शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:16 IST

महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे. यामुळे पिकांच्या सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी शिवसेना, शेतकºयांनी केली. याबाबत बुधवारी महावितरणचे अभियंता सदावर्ते यांना निवेदन देण्यात आले.शिवसेना तालुका प्रमुख गणेश इखार व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे यांच्या नेतृत्वात शेतकºयांच्या ओलित व अन्य समस्या लक्षात घेत महावितरणला निवेदन देण्यात आले. ऐन थंडीच्या दिवसात रात्री ११ वाजता वीज पुरवठा सुरू होत असल्याने ओलित करताना अनेक संकटांना समोर जावे लागत आहे. अनेक शेतकºयांची प्रकृती खालावली असून जंगली जनावरे तथा विषारी साप, विंचू आदी प्राण्यांपासून शेतकरी व शेतमजुरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत शेतातील वीज पुरवठा असलेले वेळापत्रक तीन दिवस सकाळी व चार दिवस सायंकाळी, असे आहे. हे वेळापत्रक शेतकºयांकरिता योग्य नसून अडचणीत आणखी भर टाकणारे आहे. यामुळे तूर, गहू, चना, कापूस आदी नगदी पिके घेता येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या समस्या लक्षात घेत वेळापत्रकात योग्य तो बदल करावा व दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शिवसेना, शेतकºयांनी रोषही व्यक्त केला.निवेदन देताना प्रकाश खेकडे, निलेश वैद्य, श्याम शेंडे, सचिन पाटील, गजानन झाडे, विनोद आदमने, दिलीप राऊत, विनायक राऊत, सुरेश नन्नुरे, प्रशांत वैद्य, गजानन नन्नुरे, प्रमोद नागतोडे, बाबाराव खेकडे, धनंजय पाटील, मारोतराव नन्नुरे, विजय काकरवाल, रमेश काकरवाल, रमेश नाईक, सुरेश पंधराम, संदीप ठाकरे, पप्पू नाईक, अमोल भोयर, पांडुरंग उईके, श्याम नन्नुरे, गुलाब सिंग, सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.