शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य द्या

By admin | Updated: May 3, 2016 02:39 IST

जिल्हा लोकशाही दिनात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीची

वर्धा : जिल्हा लोकशाही दिनात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीची माहिती तात्काळ उपलब्ध करून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.जिल्हा लोकशाही दिनात सोमवारी जिल्ह्यातून आलेल्या आठ नवीन तक्रारी व दहा जुन्या अशा एकूण १८ तक्रारींची दखल घेण्यात आली. यावेळी प्रत्येक तक्रारदारांनी त्यांचे गाऱ्हाणे मांडले. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी प्रत्येक तक्रारी संदर्भात माहिती घेऊन संबंधित विभागांना जनतेच्या तक्रारीवर प्राधान्याने निर्णय घेण्याच्या सूचना केल्यात.बोरगाव पुनर्वसन येथील विनोद महादेव कदम यांनी खासगी सावकाराकडून ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह कर्जाची माफी योजनेंतर्गत मिळावी यासाठी अर्ज केला. तालुकास्तरीय समितीने यावर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात.ग्रामीण भागातील शेतीची मोजणी न झाल्यामुळे बांदबंदीस्तीची कामे खोळंबली. इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळावा तसेच वैयक्तिक अडचणी तक्रारदारांनी आपल्या तक्रारी आज दाखल केल्यात. यामध्ये वर्ध्याच्या रामनगर येथील वामन उर्फ बाबा नाईक, भारत गोपाळ अलोनी (वरूड), वामन गोमासे, आंजी (मो.), जमनाबाई नाईक (रोहणा), मोनीबाबा निफाटे (पिंपळखुटा), केशव नामदेव बुराडे (वाघोली), कवडेश्वर बोबडे (हिंगणघाट), वसंत ढोबे (वर्धा) अशा आठ नवीनसह जुन्या १० तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, उपवनसंरक्षक पगार, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता देशपांडे, महसूल उपविभागीय अधिकारी, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड तसेच विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)