शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

ठिकठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

By admin | Updated: February 9, 2017 00:50 IST

जिल्ह्यातील विविध ठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

वर्धा : जिल्ह्यातील विविध ठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात आले.

महाकोशल बौद्ध पंच कमिटी वर्धा : महाकोशल बौद्ध पंच कमिटी हावरे ले-आऊट सेवाग्रामच्यावतीने बुद्ध विहाराच्या प्रांगणात मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२० वी जयंती कमिटीचे अध्यक्ष रमेश येसंबरे यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली. समाजातील प्रत्येक महिलांनी रमाबाईचा आदर्श ठेवून जगले पाहिजे, असे येसंबरे यांनी सांगितले. प्रास्ताविक सिद्धार्थ शंभरकर यांनी केले. संचालन सूरज गणवीर यांनी केले तर आभार रजनीश फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश येसनकार, प्रवीण नारायणे, धर्मपाल धनवीज, संजय जवादे, राहुल शेंडे, गुलाब सातपुडके, सुरेश नाईक, सुखदेव डोंगरे, रमेश कांबळे, चंद्रमणी जवादे, यशोधरा महिला मंडळाच्या शिलवंती गणवीर, रंजना येसंबरे, अर्चना येसनकार, प्रतिभा शंभरकर, आचल जवादे, प्राची येसनकार, प्रशिका शंभरकर, तन्वी गणवीर, भाग्यश्री शेंडे, कांचन कांबळे, शोभा बन्सोड, कुसूम डोंगरे, शालिनी व पार्वती ताकसांडे, शोभा सातपुडके, धनविज आदींनी सहकार्य केले.

 विदर्भ ग्रामीण विकास सार्वजनिक ग्रंथालय वर्धा : माता रमाबाई आंबेडकर यांची १२० वी जयंती कार्यक्रम व संत गाडगे महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सहायक संचालक, माहिती व प्रसिद्ध विभाग मंत्रालय मुंबईचे संजय ओरके होते. त्यांनी माता रमाई व संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राचे पूजन व दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते मिलिंद जुनगडे उपस्थित होते. त्यांनी माता रमाबाईचे जीवन चरित्र व्यक्त केले. माता रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी १८९७ रोजी वणंद या गावी रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत गरीब वलंगकर कुटुंबात झाला. त्या त्यागी मातेचे लग्न अवघ्या ९ वर्षात झाले. भीमराव आंबेडकरांची परिस्थिती प्रतिकूल असताना व ते शिक्षण घेत असताना माता रमाईने आक्रोश करायला लावणारे दु:ख, लाचारी, गरीबी, आर्थिक संकटावर मोठ्या धैर्याने मात करून ताठ मानेने पती भीमरावाचा बॅरिस्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडविला. शिकलेला व विचारवंत पती आपल्याला मिळाला याचा माता रमाईला अभिमान वाटत असे. माता रमाईचे धैर्य त्याग बलिदान पाहून कोल्हापूरचे राजे शाहू महाराजही भारावून गेले होते. त्यांनी माता रमाईला धाकटी बहीण मानले होते. त्यांचा त्याग सहनशीलता व कारूण्य किती असामान्य होते, याची प्रचिती येते, असे सांगितले. संचालन नामेश गुजर यांनी केले तर आभार राजेश धवने यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)