शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

शिंदुल्यांच्या झांज्यांची प्रथा आश्रमात आजही कायम

By admin | Updated: May 30, 2016 01:48 IST

मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता ...

पावसापासून बापुकूटीच्या संरक्षणाची तयारी : मातीच्या भिंतीला बांधल्या जात आहेत झांज्या सेवाग्राम: मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता पूर्वीपासूनच शिंदुल्याच्या पानांपासून तयार करण्यात येत असलेल्या झांज्या लावण्याची प्रथा आहे. पावसाच्या पाण्यापासून इमारत बचावाकरिता अनेक अत्याधुनिक वस्तू बाजारात आल्या असताना सेवाग्राम आश्रमात आजही ही प्रथा जपल्या जात आहे. आजही या शिंदुल्याच्या पाण्याच्या झांज्या लावून पावसापासून बापुकूटीच्या भिंतीचे संरक्षण सुूर आहे. बापुकूटी संपूर्ण देशाकरिता पे्ररणास्थान असल्याने येथे देशविदेशातील विचारवंत व पर्यटक येतात. आश्रमातील स्मारके माती व कुडाचे असल्याने पावसाच्या पाण्याचा मारा बसून या भिंतीना नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. आश्रमात महात्मा गांधी वास्तव्यास असताना भिंतीच्या संरक्षणाकरिता शिंदुल्यांच्या झांड्या लावल्या होत्या. तेव्हापासून ही प्रथा आजही जपली जात आहे. दर वर्षी लावलेल्या झांज्या काढून त्या सुरक्षित ठेवत पुढच्या वर्षी वापरण्यात येतात. तर ज्या खराब झाल्या त्या नष्ट करून नव्याने दुसऱ्या तयार करण्यात येतात. आश्रमात आदी निवास, बा व बापुकूटी, बापू दप्तर, आखरी निवास, रसोडा आदी स्मारके आहेत. यातील आखरी निवास व रसोडा वगळता सर्व स्मारके माती, कुंड, बांबू आदी साहित्यापासून बनविण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात या भिंतींना धोका असतो. यामुळे त्यांच्या रक्षणासाठी शिंदूल्यांच्या झांड्या तयार करून भिंतीना लावण्याची परंपरा होती. या भागात मोठ्या प्रमाणात शिंदूल्याचे जंगलच असल्याने बापूंच्या काळापासूनच झांड्या लावण्याला प्रारंभ झाला होता. आज शिंदुल्यांच्या झाडांचे प्रमाण कमी झाले शिवाय त्या पाण्यापासून झांज्या तयार करणारे कारागिर मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याने सांगण्यात येत आहे. करंजी, पुजई नाही तर रामटेक येथून पानं आणून त्याच्या झांज्या तयार करण्यात येत आहे. पावसापूर्वीच कामाला प्रारंभ झाला असून पहिले बापुकूटी व बापू दप्तरला झांज्या लावण्यात येत आहे.(वार्ताहर)साहित्य मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न पूर्वीच्या तुलनेत आज असे साहित्य मिळविणे कठीण झाले आहे. शिंदुल्याचे जंगल कमी झाल्याने पाने मिळत नाही. यामुळे बाहेर जिल्ह्यातून ही पाने मागवावी लागत आहेत. मात्र नैसर्गिक पद्धत जपण्याची आश्रमाची प्रथा मोडणे शक्य नाही. यामुळे अनेक प्रयत्नांती साहित्य मिळविण्यात येते.