शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे

By admin | Updated: March 6, 2016 02:22 IST

स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तशी प्रक्रिया सुरू केली जात आहे.

२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया रद्द करण्याची मागणीवर्धा : स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तशी प्रक्रिया सुरू केली जात आहे. याविरूद्ध डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.शासनाने कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ग्रामीण भागातील तसेच पाडा, बेडा, वस्ती-तांड्यावर वास्तव्य करणाऱ्या चिमुकल्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करणारा आहे. समाजाला शिक्षणापासून वंचित केले की, अज्ञान, अंधश्रद्धा, धार्मिक, गुलामगिरी त्यांच्यावर लादता येते. या अघोरी लालसेपोटी शासनातील शोषणवादी व्यवस्थेने जाणीवपूर्वक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. जग विज्ञानाच्या उंच भरारीने पूढे जात असताना पुरोगामी महाराष्ट्रात हे सरकार गरीब, शेतकरी, कष्टकरी व शेतमजुरांच्या मुलांना अज्ञानाच्या दरीत ढकलत आहे. शासनाचा हा निर्णय मानवी अधिकाराची पायमल्ली करणारा असून घटनादत्त मुलभूत अधिकारावर गदा आणणारा आहे. शिक्षण हक्क कायद्याला मुठमाती देणारा आहे, असा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेसह विविध संघटनांनी केला. शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण हक्क अबाधित राहावा म्हणून प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात परिषदेचे प्रवीण पाटभाजे, सुनील सावध, मुख्याध्यापक परिषदेचे प्रकाश खंडार, राजेश फटिंग, चंद्रशेखर भुजाडे, प्रकाश चरडे, संतोष डंभारे, प्रदीप मसने, मराठा सेवा संघाचे राजाभाऊ वानखेडे, सुधीर गिऱ्हे यासह संभाजी, जिजाऊ ब्रिगेड, अ.भा. अंनिस, भगतसिंग युवक कक्ष, युवा सोशल फोरम, आंबेडकरी बुद्धीस्ट व ओबीसी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)