शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

७५० शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:18 IST

वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.

ठळक मुद्दे२५० वीजखांब पुन्हा उभारले : युद्धपातळीवर कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यास चांगलेच झोडपले होते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने जामठा, धोत्रा, सालोड, नुरापूर, सास्ताबाद, सावली, कुरझेडा, तरोडा या ८ गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे वायफड वीज उपकेंद्र बंद पडले होते.महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि वर्धा ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी नियोजन करून सर्वप्रथम वायफड वीज उपकेंद्र्रातील बिघाड दुरुस्त करून टप्याटप्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला.त्यांच्या या नियोजनांतर्गत घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा अहोरात्र काम करीत तत्काळ सुरळीत केला. मात्र, अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने नवीन खांब उपलब्ध होईस्तोवर शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागणार होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे यांनी तातडीने सिमेंटच्या २५० खांबांची उपलब्धता करून दिली. साहित्याची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच काम सुरू करून ते त्वरित पूर्ण होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला व हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या.विस्कळीत झालेली यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी स्वीकारून केवळ १५ दिवसात सर्व वीजखांब पुन्हा नव्याने उभे करीत परिस्थिती पूर्वपदावर आणून तेथील वीजपुरवठा सुरळीत केला. महावितरणकडून विहित कालावधीत शेतीपंपाचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केल्याने परिसरातील शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या पेरणी करतेवेळी दिलासा मिळाल्याने परिसरात शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.