शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:27 IST

मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : शेतकरी चिंतित, जोरदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पहिल्यांदाच पावसाचे आगमन जुलै महिन्यात उशिराने झाले. पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने मागील आठवड्यात तालुक्यातील शेतकºयांनी पेरणी केली आणि पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहे.सोयाबीन पिकाला जुलै महिन्यात पेरणीनंतर सतत पावसाची गरज पडते. त्यातही हवामान खात्याने जुलै महिन्यात पावसाचा खंड असल्याचे सांगितल्याने शेतकरी धास्तावले होते. कपाशी व तूर उत्पादकांना पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्यात शेतकऱ्यांचे समाधान होईल इतकाही पाऊस झाला नाही. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी जुलै महिन्यात पेरणी केली; परंतु जुलै महिना हा खरा पावसाचा असूनही म्हणावे तसेच सातत्य आढळून आले नाही. जुलै संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. तालुक्यात वाढोणा, देऊरवाडा, वागदा, अहिरवाडा, नांदपूर, अहिरवाडा, टाकरखेडा, एकलारा, नांदपूर, शिरपूर, जळगाव, खुबगाव, पाचेगाव, दहेगाव, वर्धमनेरी, मांडला, रोहणा, पिंपळखुटा, चिंचोली, गुमगाव, नेरी, सावळापूर आदी गावातील शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी पेरणीनंतर तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने सिंचनाची सुविधा असणाºया शेतकºयांनी आपल्या शेतपिकाला जगविण्यासाठी सिंचन करणे सुरू केले होते. ज्या शेतकºयाकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांना वरूणराजा बरसण्याची प्रतीक्षा कायम होती.सर्वत्र शेतकºयाकडून वरूणराजा लवकर बरसावा यासाठी प्रार्थना सुरू होती. अखेर वरूणराजाचे तालुक्यात आगमन झाल्याने काही दिवसासाठी पीक वाढीसाठी दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यात शेतपिकांना पाहिजे तेव्हाच व मोजकाच पाऊस पडत असल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची, धरणाची, नदी-नाल्याची अवस्था बिकट असून दमदार पावसासह पावसाच्या झडीची आता तालुक्यातील शेतकºयांना प्रतीक्षा आहे.मागील तेरा दिवसांपासून आर्वी तालुक्यात पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे पिकांची अवस्था वाईट आहे. जुलै अखेरच्या टप्प्यात असतानाही जोरदार पाऊस नाही. परिणामी, पिकांची वाढ खुंटलेली असून झडीची प्रतीक्षा आहे.- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता. आर्वी.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस