शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

कीटकजन्य आजारांवर प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:04 IST

हिवतापासह अन्य कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या सुरूवातीला डोके वर काढतात. सदर आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यांना वेळीच पायबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा महिनाभर राबविणार जागृतीपर उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिवतापासह अन्य कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या सुरूवातीला डोके वर काढतात. सदर आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यांना वेळीच पायबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना जाहीर करीत सदर महिन्यात विविध उपक्रम हाती घेवून नागरिकांमध्ये कोरडा दिवस पाळणे आदी विषया संदर्भात प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे.हिवताप, डेंग्यु, चिकणगुनिया, चंडीपूरा व हत्तीरोग आदी किटकजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण होऊन त्यांच्या प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टिने जून महिन्यात गाव पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाययोजना यांची माहिती तज्ज्ञ व्यक्ती नागरिकांना देणार आहेत. डासोत्पत्ती टाळणे, प्रतिरोध उपाययोजनामध्ये लोकसहभाग वाढविणे हा महिनाभर राबविण्यात येणाºया हिवताप प्रतिरोध उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या आजारांच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी व लोकसंख्येतील जंतुभार कमी करण्यासाठी, उपचार तसेच डासोत्पत्ती स्थानांची निर्मिती होऊ न देणे, याची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी भागांमध्ये या आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी किटकजन्य आजार हिवताप प्रतिरोध महिना जुन मध्ये राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून नागरिकांनीही यात सहभागी होत आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने, जि.प.च्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले आहे.नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचेकोणतीही आरोग्याबाबतची योजना जनतेच्या सक्रीय सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. रुग्ण शोध मोहीम तसेच डासांवर नियंत्रणासाठी जनतेच्या सहभागाला महत्त्व प्राप्त आहे. म्हणून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किटकजन्य कार्यक्रमास सहकार्य करावे. तसेच दक्ष राहून डासांपासून प्रसार होणाºया आजारावर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला मदत करावी, असे कळविण्यात आले आहे.गावागावात तज्ज्ञ करणार मार्गदर्शनकुठल्याही गोष्टीची जनजागृती ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. नागरिकांनीही यात सहभागी होत उपक्रम यशस्वी करणे गरजचे आहे. किटकजन्य आजार प्रतिरोध मोहीम ही शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व कार्यक्षेत्रात येणाºया उपकेंद्र व त्याअंतर्गत गावपातळीपर्यंत राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान तज्ज्ञ मंडळी नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.प्रतिबंधात्मक उपायांची देणारमाहितीसदर मोहिमेत अतिसंवेदनशील गावात ग्रामसभा घेवून तेथील रहिवाशांना किटकजन्य आजार कशापासून होते. त्याचा प्रसार कशा पासून होतो, आजाराची लक्षणे कुठली, उपचाराची उपलब्धता, प्रभावी किटकनाशकांची फवारणी, मच्छरदाणीचा वापर, शोष खड्डयांची निर्मिती, व्हेंट पाईपला जाळ्या बसविने व डासअळी तयार होऊ नये याबाबतची माहिती जनतेला देण्यात येणार आहे.कोरड्या दिवसाचे पटवून देणार विद्यार्थ्यांना महत्त्वगावत सदर आजाराविषयी दवंडी, दिंडया व गटसभा माध्यमाने प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना कोरडा दिवस म्हणजे काय व त्याचे फायदे याची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात येणार आहे.