शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वाढत्या लोकसंख्येने समस्येत भर

By admin | Updated: July 15, 2014 00:10 IST

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे आर्थिक, सामाजिक समस्यात वाढ होऊन पर्यावरण विषयक असंतुलन झाले आहे. यामुळे अनेक समस्यांना देशाला तोंड द्यावे लागते. लोकसंख्या

वर्धा : देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे आर्थिक, सामाजिक समस्यात वाढ होऊन पर्यावरण विषयक असंतुलन झाले आहे. यामुळे अनेक समस्यांना देशाला तोंड द्यावे लागते. लोकसंख्या नियंत्रणाकरिता जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्था यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांनी केले.जिल्हा परिषद सभागृहात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित आनंदीबाई पुरस्कार योजनेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी आरोग्य समिती सभापती प्रा. उषाकिरण थुटे, महिला बालकल्याण सभापती निर्मला बिजवे, समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलींद सोनोने, डॉ. अजय डवले, धैर्यशील जगताप, मनोज चांदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर बोलताना थुटे म्हणाल्या, देशाची लोकसंख्या वाढल्यामुळे कृषीविषयक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे बेरोजगारी व गुन्हेगारी यात वाढ झाली आहे. तसेच डॉ. चव्हाण यांनी जिल्ह्याने कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळेच या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांपासून अन्य कर्मचारी पे्ररणा घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेत उत्कृष्ठ कार्य केल्याबाबत ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा(मो.), साहूर, गौळ, आरोग्य उपकेंद्र पेठ, बेढोणा, जऊरवाडा तसेच ७८ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना आरोग्य मित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी एका मुलीवर शस्त्रक्रिया करवुन घेणाऱ्या दांपत्यांचा साडी, चोळी व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामीण रुग्णालय, पुलगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल नारलवार, डॉ. भागवत राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राजीव देशपांडे यांनी केले तर आभार डॉ. अजय डवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)