शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

ठिकठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

By admin | Updated: February 9, 2017 00:50 IST

जिल्ह्यातील विविध ठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

वर्धा : जिल्ह्यातील विविध ठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात आले.

महाकोशल बौद्ध पंच कमिटी वर्धा : महाकोशल बौद्ध पंच कमिटी हावरे ले-आऊट सेवाग्रामच्यावतीने बुद्ध विहाराच्या प्रांगणात मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२० वी जयंती कमिटीचे अध्यक्ष रमेश येसंबरे यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली. समाजातील प्रत्येक महिलांनी रमाबाईचा आदर्श ठेवून जगले पाहिजे, असे येसंबरे यांनी सांगितले. प्रास्ताविक सिद्धार्थ शंभरकर यांनी केले. संचालन सूरज गणवीर यांनी केले तर आभार रजनीश फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश येसनकार, प्रवीण नारायणे, धर्मपाल धनवीज, संजय जवादे, राहुल शेंडे, गुलाब सातपुडके, सुरेश नाईक, सुखदेव डोंगरे, रमेश कांबळे, चंद्रमणी जवादे, यशोधरा महिला मंडळाच्या शिलवंती गणवीर, रंजना येसंबरे, अर्चना येसनकार, प्रतिभा शंभरकर, आचल जवादे, प्राची येसनकार, प्रशिका शंभरकर, तन्वी गणवीर, भाग्यश्री शेंडे, कांचन कांबळे, शोभा बन्सोड, कुसूम डोंगरे, शालिनी व पार्वती ताकसांडे, शोभा सातपुडके, धनविज आदींनी सहकार्य केले.

 विदर्भ ग्रामीण विकास सार्वजनिक ग्रंथालय वर्धा : माता रमाबाई आंबेडकर यांची १२० वी जयंती कार्यक्रम व संत गाडगे महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सहायक संचालक, माहिती व प्रसिद्ध विभाग मंत्रालय मुंबईचे संजय ओरके होते. त्यांनी माता रमाई व संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राचे पूजन व दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते मिलिंद जुनगडे उपस्थित होते. त्यांनी माता रमाबाईचे जीवन चरित्र व्यक्त केले. माता रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी १८९७ रोजी वणंद या गावी रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत गरीब वलंगकर कुटुंबात झाला. त्या त्यागी मातेचे लग्न अवघ्या ९ वर्षात झाले. भीमराव आंबेडकरांची परिस्थिती प्रतिकूल असताना व ते शिक्षण घेत असताना माता रमाईने आक्रोश करायला लावणारे दु:ख, लाचारी, गरीबी, आर्थिक संकटावर मोठ्या धैर्याने मात करून ताठ मानेने पती भीमरावाचा बॅरिस्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडविला. शिकलेला व विचारवंत पती आपल्याला मिळाला याचा माता रमाईला अभिमान वाटत असे. माता रमाईचे धैर्य त्याग बलिदान पाहून कोल्हापूरचे राजे शाहू महाराजही भारावून गेले होते. त्यांनी माता रमाईला धाकटी बहीण मानले होते. त्यांचा त्याग सहनशीलता व कारूण्य किती असामान्य होते, याची प्रचिती येते, असे सांगितले. संचालन नामेश गुजर यांनी केले तर आभार राजेश धवने यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)