शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

शिंदुल्यांच्या झांज्यांची प्रथा आश्रमात आजही कायम

By admin | Updated: May 30, 2016 01:48 IST

मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता ...

पावसापासून बापुकूटीच्या संरक्षणाची तयारी : मातीच्या भिंतीला बांधल्या जात आहेत झांज्या सेवाग्राम: मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता पूर्वीपासूनच शिंदुल्याच्या पानांपासून तयार करण्यात येत असलेल्या झांज्या लावण्याची प्रथा आहे. पावसाच्या पाण्यापासून इमारत बचावाकरिता अनेक अत्याधुनिक वस्तू बाजारात आल्या असताना सेवाग्राम आश्रमात आजही ही प्रथा जपल्या जात आहे. आजही या शिंदुल्याच्या पाण्याच्या झांज्या लावून पावसापासून बापुकूटीच्या भिंतीचे संरक्षण सुूर आहे. बापुकूटी संपूर्ण देशाकरिता पे्ररणास्थान असल्याने येथे देशविदेशातील विचारवंत व पर्यटक येतात. आश्रमातील स्मारके माती व कुडाचे असल्याने पावसाच्या पाण्याचा मारा बसून या भिंतीना नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. आश्रमात महात्मा गांधी वास्तव्यास असताना भिंतीच्या संरक्षणाकरिता शिंदुल्यांच्या झांड्या लावल्या होत्या. तेव्हापासून ही प्रथा आजही जपली जात आहे. दर वर्षी लावलेल्या झांज्या काढून त्या सुरक्षित ठेवत पुढच्या वर्षी वापरण्यात येतात. तर ज्या खराब झाल्या त्या नष्ट करून नव्याने दुसऱ्या तयार करण्यात येतात. आश्रमात आदी निवास, बा व बापुकूटी, बापू दप्तर, आखरी निवास, रसोडा आदी स्मारके आहेत. यातील आखरी निवास व रसोडा वगळता सर्व स्मारके माती, कुंड, बांबू आदी साहित्यापासून बनविण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात या भिंतींना धोका असतो. यामुळे त्यांच्या रक्षणासाठी शिंदूल्यांच्या झांड्या तयार करून भिंतीना लावण्याची परंपरा होती. या भागात मोठ्या प्रमाणात शिंदूल्याचे जंगलच असल्याने बापूंच्या काळापासूनच झांड्या लावण्याला प्रारंभ झाला होता. आज शिंदुल्यांच्या झाडांचे प्रमाण कमी झाले शिवाय त्या पाण्यापासून झांज्या तयार करणारे कारागिर मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याने सांगण्यात येत आहे. करंजी, पुजई नाही तर रामटेक येथून पानं आणून त्याच्या झांज्या तयार करण्यात येत आहे. पावसापूर्वीच कामाला प्रारंभ झाला असून पहिले बापुकूटी व बापू दप्तरला झांज्या लावण्यात येत आहे.(वार्ताहर)साहित्य मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न पूर्वीच्या तुलनेत आज असे साहित्य मिळविणे कठीण झाले आहे. शिंदुल्याचे जंगल कमी झाल्याने पाने मिळत नाही. यामुळे बाहेर जिल्ह्यातून ही पाने मागवावी लागत आहेत. मात्र नैसर्गिक पद्धत जपण्याची आश्रमाची प्रथा मोडणे शक्य नाही. यामुळे अनेक प्रयत्नांती साहित्य मिळविण्यात येते.