शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

१० टक्क्यांकरिता अध्यक्षपदावर नजरा

By admin | Updated: February 8, 2015 23:36 IST

शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे.

पाणी पुरवठा समितीच्या गठणात गोंधळ : योजनेकरिता जिल्ह्यातील ५८ गावांची निवड वर्धा : शासकीय योजना राबविताना आलेल्या निधीतील १० टक्के वाटा योजनेकरिता निवड झालेल्या भागातील लोकप्रतिनिधीचा, असा अलिखित नियमच झाला आहे. याच १० टक्क्यांचा लाभ मिळण्याकरिता सध्या जिल्ह्यात गोंधळ सुरू आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठित होणाऱ्या समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरणार आहे. हेच अध्यक्षपद आपल्याला मिळावे याकरिता समितीच्या गठणाकरिता होणाऱ्या ग्रामसभेत वाद होवून सभा तहकूब होत आहेत. जिल्ह्यातील गावांगावात नागरिकांना पाणी मिळावे याकरिता केंद्र शासनाच्यावतीने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील ५८ गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना तिचे सर्व अधिकारी योजना राबविणाऱ्या समितीला देण्यात आले आहे. तसे शासनाचे आदेशही आहेत. याच कारणाने निवड झालेल्या गावात ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभा घेत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्यात येत आहे. योजनेच्या सर्व्हेसह त्याचा आराखड तयार करणे व ती राबविण्याकरिता लागणारा खर्च समितीलाच ठरवावयाचा आहे. समितीने केलेल्या सूचनेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कारणाने समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे ठरत आहे. अध्यक्षपद आपल्याकडेच असावे याकरिता गावातील काही लोकप्रतिनिधीत रस्सीखेच सुरू आहे. ग्रामसभेत समितीच्या सदस्यांची निवड झाल्यावर अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीची वेळ आल्यावर वाद झाल्याच्या घटना घडत आहे. याचे ताजे उदाहरण नाचणगाव येथील ग्रामसभा ठरत आहे. नाचणगाव येथील सिद्धधेश्वर मंदिरात शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) झालेल्या सभेत सदस्यांच्या निवडीपर्यंत सर्वकाम सुरळीत सुरू होते. अध्यक्ष व सचिवाच्या निवडीची वेळ येताच सदस्य आमने-सामने आले. यावेळी सदस्यांत चांगलीच हमरी-तुमरी झाली. सदस्यांत असलेला हा वाद निपटने कठीण होत असल्याने अखेर ही सभा तहकूब करण्यात आली. असे या गावात दोन वेळा घडले. जिल्ह्यातही हिच परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)योजनेचे सर्व अधिकार समितीला निवड झालेल्या गावात पाणी पुरवठा योजना राबविताना तिचे सर्वस्वी अधिकार गठित झालेल्या समितीला देण्यात आले आहे. या समितीच्या ठरावानुसार काम होणार आहे. गावात योजना राबविताना सर्व्हे करण्यापासून तर त्याकरिता लागणारा खर्च व काम करणाऱ्या कंत्राटदाराची निवड हिच समिती करणार आहे. यात शासनाचे अभियंता केवळ गावाने ठेवलेल्या ठरावात दिलेल्या योजनेवर किती खर्च येईल याची माहिती देतील. यामुळे योजना राबविताना समितीचा अध्यक्ष हुकमी एक्का ठरणार आहे. समितीच्या गठणाची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निवड झालेल्या गावात ग्रामसभेतून ही समिती गठित करण्याची जबाबदारी त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. समितीचे अध्यक्षपद लाभाचे ठरणार असल्याने या समितीचे गठण करणे या अधिकाऱ्यांकरिता अडचणीचे ठरत आहे.