शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

आर्वी नाका चौकात अतिक्रमणामुळे अडचणी

By admin | Updated: November 21, 2015 02:33 IST

आर्वी नाका परिसरातील मुख्य चौकात सुखकर्ता कॉम्प्लेक्ससमोर काही भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

हटविण्याची मागणी : व्यापारी त्रस्त वर्धा : आर्वी नाका परिसरातील मुख्य चौकात सुखकर्ता कॉम्प्लेक्ससमोर काही भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या कॉम्प्लेक्समधील व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात आहे. आर्वी नाका परिसरातील मुख्य चौकात सुखकर्ता कॉम्प्लेक्समध्ये अनेकांची व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. परंतु कित्येक दिवसांपासून या दुकानांसमोर काही भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण करून लाकडी पक्के शेड उभे केले आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी या दुकानामुळे अडत आहे. तसेच सडका भाजीपाला त्याच ठिकाणी टाकत असल्याने दुर्गंधीचा सामना या परिसरातील सर्वच नागरिकांना करावा लागत आहे. परिणामी आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. अतिक्रमण धारकांनी सिग्नलला विळखा घातल्याने वळणरस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. ये जा करीत असलेले पादचारी व वाहनाना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे येथे अपघाताची शक्यताही बळावली आहे. सदर दुकानदार भाजीच्या दुकानापुढे रस्त्यावर भाजीचे ट्रे ठेवतात. त्यामुळे म्हाडा कॉलनी रोड लगतच्या वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. भाजीच्या बंड्यांलगतच खाद्यपदार्थाच्याही काही बंड्या लागल्या आहेत. त्यामुळे येथे मद्यपींची गर्दी होऊन अनेकदा वादविवादही होत असतात. त्यामुळे हे अतिक्रमण त्वरीत हटवून मोकळे करावे, अशी मागणी केली जात आहे. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात येऊनही याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पहावयास मिळते.(शहर प्रतिनिधी)