शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

‘पोथरा’च्या पाण्याची पळवा-पळवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:32 IST

तालुक्यात पोथरा प्रकल्प १९७९-८१ मध्ये तयार करण्यात आला. आपल्यालाच या प्रकल्पाचा फायदा होईल या आशेनच या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन सदर प्रकल्पासाठी दिली. परंतु, सध्या या प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिल्या जात असल्याने हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह शेतकºयांसाठी शोभेची वास्तूच ठरत आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरला दिले जातेय पाणी : नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यात पोथरा प्रकल्प १९७९-८१ मध्ये तयार करण्यात आला. आपल्यालाच या प्रकल्पाचा फायदा होईल या आशेनच या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन सदर प्रकल्पासाठी दिली. परंतु, सध्या या प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिल्या जात असल्याने हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह शेतकºयांसाठी शोभेची वास्तूच ठरत आहे.पोथरा प्रकल्पासाठी खापरी, सुकळी, बर्फा, रुणका, झुणका, निंभा या गावांमधील शेतकºयांच्या शेजजमिनी काहींनी स्वखुशीने दिल्या. तर काही शेतकºयांवर जमीन अधिग्रहण करताना दबावतंत्राचाच वापर करण्यात आला होता. असे असले तरी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३० वर्षांचा कालावधी लोटून करण्यात आले नाही. शिवाय जमिनीचा संपूर्ण मोबदलाही देण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात येते. प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहित करताना अल्पमोबदलाच देण्यात आला. त्यावेळी १५ ते २० हजार रुपये एकरी मोबदला तसेच त्या शेतकºयांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी असे धोरण राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र केवळ आठ ते दहा शेतकºयांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. अनेक शेतकºयांना या धोरणाच्या लाभाची प्रतीक्षा आहे. जलाशय वर्धा जिल्ह्यात आणि सर्वाधिक फायदा चंद्रपूर जिल्ह्याला होत असल्याने शेतकºयांसह नागरिकांमध्येही रोष निर्माण होत आहे. त्यामुळे शासनानेही शेतकरी हितार्थ धोरण राबविण्याची मागणी आहे.गाळमुक्त धरण योजना ठरली फोलसदर धरणात मागील ३५ वर्षांपासून पोथरा नदीच्या प्रवाहाने वाहत येणारा गाळ दरवर्षी जमा होत गेल्याने सध्या हे धरण उथळ झाले आहे. शिवाय धरणाच्या पाणी साठवण क्षमता सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही या प्रकल्पाला शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेच्या माध्यमातून गाळमुक्त करण्यासाठी कुठलेही पाऊल टाकले जात नसल्याने ही योजना येथे फोल ठरत आहे. शिवाय तशी चर्चाही परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. इतकेच नव्हे तर पावसाळ्याच्या दिवसात धरणातून पाणी सोडले जात असल्याने याचा आर्थिक फटका पोथरा नदी जवळील गावांमधील नागरिकांना सहन करावा लागत आहे.लाभापेक्षा नुकसान जास्तप्रकल्पग्रस्ताच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावाने धरणात गेल्याने त्यांनी हिंगणघाट व समुद्रपूर येथे जाऊन रोजमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढावा लागत आहे. शिवाय त्यांना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकल्प लाभदायक ठरण्यापेक्षा जास्त नुकसानदायकच ठरत असल्याची ओरड शेतकºयांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंगसदर प्रकल्प आपल्याला आधार देईल अशी अपेक्षा या भागातील शेतकºयांना होती. परंतु, मागील काही वर्षांपासून या प्रकल्पातील पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिले जात आहे. विशेष म्हणजे त्याकडे येथील स्वयंघोषित व्हॉईट कॉलर नेते तसेच काही राजकीय पुढाºयांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चंद्रपूरचे पुढारी येथील शेतकऱ्यांच्या साधेपणाचा फायदातर घेत नाही ना, असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकल्पातील पाणी परिसरातील ग्रामस्थांना पिण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्यास भविष्यातील जलसंकटावर मात करता येऊ शकते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.