शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी

By admin | Updated: November 2, 2014 22:46 IST

तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया, डेंग्यू, टाईफाईड, कावीळ या आजाराच्या रूग्णात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे

सेलू : तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया, डेंग्यू, टाईफाईड, कावीळ या आजाराच्या रूग्णात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. ब्लिचिंगविना पाण्याचा पुरवठा होत आहे. वृक्षसंवर्धन योजनेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी बोगस मजुरांची प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच पहात असला तरी आर्थिक खर्च करण्याचे अधिकार ग्रामसेवकांना असतात. त्यामुळे अनेकदा सरपंचाला हाताशी घेऊन ग्रामसेवकांकरवी आर्थिक व्यवहार केले जातात. त्यामुळे दोघांनाही गावाच्या समस्यांचा विसर पडतो. काही सरपंच सहीपुरतेच असल्याने ग्रामसेवकांची चांगली मज्जा सुरू असल्याचे चित्रही अनेक ग्रामपंचायतमध्ये दिसते पंचायत समिती स्तरावरची यंत्रणा ग्रामसेवकांभोवती फिरत असते. त्यामुळे बरेचदा झालेला भ्रष्टाचार झाकल्या जातो. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लिचिंगविना दररोज पाणी पिण्याची वेळ आल्याचेही ग्रामस्थांमधून संतापाने बोलल्या जात आहे. गावांतील नाल्यांमध्ये नियमित फवारणी केल्या जात नाही. गोदरीमुक्त योजनेचा फज्जा उडाला असून उघड्यावर घाण दिसते. लोकांनी ओरडूनही उपयोग होत नसल्याचे ग्रामीण भागातील वास्तव आहे. वृक्षलागवड व संवर्धनाचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. वृक्षसंवर्धनासाठी असणाऱ्या मजुरांना कामाचा मोबदला दिल्या जात असला तरी कधीही कामांवर नसणाऱ्यांची नावे भरून त्यांच्या नावावर मजुरी काढल्या जात असल्याची अनेक प्रकरणे पहावयास मिळतात. बँकेत मजुरांच्या नावे रक्कम जमा होते. त्यामुळे या बोगस मजुरांना काही रक्कम देवून तत्पूर्वीच त्यांचे बँकेचे पासबुक जवळ ठेवून त्यांना सोबत नेवून त्यांच्याच स्वाक्षरीने मजुरीची रक्कम उचलल्या जात असल्याचे वास्तव आहे. प्रशासनाने तालुकास्तरावरील यंत्रंएद्वारे गावांमध्ये जावून बोगस हजेरी रजिस्टर तपासून बोगस मजूरांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. तसेच ग्रामसेवक दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. एकंदरित ग्रामपंचायतकडे तेथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा पर्यायाने आरोग्यव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वृक्षसंवर्धन योहनेचेही तीनतेरा वाजले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावांतील नागरिकांकडून जोर धरत आहे.(तालुका प्रतिनिधी)