शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सेवाग्राममध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन; दशपर्णी अर्क ठरतोय प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:44 IST

सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.

ठळक मुद्देआश्रमच्या शेती विभागाचा प्रयोग उत्पादन खर्चाला बसतोय आळा

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बियाण्यांसह खतांच्या किंमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि त्या तुलनेने हमीभावातील अत्यल्प वाढ, ही बाब शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडविणारी आहे. तसेच कोरोनाच्या प्रकोपामुळे खतांचाही तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहे. स्वदेशी आणि स्वावलंबनाचा मंत्र देणाऱ्या सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.

भरघोस उत्पादनाच्या लोभापायी रासायनिक खते व कीटकनाशांचा वापर वाढला. परिणामी, जमिनीसह नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. आरोग्याच्या परिणामांमुळे आता सेंद्रिय शेतीकडे कल वाढत आहे. सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमात सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती केली जाते. फवारणीकरिता कीटकनाशके न वापरता विविध अर्कांचा वापर केला जातो. या अर्कनिर्मितीची सर्व प्रक्रिया आश्रमातच केली जाते. आश्रम परिसरातील दहा झाडांची पाने गोळा करून त्यापासून अर्क तयार केला जात असल्याने त्याला दशपर्णी अर्क म्हणतात. आश्रमच्या शेतीत सर्व प्रकारचे धान्य आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. यावर कीड, अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने दशपर्णी अर्काची फवारणी करून रोगावर नियंत्रण मिळविले जाते. येथे कोणतीही औषधी किंवा अर्क बाजारातून विकत घेतला जात नाही. या सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार होत असल्याने शेतकऱ्यांचाही कल वाढत आहे.असा तयार होतो दशपर्णी अर्कसेवाग्राम आश्रमात दशपर्णी अर्क तयार करण्याची लगबग सुरू आहे. यामध्ये धोत्रा, बेल, येरंडी, घंटुला, रुई, कडूनिंब, अडुळसा, बेशरम, करंज व निलगिरी या दहा झाडांची पाने गोळा केली जातात. यामध्ये दहा लिटर गोमूत्र, पाच लिटर पाणी यांचे एका ड्रममध्ये द्रावण तयार करून त्यात या सर्व झाडांची पाने टाकली जातात. पंधरा दिवस ठेवल्यानंतर गाळून त्याचे द्रावण फवारणीकरिता उपयोगात आणले जाते. एका फवारणी पंपासाठी शंभर मि.ली. अर्क वापरल्याने रोगावर नियंत्रण मिळविता येते.

आश्रमात बहुगुणी झाडांची उपलब्धीआश्रमामध्ये सर्व प्रकारची झाडे आहेत. ही झाडे आयुर्वेदिक असून देशी असल्याने बहुगुणी आहेत. याचा उपयोग आरोग्यासाठी महत्त्वाचा असल्याने कुठलेही दुष्परिणाम यातून होत नाही. दशपर्णीच्या फवारणीमुळे पिकांवर आणि उत्पादनावर रासायनिक खते व कीटकनाशकासारखे परिणाम दिसून येत नाही. त्यामुळेच आश्रमातील उत्पादनांची मागणी वाढली आहे. अर्क बनविण्यासाठी शेती विभागप्रमुख नामदेव ढोले, आकाश लोखंडे, सचिन हुडे, मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर, माधुरी चांभारे व सचिन बहादुरे आदी सहकार्य करीत आहेत.

आश्रमाकडे सध्या ८० एकर शेती असून त्यापैकी ३४ एकर शेती ठेक्याने दिली आहे, तर उर्वरित शेतीमध्ये विविध पिके घेतली जात आहेत. सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती केली जात आहे. यामध्ये लागणारे गोमूत्र, शेणखत आणि झाडांची पाने आश्रम परिसरातच उपलब्ध होत असल्याने लागणारा खर्च अत्यल्प आहे. सेंद्रिय शेतीतून शेतकरी चांगल्याप्रकारे उन्नती साधू शकतो.मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान

टॅग्स :agricultureशेतीSewagramसेवाग्राम