद्ध होत आहे. आतापर्यंत दोन वर्षांत काम करणाºया गावांना कुठल्याही बाबींची कमतरता भासू दिली नाही आणि यावर्षी देखील सर्वतोपरी मदत शासन, संस्था व्दारे करण्यात येईल. यावर्षी परत पहीले बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करूया. तरूणांनी जलसंधारणाच्या चळवळींमध्ये सक्रियतेने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बॉक्सशेतकरी कंपनी स्थापन कराशाश्वत विकास करायचा असेल तर सर्व गावकºयांनी एकत्र येऊन शाश्वत विकास साध्य करता येईल. पाणी उपलब्ध असल्यास शेतीतून चांगले पिक घेता येते. उत्पन्न वाढीसाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून स्वत: ची कंपनी स्थापन करून शेतमालाची विक्री बाहेरील उद्योग समुहास थेट करता येईल. आखाती व इतर देशात जैविक उत्पादनाला प्रचंड मागणी आहे, असे वानखेडे म्हणाले.