शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

७५० शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:18 IST

वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.

ठळक मुद्दे२५० वीजखांब पुन्हा उभारले : युद्धपातळीवर कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यास चांगलेच झोडपले होते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने जामठा, धोत्रा, सालोड, नुरापूर, सास्ताबाद, सावली, कुरझेडा, तरोडा या ८ गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे वायफड वीज उपकेंद्र बंद पडले होते.महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि वर्धा ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी नियोजन करून सर्वप्रथम वायफड वीज उपकेंद्र्रातील बिघाड दुरुस्त करून टप्याटप्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला.त्यांच्या या नियोजनांतर्गत घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा अहोरात्र काम करीत तत्काळ सुरळीत केला. मात्र, अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने नवीन खांब उपलब्ध होईस्तोवर शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागणार होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे यांनी तातडीने सिमेंटच्या २५० खांबांची उपलब्धता करून दिली. साहित्याची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच काम सुरू करून ते त्वरित पूर्ण होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला व हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या.विस्कळीत झालेली यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी स्वीकारून केवळ १५ दिवसात सर्व वीजखांब पुन्हा नव्याने उभे करीत परिस्थिती पूर्वपदावर आणून तेथील वीजपुरवठा सुरळीत केला. महावितरणकडून विहित कालावधीत शेतीपंपाचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केल्याने परिसरातील शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या पेरणी करतेवेळी दिलासा मिळाल्याने परिसरात शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.