शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

‘पोथरा’च्या पाण्याची पळवा-पळवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:32 IST

तालुक्यात पोथरा प्रकल्प १९७९-८१ मध्ये तयार करण्यात आला. आपल्यालाच या प्रकल्पाचा फायदा होईल या आशेनच या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन सदर प्रकल्पासाठी दिली. परंतु, सध्या या प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिल्या जात असल्याने हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह शेतकºयांसाठी शोभेची वास्तूच ठरत आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरला दिले जातेय पाणी : नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यात पोथरा प्रकल्प १९७९-८१ मध्ये तयार करण्यात आला. आपल्यालाच या प्रकल्पाचा फायदा होईल या आशेनच या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन सदर प्रकल्पासाठी दिली. परंतु, सध्या या प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिल्या जात असल्याने हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह शेतकºयांसाठी शोभेची वास्तूच ठरत आहे.पोथरा प्रकल्पासाठी खापरी, सुकळी, बर्फा, रुणका, झुणका, निंभा या गावांमधील शेतकºयांच्या शेजजमिनी काहींनी स्वखुशीने दिल्या. तर काही शेतकºयांवर जमीन अधिग्रहण करताना दबावतंत्राचाच वापर करण्यात आला होता. असे असले तरी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३० वर्षांचा कालावधी लोटून करण्यात आले नाही. शिवाय जमिनीचा संपूर्ण मोबदलाही देण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात येते. प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहित करताना अल्पमोबदलाच देण्यात आला. त्यावेळी १५ ते २० हजार रुपये एकरी मोबदला तसेच त्या शेतकºयांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी असे धोरण राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र केवळ आठ ते दहा शेतकºयांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. अनेक शेतकºयांना या धोरणाच्या लाभाची प्रतीक्षा आहे. जलाशय वर्धा जिल्ह्यात आणि सर्वाधिक फायदा चंद्रपूर जिल्ह्याला होत असल्याने शेतकºयांसह नागरिकांमध्येही रोष निर्माण होत आहे. त्यामुळे शासनानेही शेतकरी हितार्थ धोरण राबविण्याची मागणी आहे.गाळमुक्त धरण योजना ठरली फोलसदर धरणात मागील ३५ वर्षांपासून पोथरा नदीच्या प्रवाहाने वाहत येणारा गाळ दरवर्षी जमा होत गेल्याने सध्या हे धरण उथळ झाले आहे. शिवाय धरणाच्या पाणी साठवण क्षमता सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही या प्रकल्पाला शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेच्या माध्यमातून गाळमुक्त करण्यासाठी कुठलेही पाऊल टाकले जात नसल्याने ही योजना येथे फोल ठरत आहे. शिवाय तशी चर्चाही परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. इतकेच नव्हे तर पावसाळ्याच्या दिवसात धरणातून पाणी सोडले जात असल्याने याचा आर्थिक फटका पोथरा नदी जवळील गावांमधील नागरिकांना सहन करावा लागत आहे.लाभापेक्षा नुकसान जास्तप्रकल्पग्रस्ताच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावाने धरणात गेल्याने त्यांनी हिंगणघाट व समुद्रपूर येथे जाऊन रोजमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढावा लागत आहे. शिवाय त्यांना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकल्प लाभदायक ठरण्यापेक्षा जास्त नुकसानदायकच ठरत असल्याची ओरड शेतकºयांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंगसदर प्रकल्प आपल्याला आधार देईल अशी अपेक्षा या भागातील शेतकºयांना होती. परंतु, मागील काही वर्षांपासून या प्रकल्पातील पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिले जात आहे. विशेष म्हणजे त्याकडे येथील स्वयंघोषित व्हॉईट कॉलर नेते तसेच काही राजकीय पुढाºयांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चंद्रपूरचे पुढारी येथील शेतकऱ्यांच्या साधेपणाचा फायदातर घेत नाही ना, असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकल्पातील पाणी परिसरातील ग्रामस्थांना पिण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्यास भविष्यातील जलसंकटावर मात करता येऊ शकते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.