शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

१० टक्क्यांकरिता अध्यक्षपदावर नजरा

By admin | Updated: February 8, 2015 23:36 IST

शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे.

पाणी पुरवठा समितीच्या गठणात गोंधळ : योजनेकरिता जिल्ह्यातील ५८ गावांची निवड वर्धा : शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे. याच १० टक्क्यांचा लाभ मिळण्याकरिता सध्या जिल्ह्यात गोंधळ सुरू आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठित होणाऱ्या समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरणार आहे. हेच अध्यक्षपद आपल्याला मिळावे याकरिता समितीच्या गठणाकरिता होणाऱ्या ग्रामसभेत वाद होवून सभा तहकूब होत आहेत. जिल्ह्यातील गावांगावात नागरिकांना पाणी मिळावे याकरिता केंद्र शासनाच्यावतीने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील ५८ गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना तिचे सर्व अधिकारी योजना राबविणाऱ्या समितीला देण्यात आले आहे. तसे शासनाचे आदेशही आहेत. याच कारणाने निवड झालेल्या गावात ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभा घेत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्यात येत आहे. योजनेच्या सर्व्हेसह त्याचा आराखड तयार करणे व ती राबविण्याकरिता लागणारा खर्च समितीलाच ठरवावयाचा आहे. समितीने केलेल्या सूचनेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कारणाने समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरत आहे. अध्यक्षपद आपल्याकडेच असावे याकरिता गावातील काही लोकप्रतिनिधीत रस्सीखेच सुरू आहे. ग्रामसभेत समितीच्या सदस्यांची निवड झाल्यावर अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीची वेळ आल्यावर वाद झाल्याच्या घटना घडत आहे. याचे ताजे उदाहरण नाचणगाव येथील ग्रामसभा ठरत आहे. नाचणगाव येथील सिद्धधेश्वर मंदिरात शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) झालेल्या सभेत सदस्यांच्या निवडीपर्यंत सर्वकाम सुरळीत सुरू होते. अध्यक्ष व सचिवाच्या निवडीची वेळ येताच सदस्य आमने-सामने आले. यावेळी सदस्यांत चांगलीच हमरी-तुमरी झाली. सदस्यांत असलेला हा वाद निपटने कठीण होत असल्याने अखेर ही सभा तहकूब करण्यात आली. असे या गावात दोन वेळा घडले. जिल्ह्यातही हिच परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)योजनेचे सर्व अधिकार समितीला निवड झालेल्या गावात पाणी पुरवठा योजना राबविताना तिचे सर्वस्वी अधिकार गठित झालेल्या समितीला देण्यात आले आहे. या समितीच्या ठरावानुसार काम होणार आहे. गावात योजना राबविताना सर्व्हे करण्यापासून तर त्याकरिता लागणारा खर्च व काम करणाऱ्या कंत्राटदाराची निवड हिच समिती करणार आहे. यात शासनाचे अभियंता केवळ गावाने ठेवलेल्या ठरावात दिलेल्या योजनेवर किती खर्च येईल याची माहिती देतील. यामुळे योजना राबविताना समितीचा अध्यक्ष हुकमी एक्का ठरणार आहे. समितीच्या गठणाची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निवड झालेल्या गावात ग्रामसभेतून ही समिती गठित करण्याची जबाबदारी त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. समितीचे अध्यक्षपद लाभाचे ठरणार असल्याने या समितीचे गठण करणे या अधिकाऱ्यांकरिता अडचणीचे ठरत आहे.