शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: December 30, 2015 02:41 IST

राज्य शासनाच्यावतीने वीज वितरण कंपनीकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना...

विभाजनाचा विरोध : विविध मागण्यांचे निवदेन सादर वर्धा : राज्य शासनाच्यावतीने वीज वितरण कंपनीकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होणार असल्याचा आरोप वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या विरोधात मंगळवारी मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार, महावितरण कंपनीचे क्षेत्रिय पातळीवर पाच विभागात विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सर्वच स्तरावरून विरोध दर्शविण्यात येत आहे. महावितरण कंपनीमध्ये तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी एक ते चारमधील कोणतीही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता रिक्त जागा व मागासवर्गीयांचा अनुशेष लक्ष्यात घेत भरण्याची मागणी यातून करण्यात आली. शासनाच्यावतीने ५ नोव्हेंबर २०१५ रोजी काढण्यात आलेले परिपत्रक मागासवर्गीयांच्या संवैधानिक हक्कांच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आहे. ते परिपत्रक त्वरीत मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. ३० आॅक्टोबर २००९ चे परिपत्रक संविधानाच्या कलम ३३५ च्या विरोधात आहे. या संदर्भातील सुधारित परिपत्रक काढून निवड पदांमध्ये मागासवर्गीयांना गुणांची सवलत देण्यात यावी. वीज कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दोन वर्षांपूर्वी एक तृतीयांश उपदानाची रक्कम पूर्वीप्रमाणेच देण्यात यावी. वीज कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या धर्तीवर पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सर्व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे निवदेन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जानेवारी महिन्यात राज्यव्यापारी संप पुकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)