शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील लोणीच्या १४ महिलांनी सुरू केले बल्बचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:03 IST

केवळ एका महिन्यात दोन लाख रुपये किमतीच्या उत्पादनाची विक्री करून नवा विक्रम प्रस्थापित करतात. ही किमया वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील लोणी या केवळ ११०० लोकवस्ती असलेल्या गावातील महिलांनी करून दाखविली.

ठळक मुद्देनिर्मिती सुरू होताच ब्रँड नेमने विक्री करणारा पहिला समूहमहिला बचत गटाचे राज्यातील पहिले ब्रँड राज्यातील कुठल्याही महिला बचत गटाने उत्पादन सुरू केल्यानंतर त्या उत्पादनाला ब्रँड म्हणून ओळख मिळवून देण्याचा हा पहिला प्रयोग ठरला. प्रज्ञाशा महिला उद्योगिनी संघाने निर्माण केलेल्या एलईडी बल्बची ओळख या पूरक या नावाने आ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २२ महिला बचत गटातील महिला एकत्र येतात. उद्योगाचा पाया रचतात. आकलनाबाहेर असलेल्या क्षेत्रात निर्मिती उद्योग उभारतात आणि गावातील या महिलांची मेहनत आणि महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानचे पाठबळ यामुळे हे शक्य होऊ शकले. याच महत्त्वकांक्षी महिलांची ही यशोगाथा.लोणी या गावात प्रिया सुनारकर आणि शुभांगी कोल्हे यांच्या नेतृत्वातील प्रज्ञा ग्रामसंघ आणि आशा ग्रामसंघ स्थापन केला. एका ग्रामसंघात ११ महिला बचत गटांचा समावेश असतो. या दोन्ही ग्रामसंघांनी एकत्र येऊन प्रज्ञाशा महिला उद्योगिनी संघाची स्थापना केली. २२ महिला बचत गटातील १४ निवडक महिलांचा समावेश असलेल्या या उद्योगिनी संघाला महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानचे ग्रामपरिवर्तक अतुल राऊत यांनी दिशा दाखविली. उद्योग सुरू करणाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संघाने निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवण्याचे ठरविले. आता उद्योगाच्या दिशेने संघाचा प्रवास सुरू झाला.प्रज्ञाशा महिला उद्योगिनी संघाच्या बैठकीत एलईडी बल्ब निर्मितीचा उद्योग सुरू करण्याचे ठरले. सर्व महिलांनी मिळून ९० हजार रुपये प्राथमिक रक्कम उभी केली. महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या निधीतून त्यांना ७० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. यातून एलईडी बल्ब निर्मितीचा व्यवसाय सुरू झाला आणि दीड महिन्यातच ३५ हजारांच्या नफ्यासह उद्योगाने भरारी घेतली.

दीड महिन्यांत ३५ हजारांचा नफाएक लाख ६० हजारांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांनी एक लाख ८५ हजारांच्या एलईडी बल्बची विक्री केली. आता सुमारे एक हजार बल्ब विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १२ स्ट्रीट एलईडी लाईटचीही निर्मिती केली. त्यांची विक्री झाली. जिल्हाधिकारी कार्यालतातर्फे तयार करण्यात आलेल्या रुरल मॉलला १ लाख २० हजार रुपयांच्या, उमेद वस्तू विक्री केंद्राला २५ हजारांच्या, दोन ग्रामपंचायतींना ३० हजारांच्या तर स्थानिक बाजारात २० हजार रुपयांच्या बल्बची विक्री प्रज्ञाशा संघाने केली असून त्यातून ३५ हजारांचा निव्वळ नफा कमावला.

काय आहे महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनमहाराष्ट्रातील विविध कॉपोर्रेट कंपन्यांच्या सहकार्याने सीएसआर फंडातून ग्रामीण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सुरू केलेले अभियान म्हणजेच महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन. या माध्यमातून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील एक हजार गावांची निवड करण्यात आली आहे. एका ग्रामपंचायतीमागे एक मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमण्यात आला असून फाऊंडेशन आणि गावकरी यांच्यामधील सेतूचे कार्य तो करीत आहे. त्यांच्या सामाजिक विकासासाठी आवश्यक त्या योजना फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात राबविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी कटिबद्ध आहे. निवड करण्यात आलेल्या गावात शैक्षणिक विकास, जलसमृद्धी, पर्यावरण सुरक्षा, शेतीविकास, आरोग्य सुरक्षा, डिजीटल कनेक्टिव्हिटी आदींवर भर देण्यात येत आहे. सुमारे १५० ग्रामपरिवर्तक (मुख्यमंत्री मित्र) यासाठी रात्रंदिवस गावकऱ्यांमध्ये मिसळून काम करीत आहे. अनेक गावात काही महिन्यातच सकारात्मक बदल दिसत असून ग्रामपरिवर्तनाची ही नांदी आहे.- रामनाथ सुब्रमण्यम,सीईओ, महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास