शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

आर्वी तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:27 IST

मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : शेतकरी चिंतित, जोरदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पहिल्यांदाच पावसाचे आगमन जुलै महिन्यात उशिराने झाले. पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने मागील आठवड्यात तालुक्यातील शेतकºयांनी पेरणी केली आणि पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहे.सोयाबीन पिकाला जुलै महिन्यात पेरणीनंतर सतत पावसाची गरज पडते. त्यातही हवामान खात्याने जुलै महिन्यात पावसाचा खंड असल्याचे सांगितल्याने शेतकरी धास्तावले होते. कपाशी व तूर उत्पादकांना पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्यात शेतकऱ्यांचे समाधान होईल इतकाही पाऊस झाला नाही. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी जुलै महिन्यात पेरणी केली; परंतु जुलै महिना हा खरा पावसाचा असूनही म्हणावे तसेच सातत्य आढळून आले नाही. जुलै संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. तालुक्यात वाढोणा, देऊरवाडा, वागदा, अहिरवाडा, नांदपूर, अहिरवाडा, टाकरखेडा, एकलारा, नांदपूर, शिरपूर, जळगाव, खुबगाव, पाचेगाव, दहेगाव, वर्धमनेरी, मांडला, रोहणा, पिंपळखुटा, चिंचोली, गुमगाव, नेरी, सावळापूर आदी गावातील शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी पेरणीनंतर तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने सिंचनाची सुविधा असणाºया शेतकºयांनी आपल्या शेतपिकाला जगविण्यासाठी सिंचन करणे सुरू केले होते. ज्या शेतकºयाकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांना वरूणराजा बरसण्याची प्रतीक्षा कायम होती.सर्वत्र शेतकºयाकडून वरूणराजा लवकर बरसावा यासाठी प्रार्थना सुरू होती. अखेर वरूणराजाचे तालुक्यात आगमन झाल्याने काही दिवसासाठी पीक वाढीसाठी दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यात शेतपिकांना पाहिजे तेव्हाच व मोजकाच पाऊस पडत असल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची, धरणाची, नदी-नाल्याची अवस्था बिकट असून दमदार पावसासह पावसाच्या झडीची आता तालुक्यातील शेतकºयांना प्रतीक्षा आहे.मागील तेरा दिवसांपासून आर्वी तालुक्यात पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे पिकांची अवस्था वाईट आहे. जुलै अखेरच्या टप्प्यात असतानाही जोरदार पाऊस नाही. परिणामी, पिकांची वाढ खुंटलेली असून झडीची प्रतीक्षा आहे.- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता. आर्वी.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस