शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गावाची समृद्धी ग्रामविकासाचा कळस तर ‘पाणी' म्हणजे पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:25 IST

ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देसुमित वानखेडे : वॉटरकप स्पर्धा २०१९ च्या नियोजनावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.याप्रसंगी पंचायत समिती आर्वीचे उपसभापती प्रा. धर्र्मेंद्र राऊत, विभागीय कृषी अधिकारी सांगाळे , उपविभागीय अधिकारी संदेश ससाणे , गटविकास अधिकारी मडावी, तहसिलदार विजय पवार यांच्या सह पाणी फाऊंडेशनचे समन्वयक व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव उपस्थितीत होते.पाणी फाऊंडेशनच्यावतीने पंचायत समिती आर्वी येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घघाटन सुमित वानखेडे यांनी केले. प्रदर्शनीत दुष्काळाची विदारकता ते दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जलसंधारणाच्या कामाची माहिती दिली जात आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनीचा लाभ घेत आपला परीसर जल समृद्ध करावा असे आवाहन भुषन कडू यांनी केले आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुमित वानखेडे म्हणाले की, गावाची समृद्धी ही पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असून पाणी फाऊंडेशन गावे जल समृद्ध करण्यासाठी एक निमित्त आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तांत्रिक बाबीवर काम केल्यास गावांची पाणी समस्या दुर होऊन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. गेल्या दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झालेल्या गावात परिणाम दिसत आहेत. गावे जल समृद्ध होत आहे. आतापर्यंत दोन वर्षांत काम करणाºया गावांना कुठल्याही बाबींची कमतरता भासू दिली नाही आणि यावर्षी देखील सर्वतोपरी मदत शासन, संस्था व्दारे करण्यात येईल. यावर्षी परत पहीले बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करूया. तरूणांनी जलसंधारणाच्या चळवळींमध्ये सक्रियतेने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बॉक्सशेतकरी कंपनी स्थापन कराशाश्वत विकास करायचा असेल तर सर्व गावकºयांनी एकत्र येऊन शाश्वत विकास साध्य करता येईल. पाणी उपलब्ध असल्यास शेतीतून चांगले पिक घेता येते. उत्पन्न वाढीसाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून स्वत: ची कंपनी स्थापन करून शेतमालाची विक्री बाहेरील उद्योग समुहास थेट करता येईल. आखाती व इतर देशात जैविक उत्पादनाला प्रचंड मागणी आहे, असे वानखेडे म्हणाले.