शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्क्यांकरिता अध्यक्षपदावर नजरा

By admin | Updated: February 8, 2015 23:36 IST

शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे.

पाणी पुरवठा समितीच्या गठणात गोंधळ : योजनेकरिता जिल्ह्यातील ५८ गावांची निवड वर्धा : शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे. याच १० टक्क्यांचा लाभ मिळण्याकरिता सध्या जिल्ह्यात गोंधळ सुरू आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठित होणाऱ्या समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरणार आहे. हेच अध्यक्षपद आपल्याला मिळावे याकरिता समितीच्या गठणाकरिता होणाऱ्या ग्रामसभेत वाद होवून सभा तहकूब होत आहेत. जिल्ह्यातील गावांगावात नागरिकांना पाणी मिळावे याकरिता केंद्र शासनाच्यावतीने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील ५८ गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना तिचे सर्व अधिकारी योजना राबविणाऱ्या समितीला देण्यात आले आहे. तसे शासनाचे आदेशही आहेत. याच कारणाने निवड झालेल्या गावात ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभा घेत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्यात येत आहे. योजनेच्या सर्व्हेसह त्याचा आराखड तयार करणे व ती राबविण्याकरिता लागणारा खर्च समितीलाच ठरवावयाचा आहे. समितीने केलेल्या सूचनेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कारणाने समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरत आहे. अध्यक्षपद आपल्याकडेच असावे याकरिता गावातील काही लोकप्रतिनिधीत रस्सीखेच सुरू आहे. ग्रामसभेत समितीच्या सदस्यांची निवड झाल्यावर अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीची वेळ आल्यावर वाद झाल्याच्या घटना घडत आहे. याचे ताजे उदाहरण नाचणगाव येथील ग्रामसभा ठरत आहे. नाचणगाव येथील सिद्धधेश्वर मंदिरात शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) झालेल्या सभेत सदस्यांच्या निवडीपर्यंत सर्वकाम सुरळीत सुरू होते. अध्यक्ष व सचिवाच्या निवडीची वेळ येताच सदस्य आमने-सामने आले. यावेळी सदस्यांत चांगलीच हमरी-तुमरी झाली. सदस्यांत असलेला हा वाद निपटने कठीण होत असल्याने अखेर ही सभा तहकूब करण्यात आली. असे या गावात दोन वेळा घडले. जिल्ह्यातही हिच परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)योजनेचे सर्व अधिकार समितीला निवड झालेल्या गावात पाणी पुरवठा योजना राबविताना तिचे सर्वस्वी अधिकार गठित झालेल्या समितीला देण्यात आले आहे. या समितीच्या ठरावानुसार काम होणार आहे. गावात योजना राबविताना सर्व्हे करण्यापासून तर त्याकरिता लागणारा खर्च व काम करणाऱ्या कंत्राटदाराची निवड हिच समिती करणार आहे. यात शासनाचे अभियंता केवळ गावाने ठेवलेल्या ठरावात दिलेल्या योजनेवर किती खर्च येईल याची माहिती देतील. यामुळे योजना राबविताना समितीचा अध्यक्ष हुकमी एक्का ठरणार आहे. समितीच्या गठणाची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निवड झालेल्या गावात ग्रामसभेतून ही समिती गठित करण्याची जबाबदारी त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. समितीचे अध्यक्षपद लाभाचे ठरणार असल्याने या समितीचे गठण करणे या अधिकाऱ्यांकरिता अडचणीचे ठरत आहे.