शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जीवनावश्यक वस्तूंचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:55 IST

विदर्भातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात लोकसभेकरिता मतदान पार पडले. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळताना दिसून आले.

ठळक मुद्दे३० ते ४० टक्क्यांनी वाढ : गृहिणींचे अर्थकारण बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात लोकसभेकरिता मतदान पार पडले. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळताना दिसून आले. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, साबुदाणा महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडले.मागील तीन महिन्यांत तूर डाळीच्या भावात किलोमागे ९ रुपयांनी वाढ होऊन ७४ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ ६ ते ८ रुपयांनी वधारून ५८ ते ६० रुपये, मठ डाळ १२ रुपयांनी वाढून ८२ ते ८४ रुपये, मूग व उडीद डाळीत २ रुपयांनी वाढ होऊन अनुक्रमे ७६ ते ७८ रुपये, ६२ ते ६४ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. तांदूळ क्विंटलमागे दोन ते अडीच रुपयांनी महाग होऊन २८ ते ११२ रुपयांपर्यंत विक्री होत आहे.गव्हाची मध्य प्रदेश आणि राजस्थानातून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गव्हाच्या भावावर जास्त परिणाम दिसून आला नाही. बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची सातत्याने दरवाढ सुरूच आहे. पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचेही भाव कडाडले आहे. टमाटर, वांगी वगळता सर्वच भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. डाळींचा वापर करावा, त्याही महागल्याने गृहिणींचे अर्थकारण कोलमडले आहे. दरवाढ नियंत्रणात आणेल कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.