शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मानवाच्या विकासासाठी पोषण आहार योग्य अत्यावश्यक

By admin | Updated: July 23, 2016 02:42 IST

सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे.

अशोक पावडे : पोषण आहारांतर्गत परसबाग प्रशिक्षण कार्यशाळा वर्धा : सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे. गावपातळीवर प्रत्येक घरी, शासकीय कार्यालय परिसरात परसबागेमध्ये शास्त्रशुद्ध सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला व फळझाडांची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनचे उपसंचालक अशोक पावडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत पोषण आहार संदर्भात परसबाग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पावडे बोलत होते. यावेळी राजमाता मिशनचे एमआयएस व्यवस्थापक उल्हास खळेगावकर, महिला बाल कल्याण चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस.एम.मेसरे, अश्विनी पाटील उपस्थित होत्या. पावडे म्हणाले, गावपातळीवर असलेल्या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व घरोघरी लोकसहभागातून परसबाग तयार करावी. शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब आणि सेंद्रीय खताचा वापर करून भाजीपाला, फळझाडे लावावी. यामुळे सध्या बाजारात येणाऱ्या रासायनिक पद्धतीच्या आहाराला आळा बसून गावपातळीवर तयार करण्यात आलेल्या पोषणामुळे गर्भवतींना व बालकाांना सकस आहार मिळून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. पोषण आहार चळवळीसाठी राज्यातील ६ जिल्ह्याचा समावेश असून वर्धा जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने येथे सुद्धा प्रायोगिक तत्वावर पोषण चळवळ सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन गावपातळीवर लोकसहभाग घेऊन परसबाग तयार करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. खळेगावकर यांनी सुद्धा पोषण आहार चळवळीविषयी मार्गदर्शन केले. अश्विनी पाटील यांनी परसबाग कमी जागेत, कमी खर्चात आणि सेंद्रीय खत निर्मित कशी करावी यावर उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. कार्यशाळेला जिल्हा परिषदचे सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.(शहर प्रतिनिधी)