शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

आर्वी तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:27 IST

मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : शेतकरी चिंतित, जोरदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पहिल्यांदाच पावसाचे आगमन जुलै महिन्यात उशिराने झाले. पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने मागील आठवड्यात तालुक्यातील शेतकºयांनी पेरणी केली आणि पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहे.सोयाबीन पिकाला जुलै महिन्यात पेरणीनंतर सतत पावसाची गरज पडते. त्यातही हवामान खात्याने जुलै महिन्यात पावसाचा खंड असल्याचे सांगितल्याने शेतकरी धास्तावले होते. कपाशी व तूर उत्पादकांना पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्यात शेतकऱ्यांचे समाधान होईल इतकाही पाऊस झाला नाही. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी जुलै महिन्यात पेरणी केली; परंतु जुलै महिना हा खरा पावसाचा असूनही म्हणावे तसेच सातत्य आढळून आले नाही. जुलै संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. तालुक्यात वाढोणा, देऊरवाडा, वागदा, अहिरवाडा, नांदपूर, अहिरवाडा, टाकरखेडा, एकलारा, नांदपूर, शिरपूर, जळगाव, खुबगाव, पाचेगाव, दहेगाव, वर्धमनेरी, मांडला, रोहणा, पिंपळखुटा, चिंचोली, गुमगाव, नेरी, सावळापूर आदी गावातील शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी पेरणीनंतर तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने सिंचनाची सुविधा असणाºया शेतकºयांनी आपल्या शेतपिकाला जगविण्यासाठी सिंचन करणे सुरू केले होते. ज्या शेतकºयाकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांना वरूणराजा बरसण्याची प्रतीक्षा कायम होती.सर्वत्र शेतकºयाकडून वरूणराजा लवकर बरसावा यासाठी प्रार्थना सुरू होती. अखेर वरूणराजाचे तालुक्यात आगमन झाल्याने काही दिवसासाठी पीक वाढीसाठी दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यात शेतपिकांना पाहिजे तेव्हाच व मोजकाच पाऊस पडत असल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची, धरणाची, नदी-नाल्याची अवस्था बिकट असून दमदार पावसासह पावसाच्या झडीची आता तालुक्यातील शेतकºयांना प्रतीक्षा आहे.मागील तेरा दिवसांपासून आर्वी तालुक्यात पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे पिकांची अवस्था वाईट आहे. जुलै अखेरच्या टप्प्यात असतानाही जोरदार पाऊस नाही. परिणामी, पिकांची वाढ खुंटलेली असून झडीची प्रतीक्षा आहे.- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता. आर्वी.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस