शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

सत्ता बदलानंतरही शहरातील समस्या ‘जैसे थे’

By admin | Updated: April 7, 2017 02:07 IST

शहरातील मोठा उद्योग बंद झाला, हजारो कामगारांच्या हाताला काम नाही. या वस्त्रोद्योगाचे पुनर्निर्माण झाले;

तालुक्याचा दर्जाही नाही : रस्त्यावर येणारी मंडळी गटबाजीत व्यस्तपुलगाव : शहरातील मोठा उद्योग बंद झाला, हजारो कामगारांच्या हाताला काम नाही. या वस्त्रोद्योगाचे पुनर्निर्माण झाले; पण अत्यल्प कामगारांना काम मिळाले. कामगार हितासाठी रस्त्यावर उतरणारी मंडळी कागदोपत्री घोडे दौडवित आहे. काँग्रेस, भाजप, बसपा, शिवसेना आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामान्यांच्या समस्यांवर रस्त्यावर येत होते. शेतकरी आत्महत्या करीत आहे. अतिक्रमणामुळे बेरोजगारांचे रोजगार गेले. वाढत्या महागाईमुळे सामान्य त्रस्त आहे; पण या समस्यांसाठी रस्त्यावर येणारी मंडळी सत्तेच्या दालनात गटबाजीत व्यस्त असल्याचे दिसते. ६६ वर्षे काँग्रेसची या देशावर सत्ता होती; पण या काळात काँग्रेसने विकास केला नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने आत्महत्या होत आहे. जीवनावश्यक वस्तूचे वाढते भाव, भरमसाठ वीज बिल, वाढते अतिक्रमण आदी समस्यांसाठी रस्त्यावर येऊन सत्तारूढ पक्षाविरूद्ध आंदोलन करणारी मंडळी आज केंद्र, राज्यासह जिल्हा परिषद, नगर परिषदेत सत्तेत आहे. शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, पाणी समस्या आदींसाठी भाजपा कार्यकर्ते न.प. मध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसविरूद्ध आंदोलन करीत होते; पण आता तेच या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. नगर परिषदेने अतिक्रमण पाडले. अतिक्रमणग्रस्तांना न.प. प्रशासनाने घरे बांधून द्यावी या मागणीसाठी बसपाने मोठे आंदोलन केले. सेनेनेही विविध समस्यांसाठी आंदोलने केली. आज न.प. मध्ये भाजपा, अपक्ष सत्तेत आहे. काँग्रेस बसपाची आघाडी आहे; पण कुणी आंदोलन करताना दिसत नाही. काँग्रेसमध्ये माजी नगराध्यक्ष मनीष साहू व गटनेता राजण चौधरी, असे दोन गट तर भाजपाचे शहराध्यक्ष मंगेश झाडे, संजय गाते व जिल्हा चिटणीस नितीन बडगे यांच्यातील गटबाजी रामनवमीच्या कार्यक्रमातून चव्हाट्यावर आली. कित्येक वर्षानंतर बसपाला न.प. निवडणुकीत पाच जागा मिळाल्या; पण त्यांच्यात राजेश लोहकरे व कुंदन जांभुळकर, असे गटबाजीचे राजकारण सुरू झाले. पूर्वी न.प. मध्ये शिवसेनेच्या एक-दोन जागा राहत होत्या; पण आज तिथेही माजी जिल्हा उपप्रमुख नंदकिशोर मोहोड, नरेशसिंह ठाकूर व तालुका प्रमुख आशिष पांडे, असे गट पडले. गटबाजीमुळे १० जागांहून काँग्रेस दोनवर तर सेना शून्यावर आली. बसपाला पाच जागा मिळाल्या खऱ्या; पण तिथेही गटबाजी सुरू असल्याने सामान्यांच्या समस्यांबाबत कुणाला आस्था नसल्याचेच दिसते.(तालुका प्रतिनिधी)