शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता बदलानंतरही शहरातील समस्या ‘जैसे थे’

By admin | Updated: April 7, 2017 02:07 IST

शहरातील मोठा उद्योग बंद झाला, हजारो कामगारांच्या हाताला काम नाही. या वस्त्रोद्योगाचे पुनर्निर्माण झाले;

तालुक्याचा दर्जाही नाही : रस्त्यावर येणारी मंडळी गटबाजीत व्यस्तपुलगाव : शहरातील मोठा उद्योग बंद झाला, हजारो कामगारांच्या हाताला काम नाही. या वस्त्रोद्योगाचे पुनर्निर्माण झाले; पण अत्यल्प कामगारांना काम मिळाले. कामगार हितासाठी रस्त्यावर उतरणारी मंडळी कागदोपत्री घोडे दौडवित आहे. काँग्रेस, भाजप, बसपा, शिवसेना आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामान्यांच्या समस्यांवर रस्त्यावर येत होते. शेतकरी आत्महत्या करीत आहे. अतिक्रमणामुळे बेरोजगारांचे रोजगार गेले. वाढत्या महागाईमुळे सामान्य त्रस्त आहे; पण या समस्यांसाठी रस्त्यावर येणारी मंडळी सत्तेच्या दालनात गटबाजीत व्यस्त असल्याचे दिसते. ६६ वर्षे काँग्रेसची या देशावर सत्ता होती; पण या काळात काँग्रेसने विकास केला नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने आत्महत्या होत आहे. जीवनावश्यक वस्तूचे वाढते भाव, भरमसाठ वीज बिल, वाढते अतिक्रमण आदी समस्यांसाठी रस्त्यावर येऊन सत्तारूढ पक्षाविरूद्ध आंदोलन करणारी मंडळी आज केंद्र, राज्यासह जिल्हा परिषद, नगर परिषदेत सत्तेत आहे. शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, पाणी समस्या आदींसाठी भाजपा कार्यकर्ते न.प. मध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसविरूद्ध आंदोलन करीत होते; पण आता तेच या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. नगर परिषदेने अतिक्रमण पाडले. अतिक्रमणग्रस्तांना न.प. प्रशासनाने घरे बांधून द्यावी या मागणीसाठी बसपाने मोठे आंदोलन केले. सेनेनेही विविध समस्यांसाठी आंदोलने केली. आज न.प. मध्ये भाजपा, अपक्ष सत्तेत आहे. काँग्रेस बसपाची आघाडी आहे; पण कुणी आंदोलन करताना दिसत नाही. काँग्रेसमध्ये माजी नगराध्यक्ष मनीष साहू व गटनेता राजण चौधरी, असे दोन गट तर भाजपाचे शहराध्यक्ष मंगेश झाडे, संजय गाते व जिल्हा चिटणीस नितीन बडगे यांच्यातील गटबाजी रामनवमीच्या कार्यक्रमातून चव्हाट्यावर आली. कित्येक वर्षानंतर बसपाला न.प. निवडणुकीत पाच जागा मिळाल्या; पण त्यांच्यात राजेश लोहकरे व कुंदन जांभुळकर, असे गटबाजीचे राजकारण सुरू झाले. पूर्वी न.प. मध्ये शिवसेनेच्या एक-दोन जागा राहत होत्या; पण आज तिथेही माजी जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर मोहोड, नरेशसिंह ठाकूर व तालुका प्रमुख आशिष पांडे, असे गट पडले. गटबाजीमुळे १० जागांहून काँग्रेस दोनवर तर सेना शून्यावर आली. बसपाला पाच जागा मिळाल्या खऱ्या; पण तिथेही गटबाजी सुरू असल्याने सामान्यांच्या समस्यांबाबत कुणाला आस्था नसल्याचेच दिसते.(तालुका प्रतिनिधी)