शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकरी संवाद यात्रेने जाणून घेतल्या नऊ गावांतील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:38 IST

शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या.

ठळक मुद्देसिंदखेडराजा ते सेवाग्राम प्रवास : निवेदने स्वीकारून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या. वन्यप्राण्यांमुळे पिकाचे नुकसान, शेतात सिंगल फेज वीज पुरवठा, गावपांदण रस्त्याची दुरूस्ती, शेतमालाला योग्यभाव, अनियमित वीज पुरवठा व सिंचनाच्या अपुºया सुविधा या समस्यांचा समावेश होता. याबाबत लेखी निवेदने स्वीकारून शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची हमी संवाद यात्रेचे प्रमुख आयोजक अभिजीत फाळके यांनी दिली.भूमिपुत्र संघर्ष वाहिनी पुणे, आपुलकी सामाजिक संस्था पुणे, श्री संत गाडगेबाबा चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई, किसानपुत्र सामाजिक संस्था, अनिल गावंडे मित्रपरिवार आणि टिचवन या सहा सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा शुभारंभ ९ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथून झाला. मॉ जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा निघाली. अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती व वर्र्धा या पाच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ६० गावांना भेटी देत ग्रामस्थ व शेतकºयांच्या समस्या जाणून घेत शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, हा यात्रेच्या आयोजनामागील हेतू होता. प्रत्येक गावात जाऊन शेतकºयांसोबत बसून समस्या जाणून घेतल्या. यात्रे दरम्यान गावांत हारतुरे न स्वीकारता, लाऊड स्पीकरचा वापर न करता, बॅनर वा पोस्टर न लावता तथा भाषणबाजी न करता शेतकºयांची थेट चर्चा केली. यात लेखी समस्या जाणून घेतल्या.कारंजा तालुक्यात संवाद यात्रेने शनिवारी जंगलाला लागून असलेल्या माळेगाव (काळी), नरसिंगपूर, उमरी, ब्राह्मणवाडा, ठाणेगाव या गावांना भेटी दिल्या. सभोवतालच्या गावांतील समस्याही जाणून घेण्यात आल्या. सरपंच, गावस्तरीय कार्यकर्ते, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेसोबत आपूलकी व भूमीपूत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके, संत गाडगेबाबा संस्थानचे प्रशांत देशमुख, योगेश देशमुख, अनिल गावंडे, संतोष अडसर, गजानन बोरोकार, सागर देशमुख, मिथून मोंढे, निखिल जैत, विजय घाळाय, प्रदीप बिल्लोरे, तसेच वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्ते सचिन घोडे, प्रशांत देशमुख, सागर बरडे, नंदू गावंडे, संदीप शेळके, राजाभाऊ पालीवाल, प्रा. अरुण फाळके, भाऊराव धोटे, भांगे, कामटकर, पांडे, भक्ते, जोरे, अवथळे, नासरे, देवासे उपस्थित होते. त्यांनी शेतकºयांसोबत संवाद साधून निवेदने स्वीकारली. उच्च शिक्षित नोकरी असलेले युवक शेतकºयांपर्यंत पोहोचल्याने हवालदिल शेतकºयांना दिलासा मिळाला.या समस्यांचा होणार पाठपुरावातालुक्यात एखादे मोठे धरण व्हावे, पाझर तलावांची खोली वाढवावी, दुरूस्ती करावी, खैरी धरणाची पाणी साठवणूक व सिंचन क्षमतेसाठी धरणाची उंची वाढवावी, मोर्शी, खरसखांडा, नरसिंगपूर, बोंदरठाणा येथे नवीन तलावांची निर्मिती करावी, प्रत्येक गावातील पांदण रस्ते दुरूस्त करावे, शेतात सिंगल फेज वीज द्यावी, विद्युत पुरवठा १२ तास द्यावा, ब्राह्मणवाडा, माळेगाव, नरसिंगपूर या गावात पशुवैद्यकीय केंद्र सुरू करावे, हेटीकुंडी पशुपैदास केंद्राचे पुनरूज्जीवन करावे, उमरीचा शिकस्त झालेला पाझर तलाव दुरूस्त करावा, आदी समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार संवाद यात्रेमार्फत व्यक्त करण्यात आला.