शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी

By admin | Updated: November 2, 2014 22:46 IST

तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया, डेंग्यू, टाईफाईड, कावीळ या आजाराच्या रूग्णात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे

सेलू : तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया, डेंग्यू, टाईफाईड, कावीळ या आजाराच्या रूग्णात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. ब्लिचिंगविना पाण्याचा पुरवठा होत आहे. वृक्षसंवर्धन योजनेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी बोगस मजुरांची प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच पहात असला तरी आर्थिक खर्च करण्याचे अधिकार ग्रामसेवकांना असतात. त्यामुळे अनेकदा सरपंचाला हाताशी घेऊन ग्रामसेवकांकरवी आर्थिक व्यवहार केले जातात. त्यामुळे दोघांनाही गावाच्या समस्यांचा विसर पडतो. काही सरपंच सहीपुरतेच असल्याने ग्रामसेवकांची चांगली मज्जा सुरू असल्याचे चित्रही अनेक ग्रामपंचायतमध्ये दिसते पंचायत समिती स्तरावरची यंत्रणा ग्रामसेवकांभोवती फिरत असते. त्यामुळे बरेचदा झालेला भ्रष्टाचार झाकल्या जातो. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लिचिंगविना दररोज पाणी पिण्याची वेळ आल्याचेही ग्रामस्थांमधून संतापाने बोलल्या जात आहे. गावांतील नाल्यांमध्ये नियमित फवारणी केल्या जात नाही. गोदरीमुक्त योजनेचा फज्जा उडाला असून उघड्यावर घाण दिसते. लोकांनी ओरडूनही उपयोग होत नसल्याचे ग्रामीण भागातील वास्तव आहे. वृक्षलागवड व संवर्धनाचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. वृक्षसंवर्धनासाठी असणाऱ्या मजुरांना कामाचा मोबदला दिल्या जात असला तरी कधीही कामांवर नसणाऱ्यांची नावे भरून त्यांच्या नावावर मजुरी काढल्या जात असल्याची अनेक प्रकरणे पहावयास मिळतात. बँकेत मजुरांच्या नावे रक्कम जमा होते. त्यामुळे या बोगस मजुरांना काही रक्कम देवून तत्पूर्वीच त्यांचे बँकेचे पासबुक जवळ ठेवून त्यांना सोबत नेवून त्यांच्याच स्वाक्षरीने मजुरीची रक्कम उचलल्या जात असल्याचे वास्तव आहे. प्रशासनाने तालुकास्तरावरील यंत्रंएद्वारे गावांमध्ये जावून बोगस हजेरी रजिस्टर तपासून बोगस मजूरांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. तसेच ग्रामसेवक दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. एकंदरित ग्रामपंचायतकडे तेथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा पर्यायाने आरोग्यव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वृक्षसंवर्धन योहनेचेही तीनतेरा वाजले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावांतील नागरिकांकडून जोर धरत आहे.(तालुका प्रतिनिधी)