शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

७५० शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:18 IST

वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.

ठळक मुद्दे२५० वीजखांब पुन्हा उभारले : युद्धपातळीवर कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यास चांगलेच झोडपले होते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने जामठा, धोत्रा, सालोड, नुरापूर, सास्ताबाद, सावली, कुरझेडा, तरोडा या ८ गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे वायफड वीज उपकेंद्र बंद पडले होते.महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि वर्धा ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी नियोजन करून सर्वप्रथम वायफड वीज उपकेंद्र्रातील बिघाड दुरुस्त करून टप्याटप्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला.त्यांच्या या नियोजनांतर्गत घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा अहोरात्र काम करीत तत्काळ सुरळीत केला. मात्र, अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने नवीन खांब उपलब्ध होईस्तोवर शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागणार होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे यांनी तातडीने सिमेंटच्या २५० खांबांची उपलब्धता करून दिली. साहित्याची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच काम सुरू करून ते त्वरित पूर्ण होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला व हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या.विस्कळीत झालेली यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी स्वीकारून केवळ १५ दिवसात सर्व वीजखांब पुन्हा नव्याने उभे करीत परिस्थिती पूर्वपदावर आणून तेथील वीजपुरवठा सुरळीत केला. महावितरणकडून विहित कालावधीत शेतीपंपाचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केल्याने परिसरातील शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या पेरणी करतेवेळी दिलासा मिळाल्याने परिसरात शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.