शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूविरोधात खासगी डॉक्टरांची मोहीम

By admin | Updated: November 10, 2014 22:48 IST

जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ चितांजनक आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत असल्याने, आरोग्य विभागाच्या वतीने केले जाणारे प्रयत्न अपूरे ठरत आहे. याकरिता डेंग्यूआजाराच्या

वर्धा : जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ चितांजनक आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत असल्याने, आरोग्य विभागाच्या वतीने केले जाणारे प्रयत्न अपूरे ठरत आहे. याकरिता डेंग्यूआजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांचा सहभाग मिळावा, जनजागृती व्हावी याकरिता वर्धा शहराच्या विविध भागात, विशेषत: रुग्णसंख्या जास्त असलेल्या झोपडपट्टी भागात आरोग्य विभाग वर्धा व वर्धा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने पुलफैल सुदर्शन वॉर्डात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पावडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील बहुसंख्य खासगी डॉक्टर्स सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात डेंग्यू आजाराविषयक ध्वनी चित्रफित दाखवून करण्यात आली. डॉ. पावडे यांनी नागरिकांना डेंग्यू आजाराविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. डेंग्यू आजाराची लक्षणे, एकाएकी ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायु दुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढ उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालय किंवा जवळच्या दवाखान्यात जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा आजार एडिस इजिप्टी या डासांमुळे पसरतो, या डासांची पैदास घरगुती पाण्याचे साठे, कुलरची टाकी, निरुपयोगी साहित्य, टायर्स, नारळाच्या करवट्या, प्लास्टिकचे कप, फुटलेली भांडी इत्यादी मध्ये साचून असलेल्या पाण्यात होते. डासांची उत्पत्ती होऊ नये या करिता पाण्याची भांडी झाकून ठेवणे, आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी घासून स्वच्छ करावी, कुलर रिकामे करावे, निरुपयोगी साहित्य नष्ठ करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, डास चाऊ नये यासाठी, मच्छर दूर पळणारे क्रीम अगरबत्ती लावावी तसेच झोपताना मच्छरदानीचा उपयोग करावा, पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावे या सारख्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून काळजी घेतल्यास डेंग्यूला पूर्णपणे हद्दपार करणे सहज शक्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन डासअळ्या नष्ठ करण्यासाठी टेमीफॉस पाण्यात औषधी टाकण्यात आली. तसेच डासांची पैदास असलेली भांडी, हौद रिकामे करण्यात आले. तसेच डेंग्यू आजाराविषयक माहिती असलेली तसेच ती टाळण्यासाठीच्या उपाययोजना आणि त्यावरील उपाय याविषयक हस्तपत्रके वाटण्यात आली. या अभियानात डॉ. सचिन पावडे, डॉ. चंद्रकात जाधव, डॉ. नऊल घाटे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. सातपुते, डॉ. भगत, डॉ. अरविंद वंजारी, डॉ. सायरे, डॉ. मेशकर, डॉ. मेहरे, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी, समितीचे सर्व पदाधिकारी तसेच वर्धा डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शंतनू चव्हाण यांनी केले. अशाच प्रकारचे कार्यक्रम शहराच्या विविध भागात घेणार असल्याचेही वर्धा डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख डॉ. पावडे यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनाही डेंग्यू आजाराची भयावहता लक्षात घेत या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.(शहर प्रतिनिधी)