शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

गावाची समृद्धी ग्रामविकासाचा कळस तर ‘पाणी' म्हणजे पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:25 IST

ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देसुमित वानखेडे : वॉटरकप स्पर्धा २०१९ च्या नियोजनावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.याप्रसंगी पंचायत समिती आर्वीचे उपसभापती प्रा. धर्र्मेंद्र राऊत, विभागीय कृषी अधिकारी सांगाळे , उपविभागीय अधिकारी संदेश ससाणे , गटविकास अधिकारी मडावी, तहसिलदार विजय पवार यांच्या सह पाणी फाऊंडेशनचे समन्वयक व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव उपस्थितीत होते.पाणी फाऊंडेशनच्यावतीने पंचायत समिती आर्वी येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घघाटन सुमित वानखेडे यांनी केले. प्रदर्शनीत दुष्काळाची विदारकता ते दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जलसंधारणाच्या कामाची माहिती दिली जात आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनीचा लाभ घेत आपला परीसर जल समृद्ध करावा असे आवाहन भुषन कडू यांनी केले आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुमित वानखेडे म्हणाले की, गावाची समृद्धी ही पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असून पाणी फाऊंडेशन गावे जल समृद्ध करण्यासाठी एक निमित्त आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तांत्रिक बाबीवर काम केल्यास गावांची पाणी समस्या दुर होऊन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. गेल्या दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झालेल्या गावात परिणाम दिसत आहेत. गावे जल समृद्ध होत आहे. आतापर्यंत दोन वर्षांत काम करणाºया गावांना कुठल्याही बाबींची कमतरता भासू दिली नाही आणि यावर्षी देखील सर्वतोपरी मदत शासन, संस्था व्दारे करण्यात येईल. यावर्षी परत पहीले बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करूया. तरूणांनी जलसंधारणाच्या चळवळींमध्ये सक्रियतेने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बॉक्सशेतकरी कंपनी स्थापन कराशाश्वत विकास करायचा असेल तर सर्व गावकºयांनी एकत्र येऊन शाश्वत विकास साध्य करता येईल. पाणी उपलब्ध असल्यास शेतीतून चांगले पिक घेता येते. उत्पन्न वाढीसाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून स्वत: ची कंपनी स्थापन करून शेतमालाची विक्री बाहेरील उद्योग समुहास थेट करता येईल. आखाती व इतर देशात जैविक उत्पादनाला प्रचंड मागणी आहे, असे वानखेडे म्हणाले.