शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तूर, कपाशी, सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावसासह योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली.

ठळक मुद्देकृषितज्ज्ञांचे मत : सततच्या पावसाचा उभ्या पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन पिकावर खोडमाशी, कपाशीवर गुलाबी बोंडअळी तर तूर पिकावर सध्या ढगाळी वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. सततचा पाऊस पुढेही काही दिवस सुरू राहिल्यास तूर, कपाशी आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावसासह योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. पण सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस होत असल्याने आणि ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर, सोयाबीन आणि कपाशी पिकावर याचे दुष्परिणाम होत आहेत. सुरूवातीला पिकाची परिस्थिती बघता यंदा एकरी सरासरी आठ क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण खोडमाशी व जिल्ह्यातील ढगाळी वातावरण तसेच सततच्या पावसामुळे यंदा एकरी पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.जर सप्टेंबर महिन्यासह ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास किमान आणखी एक क्विंटलने उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.तूर पिकावर फुलगळतीचे सावटसध्या तूर पिकाची बºयापैकी वाढ झाली असली तरी येत्या काही दिवसानंतर हे पीक फुलावर येणार आहे. याच दरम्यान सतत पाऊस सुरू राहून ढगाळी वातावरण कायम राहिल्यास या पिकावरील फुलांची गळती होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात फुलगळती झाल्यास उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कपाशीवर बोंडअळीची वक्रदृष्टीसेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या काही कृषी तज्ज्ञांनी सुमारे दहा ते बारा गावात प्रत्यक्ष जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली असता त्यांना कपाशी पिकावर नुकसानीच्या पातळीपर्यंतचे गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहेत. त्यामुळे यंदा कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीची वक्रदृष्टीच असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती