शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

मानवाच्या विकासासाठी पोषण आहार योग्य अत्यावश्यक

By admin | Updated: July 23, 2016 02:42 IST

सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे.

अशोक पावडे : पोषण आहारांतर्गत परसबाग प्रशिक्षण कार्यशाळा वर्धा : सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे. गावपातळीवर प्रत्येक घरी, शासकीय कार्यालय परिसरात परसबागेमध्ये शास्त्रशुद्ध सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला व फळझाडांची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनचे उपसंचालक अशोक पावडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत पोषण आहार संदर्भात परसबाग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पावडे बोलत होते. यावेळी राजमाता मिशनचे एमआयएस व्यवस्थापक उल्हास खळेगावकर, महिला बाल कल्याण चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस.एम.मेसरे, अश्विनी पाटील उपस्थित होत्या. पावडे म्हणाले, गावपातळीवर असलेल्या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व घरोघरी लोकसहभागातून परसबाग तयार करावी. शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब आणि सेंद्रीय खताचा वापर करून भाजीपाला, फळझाडे लावावी. यामुळे सध्या बाजारात येणाऱ्या रासायनिक पद्धतीच्या आहाराला आळा बसून गावपातळीवर तयार करण्यात आलेल्या पोषणामुळे गर्भवतींना व बालकाांना सकस आहार मिळून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. पोषण आहार चळवळीसाठी राज्यातील ६ जिल्ह्याचा समावेश असून वर्धा जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने येथे सुद्धा प्रायोगिक तत्वावर पोषण चळवळ सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन गावपातळीवर लोकसहभाग घेऊन परसबाग तयार करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. खळेगावकर यांनी सुद्धा पोषण आहार चळवळीविषयी मार्गदर्शन केले. अश्विनी पाटील यांनी परसबाग कमी जागेत, कमी खर्चात आणि सेंद्रीय खत निर्मित कशी करावी यावर उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. कार्यशाळेला जिल्हा परिषदचे सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.(शहर प्रतिनिधी)