शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

विजेचा खेळखंडोबा, उपकरणांत बिघाड

By admin | Updated: May 9, 2016 02:13 IST

वादळ, वारा आणि पाऊस म्हटला की सर्वात आधी प्रभाव पडतो तो वीज पुरवठ्यावर! गत चार दिवसांपासून याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

वारा आला की होतो वीज पुरवठा खंडित : चार दिवसांपासून शहरांसह गावांतही लपंडाववर्धा : वादळ, वारा आणि पाऊस म्हटला की सर्वात आधी प्रभाव पडतो तो वीज पुरवठ्यावर! गत चार दिवसांपासून याचा अनुभव नागरिक घेत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात वादळी वारा व पावसाने चार दिवस थैमान घातले. यात वर्धा शहरासह ग्रामीण भागाला वीज पुरवठ्याचा सर्वाधिक फटका बसला. शहरातील काही भागात रात्रभर व दुसऱ्या दिवशीही तर ग्रामीण भागात एक-दोन दिवस वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. शहरालगतच्या उमरी (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक ३, सिंदी (मेघे) वॉर्ड नं. ५ आणि झाडे डीपी परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. या भागात झाडे डीपी येथून वीज पुरवठा होतो. रोहित्रातून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी-अधिक वीज दाबामुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच वादळ वारा असला की यात आणखी भर पडते. गतवर्षी फ्रीज, टीव्ही, कुलर, फॅन जळाले होते. त्याची शुक्रवारी पुनरावृत्ती झाली. रात्री अधिक दाब निर्माण होऊन सर्वांच्या घरातील उपकरणे जळाली. रोहित्र बसविताना सदोष काँक्रीटचा चबुतरा बनविला. उमरी (मेघे) वॉर्ड ३ येथे सिंगल फेज लाईन आहे. ती थ्री-फेज करावी. विजेचा खेळखंडोबा दूर करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)मुदत संपल्यानंतर दिली विजेची देयकेरोहणा : परिसरात विद्युत वितरण कंपनीने मनमानी कारभार चालविला आहे. अवास्तव रकमेची देयके तर दिली जातातच; पण आता मुदत संपल्यानंतर देयके वितरित करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांना १० ते ५० रुपयांपर्यंतचा भुर्दंड सोसावा लागत आहे. अधीक्षक अभियंत्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. विद्युत वितरण कंपनी आता घरगुती वीज वापराचे देयक प्रत्येक महिन्यात वितरीत करते. ही देयके वितरित केल्यानंतर ग्राहकांना किमान सात दिवसांचा कालावधी मिळणे आवश्यक आहे, असे कंपनीच्या नियमावलीत स्पष्ट नमूद आहे. त्यानुसार कंपनीने ग्राहकांना विद्युत देयके सात दिवसांपूर्वी वितरित करणे गरजेचे आहे; पण परिसरात गत कित्येक महिन्यांपासून ऐन वेळेवर बिल दिले जात आहे. यामुळे अल्पावधीत बिल भरण्याची तरतूद करताना ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांना मुदत संपल्यावर दंडासह देयक अदा करावे लागत आहे. यावेळी मात्र वीज कंपनीने कहरच केला. बिल भरण्याची अंतिम मुदत २७ एप्रिल होती, ती देयकेच ५ मे नंतर वितरित करण्यात आली. अनेक ग्राहकांना ती ६ मे रोजी मिळाली. काहींना अद्यापही देयकेच मिळाली नाही. प्राप्त बिलावर अंतिम मुदत २७ एप्रिल असून ९ मे पर्यंत देयक भरल्यास १० ते ५० रुपयांपर्यंत दंडाचा भुर्दंड ग्राहकांवर लादला आहे. ९ मे पर्यंत देयक न भरल्यास पुन्हा दंडाची आकारणी केली आहे. विद्युत वितरण कंपनीच्या या महमद तुघलकी कारभारामुळे परिसरातील ग्राहक त्रस्त झाले आहेत. दंडासह बिल अदा न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जातो. यात ग्राहकांना पुन्हा जोडणीसाठी १०० रुपयांचा दंड भरावा लागतो. हा प्रकार दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्या ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असल्याचेच दिसून येत आहे. बिल वितरणाचे काम खासगी असल्याने कंत्राटदाराची माणसे त्यात हयगत करतात. त्यांच्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे सांगण्यात येते; पण ही बाब विद्युत नियामक मंडळाच्या नियमावलीचे उलंघन करणारी आहे. यात फेरबदल करून ग्राहकांना नियमावलीतील तरतुदीनुसार सात दिवसांपूर्वी देयके वितरित करावी, तरच दंड वसुलीसाठी कंपनी पात्र असेल, अन्यथा दंड आकारणी बंद करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.(वार्ताहर)