शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संवाद यात्रेने जाणून घेतल्या नऊ गावांतील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:38 IST

शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या.

ठळक मुद्देसिंदखेडराजा ते सेवाग्राम प्रवास : निवेदने स्वीकारून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या. वन्यप्राण्यांमुळे पिकाचे नुकसान, शेतात सिंगल फेज वीज पुरवठा, गावपांदण रस्त्याची दुरूस्ती, शेतमालाला योग्यभाव, अनियमित वीज पुरवठा व सिंचनाच्या अपुºया सुविधा या समस्यांचा समावेश होता. याबाबत लेखी निवेदने स्वीकारून शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची हमी संवाद यात्रेचे प्रमुख आयोजक अभिजीत फाळके यांनी दिली.भूमिपुत्र संघर्ष वाहिनी पुणे, आपुलकी सामाजिक संस्था पुणे, श्री संत गाडगेबाबा चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई, किसानपुत्र सामाजिक संस्था, अनिल गावंडे मित्रपरिवार आणि टिचवन या सहा सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा शुभारंभ ९ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथून झाला. मॉ जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा निघाली. अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती व वर्र्धा या पाच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ६० गावांना भेटी देत ग्रामस्थ व शेतकºयांच्या समस्या जाणून घेत शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, हा यात्रेच्या आयोजनामागील हेतू होता. प्रत्येक गावात जाऊन शेतकºयांसोबत बसून समस्या जाणून घेतल्या. यात्रे दरम्यान गावांत हारतुरे न स्वीकारता, लाऊड स्पीकरचा वापर न करता, बॅनर वा पोस्टर न लावता तथा भाषणबाजी न करता शेतकºयांची थेट चर्चा केली. यात लेखी समस्या जाणून घेतल्या.कारंजा तालुक्यात संवाद यात्रेने शनिवारी जंगलाला लागून असलेल्या माळेगाव (काळी), नरसिंगपूर, उमरी, ब्राह्मणवाडा, ठाणेगाव या गावांना भेटी दिल्या. सभोवतालच्या गावांतील समस्याही जाणून घेण्यात आल्या. सरपंच, गावस्तरीय कार्यकर्ते, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेसोबत आपूलकी व भूमीपूत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके, संत गाडगेबाबा संस्थानचे प्रशांत देशमुख, योगेश देशमुख, अनिल गावंडे, संतोष अडसर, गजानन बोरोकार, सागर देशमुख, मिथून मोंढे, निखिल जैत, विजय घाळाय, प्रदीप बिल्लोरे, तसेच वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्ते सचिन घोडे, प्रशांत देशमुख, सागर बरडे, नंदू गावंडे, संदीप शेळके, राजाभाऊ पालीवाल, प्रा. अरुण फाळके, भाऊराव धोटे, भांगे, कामटकर, पांडे, भक्ते, जोरे, अवथळे, नासरे, देवासे उपस्थित होते. त्यांनी शेतकºयांसोबत संवाद साधून निवेदने स्वीकारली. उच्च शिक्षित नोकरी असलेले युवक शेतकºयांपर्यंत पोहोचल्याने हवालदिल शेतकºयांना दिलासा मिळाला.या समस्यांचा होणार पाठपुरावातालुक्यात एखादे मोठे धरण व्हावे, पाझर तलावांची खोली वाढवावी, दुरूस्ती करावी, खैरी धरणाची पाणी साठवणूक व सिंचन क्षमतेसाठी धरणाची उंची वाढवावी, मोर्शी, खरसखांडा, नरसिंगपूर, बोंदरठाणा येथे नवीन तलावांची निर्मिती करावी, प्रत्येक गावातील पांदण रस्ते दुरूस्त करावे, शेतात सिंगल फेज वीज द्यावी, विद्युत पुरवठा १२ तास द्यावा, ब्राह्मणवाडा, माळेगाव, नरसिंगपूर या गावात पशुवैद्यकीय केंद्र सुरू करावे, हेटीकुंडी पशुपैदास केंद्राचे पुनरूज्जीवन करावे, उमरीचा शिकस्त झालेला पाझर तलाव दुरूस्त करावा, आदी समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार संवाद यात्रेमार्फत व्यक्त करण्यात आला.