शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:24 IST

राजकारणासह शिक्षणातही जातींचा शिरकाव झाला आहे. जातीव्यवस्था नष्ट करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्याकरिता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जातीअंताचा लढा वर्गीय लढ्यासोबत लढला गेला पाहिजे.

ठळक मुद्देकुमार शिराळकर : जाती अंत संघर्ष समितीचे संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राजकारणासह शिक्षणातही जातींचा शिरकाव झाला आहे. जातीव्यवस्था नष्ट करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्याकरिता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जातीअंताचा लढा वर्गीय लढ्यासोबत लढला गेला पाहिजे. जाती-धर्म व्यवस्था आणखी मजबूत करणाऱ्या व्यवस्थेविरोधात तो लढला गेला पाहिजे, असे प्रतिपादन कुमार शिराळकर यांनी केले.जाती अंत संघर्ष समितीचे संमेलन संत कंवरराम धर्मशाळा, वर्धा येथे पार पडले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जाती अंत संघर्ष समितीचे राज्य संयोजक शैलेंद्र कांबळे, माकपाचे नगरसेवक यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, दुर्गा काकडे, प्रतीक्षा हाडके, प्रा. शेख हाशम, महाराष्ट्र अंनिसचे गजेंद्र सुरकार, संयोजक नरेंद्र कांबळे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरूवात स्वं. प्रभा घंगारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत प्रीतम हिराणी, समीर बोरकर, पालक फुलकर, रामभाऊ ठावरी, मुकुंद नाखले, दिनेशे धुर्वे, रंजना सावरकर, आशा ईखार, गणपत मेंढे, चंद्रभान नाखले यांनी केले.मनोगत व्यक्त करताना नगरसेवक यशवंत झाडे म्हणाले की, जाती अंत संघर्ष समिती वर्धा जिल्ह्यात कार्यरत झाली आहे. जाती प्रथा निर्मुलनासोबतच कष्टकरी, दलीत, आदिवासी, महिला अन्यायाच्याविरूद्ध संषर्घ करून श्रमिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य होणार आहे. जाती व्यवस्था देशाच्या विकासाला बाधक आहे. तिचा मुळासकट नायनाट करणे गरजेचे आहे. कागदपत्रावरून जात काढली म्हणजे ती नष्ट होत नाही. ती मानवाच्या सामाजिक जीवनातून नष्ट केली पाहिजे. सामाजिक अत्याचार व आर्थिक विषमतेचे बळी दलीत, आदिवासी, भटके बहुजन समाजातील कष्टकरी गरीबच ठरतात. म्हणून या जाती अंत समितीचा विस्तार केला जावा, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेख हाशम व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे गजेंद्र सुरकार यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्यालयाबद्दल कुमार शिराळकर, शैलेंद्र कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आंतरजातीय विवाह करणाºया १० जोडप्यांना यावेळी गौरविण्यात आले. यात शकील मकसूद तेल्हे, रंजना बाबू समुद्रे, प्रतीक्षा संतोष हाडके, सुवर्णा अविनाश मांगलेकर, रूपाली चंद्रकांत कच्छवा, जया प्रदीप पाटनकर, प्रिती नितेश पेढेकर, पूजा रवींद्र कांबळे, दीपा पारस मसराम यांचा समावेश होता. कार्यक्रमादरम्यान घंगारे सांस्कृतिक मंचच्या संध्या संभे, कल्पना चहांदे, संजय भगत यांनी जातीव्यवस्थे विरोधी असलेले स्वरचीत गीत सादर केले.कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रंजना सावरकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. यात गजू ढोरे, राजू फुसाटे, प्रभाकर धवने, प्रफुल लोणकर, रवींद्र हटकर, विनोद नगराळे, विष्णू उईके, पांडूरंग राऊत, जगन चांभारे, विनोद तडस, समीर बोरकर, डी. एन. हिवरे, अशोक नागतोडे, प्रितम हिराणी, दिनेश धुर्वे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजन समितीतील सदस्यांनी सहकार्य केले.