शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

प्रवासी निवारे झाले समस्यांचे आगार

By admin | Updated: March 23, 2015 01:56 IST

प्रवाशांना प्रवासादरम्यान वाहनांची प्रतीक्षा करताना उन्ह, पावसापासून बचाव करता यावा, त्यांना निवारा मिळावा म्हणून गावोगावी प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती करण्यात आली;

सेलू : प्रवाशांना प्रवासादरम्यान वाहनांची प्रतीक्षा करताना उन्ह, पावसापासून बचाव करता यावा, त्यांना निवारा मिळावा म्हणून गावोगावी प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; पण काही प्रवासी निवारे आंबटशौकिनांचा अड्डा ठरत आहे. प्रवाशांऐवजी वाहनांनाच निवारा देतात, ही स्थिती आहे़ तालुक्यातील या निवाऱ्यांची दुरूस्ती करून प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे झाले आहे़ वर्धा-नागपूर मार्गावर सेलू येथील यशवंत चौकातील प्रवाशी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे़ सेलू येथील बसस्थानकावर जलद बसेस जात नाही. यामुळे बायपास मार्गे थेट धावणाऱ्या बसेस व खासगी बस येथील यशवंत चौकात थांबतात. यामुळे प्रवाशांच्या गर्दीने हा चौक कायम फुलला असतो. या मार्गे धावणाऱ्या गाड्या चौकात उभ्या राहतात़ प्रवाशांची गरज लक्षात घेत येथे काही वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला. बससाठी प्रवाशांची वाढती संख्या पाहता सेलू येथील ग्रामस्थांनी या चौकात दोन प्रवासी निवाऱ्यांची मागणी केली होती. २००७-०८ मध्ये आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रवासी निवारे बांधण्यात आले़ या निवाऱ्यांचा उपयोग मात्र काही समाजकंटकांकडून वाईट कृत्याकरिता होत असल्याचे दिसते़या सर्व प्रकाराकडे संबंधित प्रशासन डोळेझाक करीत आहे. या प्रवासी निवाऱ्यासमोर वाहनधारक आपली वाहने उभी करून समोरच्या प्रवासाला जातात़ रात्रीच्या सुमारास येथे ओली पार्टी रंगत असल्याची माहिती आहे. प्रवासी निवाऱ्याच्या परिसरात दारूच्या शिश्या, पाणी पाऊच याचा खच आढळून येतो. यामुळे हा निवारा शौकिनांचे स्थान होत असल्याचे दिसते. या त्रासामुळे प्रवासी तेथे थांबून बसची प्रतीक्षा करीत नसल्याचेही दिसते़ आंबटशौकीनांकडून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ते भरउन्हात रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहनाची प्रतीक्षा करताना दिसतात़ प्रवासी निवारा असताना तो प्रवाशांकरिता सोयीस्कर ठरत नसेल तर या प्रवासी निवाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ राज्य परिवहन महामंडळ, बांधकाम विभाग व पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)