शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

कीटकजन्य आजारांवर प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:04 IST

हिवतापासह अन्य कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या सुरूवातीला डोके वर काढतात. सदर आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यांना वेळीच पायबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा महिनाभर राबविणार जागृतीपर उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिवतापासह अन्य कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या सुरूवातीला डोके वर काढतात. सदर आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यांना वेळीच पायबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना जाहीर करीत सदर महिन्यात विविध उपक्रम हाती घेवून नागरिकांमध्ये कोरडा दिवस पाळणे आदी विषया संदर्भात प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे.हिवताप, डेंग्यु, चिकणगुनिया, चंडीपूरा व हत्तीरोग आदी किटकजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण होऊन त्यांच्या प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टिने जून महिन्यात गाव पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाययोजना यांची माहिती तज्ज्ञ व्यक्ती नागरिकांना देणार आहेत. डासोत्पत्ती टाळणे, प्रतिरोध उपाययोजनामध्ये लोकसहभाग वाढविणे हा महिनाभर राबविण्यात येणाºया हिवताप प्रतिरोध उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या आजारांच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी व लोकसंख्येतील जंतुभार कमी करण्यासाठी, उपचार तसेच डासोत्पत्ती स्थानांची निर्मिती होऊ न देणे, याची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी भागांमध्ये या आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी किटकजन्य आजार हिवताप प्रतिरोध महिना जुन मध्ये राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून नागरिकांनीही यात सहभागी होत आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने, जि.प.च्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले आहे.नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचेकोणतीही आरोग्याबाबतची योजना जनतेच्या सक्रीय सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. रुग्ण शोध मोहीम तसेच डासांवर नियंत्रणासाठी जनतेच्या सहभागाला महत्त्व प्राप्त आहे. म्हणून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किटकजन्य कार्यक्रमास सहकार्य करावे. तसेच दक्ष राहून डासांपासून प्रसार होणाºया आजारावर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला मदत करावी, असे कळविण्यात आले आहे.गावागावात तज्ज्ञ करणार मार्गदर्शनकुठल्याही गोष्टीची जनजागृती ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. नागरिकांनीही यात सहभागी होत उपक्रम यशस्वी करणे गरजचे आहे. किटकजन्य आजार प्रतिरोध मोहीम ही शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व कार्यक्षेत्रात येणाºया उपकेंद्र व त्याअंतर्गत गावपातळीपर्यंत राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान तज्ज्ञ मंडळी नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.प्रतिबंधात्मक उपायांची देणारमाहितीसदर मोहिमेत अतिसंवेदनशील गावात ग्रामसभा घेवून तेथील रहिवाशांना किटकजन्य आजार कशापासून होते. त्याचा प्रसार कशा पासून होतो, आजाराची लक्षणे कुठली, उपचाराची उपलब्धता, प्रभावी किटकनाशकांची फवारणी, मच्छरदाणीचा वापर, शोष खड्डयांची निर्मिती, व्हेंट पाईपला जाळ्या बसविने व डासअळी तयार होऊ नये याबाबतची माहिती जनतेला देण्यात येणार आहे.कोरड्या दिवसाचे पटवून देणार विद्यार्थ्यांना महत्त्वगावत सदर आजाराविषयी दवंडी, दिंडया व गटसभा माध्यमाने प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना कोरडा दिवस म्हणजे काय व त्याचे फायदे याची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात येणार आहे.