शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जनतेचा विश्वास हीच पोलिसांची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:35 IST

समाजात भितीयुक्त वातावरण तयार झाले आहे. आज आपल्याला एकमेकांचा विश्वास संपादन करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देचंद्रकांत मदने : पोलीस मित्र संघटनेचा संवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाजात भितीयुक्त वातावरण तयार झाले आहे. आज आपल्याला एकमेकांचा विश्वास संपादन करण्याची वेळ आली आहे. विश्वासातून माणसे जवळ येतात. नागरिकांमध्ये पोलिसांबाबत असलेला विश्वास हीच पोलिसांची खरी शक्ती असून पोलीस व जनतेत सामंजस्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी केले.जिजामाता विद्यालयात दक्ष नागरिक फाऊंडेशन पोलीस मित्र संघटनेतर्फे विद्यार्थ्यांकरिता आयोजित जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.मंचावर रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय मगर, लॉयन्स क्लबचे वरिष्ठ संचालक अनिल नरेडी, प्राचार्य सोनटक्के, दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार, उपाध्यक्ष इमरान राही, सचिव अंबादास जामुनकर, हरिष तांदळे, वासुदेव बोंदरे उपस्थित होते.पुढे बोलताना मदने म्हणाले, व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, मुलींची छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटनांत वाढ होताना दिसून आले. समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस असले तरी त्यांना नागरिकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगितले. ठाणेदार विजय मगर, प्राचार्य सोनटक्के, प्रकाश खंडार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करावे, असे आवाहन केले.संचालन वाघमारे यांनी केले. आभार मोहन राईकवार यांनी मानले. यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदींनी सहकार्य केले.