शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

यंदा तूर, कपाशी, सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावसासह योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली.

ठळक मुद्देकृषितज्ज्ञांचे मत : सततच्या पावसाचा उभ्या पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन पिकावर खोडमाशी, कपाशीवर गुलाबी बोंडअळी तर तूर पिकावर सध्या ढगाळी वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. सततचा पाऊस पुढेही काही दिवस सुरू राहिल्यास तूर, कपाशी आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावसासह योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. पण सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस होत असल्याने आणि ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर, सोयाबीन आणि कपाशी पिकावर याचे दुष्परिणाम होत आहेत. सुरूवातीला पिकाची परिस्थिती बघता यंदा एकरी सरासरी आठ क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण खोडमाशी व जिल्ह्यातील ढगाळी वातावरण तसेच सततच्या पावसामुळे यंदा एकरी पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.जर सप्टेंबर महिन्यासह ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास किमान आणखी एक क्विंटलने उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.तूर पिकावर फुलगळतीचे सावटसध्या तूर पिकाची बºयापैकी वाढ झाली असली तरी येत्या काही दिवसानंतर हे पीक फुलावर येणार आहे. याच दरम्यान सतत पाऊस सुरू राहून ढगाळी वातावरण कायम राहिल्यास या पिकावरील फुलांची गळती होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात फुलगळती झाल्यास उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कपाशीवर बोंडअळीची वक्रदृष्टीसेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या काही कृषी तज्ज्ञांनी सुमारे दहा ते बारा गावात प्रत्यक्ष जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली असता त्यांना कपाशी पिकावर नुकसानीच्या पातळीपर्यंतचे गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहेत. त्यामुळे यंदा कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीची वक्रदृष्टीच असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती