शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

यंदा तूर, कपाशी, सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावसासह योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली.

ठळक मुद्देकृषितज्ज्ञांचे मत : सततच्या पावसाचा उभ्या पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन पिकावर खोडमाशी, कपाशीवर गुलाबी बोंडअळी तर तूर पिकावर सध्या ढगाळी वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. सततचा पाऊस पुढेही काही दिवस सुरू राहिल्यास तूर, कपाशी आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावसासह योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. पण सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस होत असल्याने आणि ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर, सोयाबीन आणि कपाशी पिकावर याचे दुष्परिणाम होत आहेत. सुरूवातीला पिकाची परिस्थिती बघता यंदा एकरी सरासरी आठ क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण खोडमाशी व जिल्ह्यातील ढगाळी वातावरण तसेच सततच्या पावसामुळे यंदा एकरी पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.जर सप्टेंबर महिन्यासह ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास किमान आणखी एक क्विंटलने उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.तूर पिकावर फुलगळतीचे सावटसध्या तूर पिकाची बºयापैकी वाढ झाली असली तरी येत्या काही दिवसानंतर हे पीक फुलावर येणार आहे. याच दरम्यान सतत पाऊस सुरू राहून ढगाळी वातावरण कायम राहिल्यास या पिकावरील फुलांची गळती होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात फुलगळती झाल्यास उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कपाशीवर बोंडअळीची वक्रदृष्टीसेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या काही कृषी तज्ज्ञांनी सुमारे दहा ते बारा गावात प्रत्यक्ष जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली असता त्यांना कपाशी पिकावर नुकसानीच्या पातळीपर्यंतचे गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहेत. त्यामुळे यंदा कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीची वक्रदृष्टीच असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती