शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

वीज कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: December 30, 2015 02:41 IST

राज्य शासनाच्यावतीने वीज वितरण कंपनीकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना...

विभाजनाचा विरोध : विविध मागण्यांचे निवदेन सादर वर्धा : राज्य शासनाच्यावतीने वीज वितरण कंपनीकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होणार असल्याचा आरोप वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या विरोधात मंगळवारी मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार, महावितरण कंपनीचे क्षेत्रिय पातळीवर पाच विभागात विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सर्वच स्तरावरून विरोध दर्शविण्यात येत आहे. महावितरण कंपनीमध्ये तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी एक ते चारमधील कोणतीही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता रिक्त जागा व मागासवर्गीयांचा अनुशेष लक्ष्यात घेत भरण्याची मागणी यातून करण्यात आली. शासनाच्यावतीने ५ नोव्हेंबर २०१५ रोजी काढण्यात आलेले परिपत्रक मागासवर्गीयांच्या संवैधानिक हक्कांच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आहे. ते परिपत्रक त्वरीत मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. ३० आॅक्टोबर २००९ चे परिपत्रक संविधानाच्या कलम ३३५ च्या विरोधात आहे. या संदर्भातील सुधारित परिपत्रक काढून निवड पदांमध्ये मागासवर्गीयांना गुणांची सवलत देण्यात यावी. वीज कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दोन वर्षांपूर्वी एक तृतीयांश उपदानाची रक्कम पूर्वीप्रमाणेच देण्यात यावी. वीज कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या धर्तीवर पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सर्व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे निवदेन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जानेवारी महिन्यात राज्यव्यापारी संप पुकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)