शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

सेवाग्राममध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन; दशपर्णी अर्क ठरतोय प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:44 IST

सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.

ठळक मुद्देआश्रमच्या शेती विभागाचा प्रयोग उत्पादन खर्चाला बसतोय आळा

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बियाण्यांसह खतांच्या किंमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि त्या तुलनेने हमीभावातील अत्यल्प वाढ, ही बाब शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडविणारी आहे. तसेच कोरोनाच्या प्रकोपामुळे खतांचाही तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहे. स्वदेशी आणि स्वावलंबनाचा मंत्र देणाऱ्या सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.

भरघोस उत्पादनाच्या लोभापायी रासायनिक खते व कीटकनाशांचा वापर वाढला. परिणामी, जमिनीसह नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. आरोग्याच्या परिणामांमुळे आता सेंद्रिय शेतीकडे कल वाढत आहे. सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमात सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती केली जाते. फवारणीकरिता कीटकनाशके न वापरता विविध अर्कांचा वापर केला जातो. या अर्कनिर्मितीची सर्व प्रक्रिया आश्रमातच केली जाते. आश्रम परिसरातील दहा झाडांची पाने गोळा करून त्यापासून अर्क तयार केला जात असल्याने त्याला दशपर्णी अर्क म्हणतात. आश्रमच्या शेतीत सर्व प्रकारचे धान्य आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. यावर कीड, अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने दशपर्णी अर्काची फवारणी करून रोगावर नियंत्रण मिळविले जाते. येथे कोणतीही औषधी किंवा अर्क बाजारातून विकत घेतला जात नाही. या सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार होत असल्याने शेतकऱ्यांचाही कल वाढत आहे.असा तयार होतो दशपर्णी अर्कसेवाग्राम आश्रमात दशपर्णी अर्क तयार करण्याची लगबग सुरू आहे. यामध्ये धोत्रा, बेल, येरंडी, घंटुला, रुई, कडूनिंब, अडुळसा, बेशरम, करंज व निलगिरी या दहा झाडांची पाने गोळा केली जातात. यामध्ये दहा लिटर गोमूत्र, पाच लिटर पाणी यांचे एका ड्रममध्ये द्रावण तयार करून त्यात या सर्व झाडांची पाने टाकली जातात. पंधरा दिवस ठेवल्यानंतर गाळून त्याचे द्रावण फवारणीकरिता उपयोगात आणले जाते. एका फवारणी पंपासाठी शंभर मि.ली. अर्क वापरल्याने रोगावर नियंत्रण मिळविता येते.

आश्रमात बहुगुणी झाडांची उपलब्धीआश्रमामध्ये सर्व प्रकारची झाडे आहेत. ही झाडे आयुर्वेदिक असून देशी असल्याने बहुगुणी आहेत. याचा उपयोग आरोग्यासाठी महत्त्वाचा असल्याने कुठलेही दुष्परिणाम यातून होत नाही. दशपर्णीच्या फवारणीमुळे पिकांवर आणि उत्पादनावर रासायनिक खते व कीटकनाशकासारखे परिणाम दिसून येत नाही. त्यामुळेच आश्रमातील उत्पादनांची मागणी वाढली आहे. अर्क बनविण्यासाठी शेती विभागप्रमुख नामदेव ढोले, आकाश लोखंडे, सचिन हुडे, मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर, माधुरी चांभारे व सचिन बहादुरे आदी सहकार्य करीत आहेत.

आश्रमाकडे सध्या ८० एकर शेती असून त्यापैकी ३४ एकर शेती ठेक्याने दिली आहे, तर उर्वरित शेतीमध्ये विविध पिके घेतली जात आहेत. सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती केली जात आहे. यामध्ये लागणारे गोमूत्र, शेणखत आणि झाडांची पाने आश्रम परिसरातच उपलब्ध होत असल्याने लागणारा खर्च अत्यल्प आहे. सेंद्रिय शेतीतून शेतकरी चांगल्याप्रकारे उन्नती साधू शकतो.मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान

टॅग्स :agricultureशेतीSewagramसेवाग्राम