शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जिल्ह्यात सहा ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’चा प्रस्ताव

By admin | Updated: March 21, 2017 01:17 IST

जिल्ह्याचे वनक्षेत्र ९६ हजार हेक्टरमध्ये पसरलेले आहे. या वनपरिक्षेत्रात असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘बायोडायव्हर्सिटी पार्कची’ निर्मिती करण्यात येणार आहे.

जागतिक वन दिन : वनसंपदेचे जतन करण्याकरिता वनविभाग सज्जश्रेया केने वर्धा जिल्ह्याचे वनक्षेत्र ९६ हजार हेक्टरमध्ये पसरलेले आहे. या वनपरिक्षेत्रात असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘बायोडायव्हर्सिटी पार्कची’ निर्मिती करण्यात येणार आहे. सेलूकाटे, पवनार, बोरधरण, सारंगपूरी, गुंजखेडा आणि ढगा येथे या पार्कचे काम प्रस्तावित केले असून यामुळे वनसंपदेत भर पडणार असल्याची माहिती आहे. जागतिक वन दिनानिमित्त जिल्ह्यात अनेक जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. प्रामुख्याने शाळा महाविद्यालयात हरित सेनेच्या समन्वयातून उपक्रम राबविले जातात. वनसंवर्धन आणि संरक्षण ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असून या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. वनविभागाकडून वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जंगलव्याप्त भागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जंगल परिसरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ तेथील रहिवाशांना मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहे. विविध प्रशिक्षण देऊन तेथील रहिवाशांना रोजगार देण्यात येत आहे. शिवाय जंगलव्याप्त भागात औषधीयुक्त झाडांची लागवड करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात ‘फायर अलर्ट सिस्टिम’ कार्यान्वितउन्हाळ्यात जंगलांना आग लागण्याचे प्रमाण वाढते. या घटनांना आळा घालण्यासाठी आणि वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी एफएसआय अंतर्गत ‘फायर अलर्ट सिस्टिम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे जंगलातील ज्या भागात आग लागली असेल तिचे नेमके स्थळ कळण्यास मदत होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे सहजशक्य होते. याकरिता वनकर्मचाऱ्यांना अ‍ॅण्ड्राईड प्रणालीचे स्मार्टफोन देण्यात आले आहे. या फोनवर अलर्ट देऊन आग विझविण्याचा संदेश दिल्या जातो.औषधीयुक्त वनस्पतींच्या लागवडीवर भर५० कोटी वृक्ष लागवडीचे शासनाचे ध्येय आहे. ही उद्दष्टिपूर्ती करताना औषधीयुक्त वनस्पतींची लागवड करण्याच्या सुचना आहे. वर्धा जिल्ह्यात २० ते ३० टक्के औषधीयुक्त वनस्पतीची लागवड करण्यात येत आहे. यामुळे येथील वनसंपदा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास संंबंधीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करताना बांबू लागवडीवर अधिक भर देण्यात आली आहे. ४० वर्षानंतर बांबूच्या झाडाला फुले आले असून यातून तयार बीजांचे संकलन करण्यात आले. याचे वितरण करुन मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यात येईल. ‘बांबू आर्ट’ मुळे रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. एमगिरीच्या माध्यमातून जंगल व्याप्त भागातील रहिवाशांना प्रशिक्षण दिले जात आहे. जंगलाचे आगीपासून संरक्षण झाले तर जंगलाचे बरेच नुकसान टाळता येईल. वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन ‘ग्रीन आर्मी’ मध्ये नागरिकांनी नोंदणी करुन वृक्ष लागवड चळवळ सक्रीय केल्यास जिल्ह्यातील वनसंपदा नक्कीच समृद्ध होईल.- डी. एस. पगार, उपवनसंरक्षक, वर्धा